शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

तहानलेल्या रहिवाशांनी दिला मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 01:13 IST

पाण्यासाठी तहानलेल्या मीरा रोडच्या चंदे्रश अ‍ॅकॉर्ड इमारतीच्या रहिवाशांना पाण्यासाठी राजकारण्यांकडून केवळ खोटी आश्वासनेच मिळाल्याने लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

मीरा रोड : पाण्यासाठी तहानलेल्या मीरा रोडच्या चंदे्रश अ‍ॅकॉर्ड इमारतीच्या रहिवाशांना पाण्यासाठी राजकारण्यांकडून केवळ खोटी आश्वासनेच मिळाल्याने लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. इतकेच नव्हे, तर प्रचारासाठी एकाही राजकीय पक्षाच्या उमेदवार, लोकप्रतिनिधी वा कार्यकर्त्यास इमारतीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. असा निर्धार रहिवाशांच्या बैठकीत करण्यात आला असून, त्यामुळे राजकारण्यांसह महापालिकेची अब्रूसुद्धा चव्हाट्यावर आली आहे.मीरा रोडच्या सिल्व्हर पार्कसमोर असलेल्या चंद्रेश अ‍ॅकॉर्ड या तीन मजली जुन्या इमारतीत १६ सदनिका असून, सुमारे सव्वाशे रहिवासी येथे वास्तव्यास आहेत. येथे पालिकेची एकच नळजोडणी आहे. त्यामुळे जेमतेम सात ते आठ हजार लीटर पाणी पालिकेकडून मिळते. त्यातही पाणीकपात असली की, तीन दिवस तेवढे पाणीसुद्धा मिळत नाही. परिणामी, पाण्याची प्रचंड टंचाई रहिवासी सहन करत आहेत.पाण्याची काटकसर करताना कपडे धुण्याचे पाणी लादी आणि शौचालयासाठी वापरावे लागते. आठवड्यातून प्रत्येक सदनिकाधारकास पाण्यासाठी किमान दोनवेळा, तरी टँकर मागवावे लागतात. एका टँकरसाठी ३०० ते ४०० रुपये मोजावे लागतात.पाणी पुरेशा दाबाने यावे म्हणून जानेवारी महिन्यात पालिका आणि लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून मुख्य मार्गावरील मोठ्या जलवाहिनीवरून नळजोडणी घेण्यात आली होती. पण, निम्मे पाणीच मिळू लागल्याने पुन्हा अंतर्गत जलवाहिनीवरच नळजोडणी जोडली. या सर्व खटाटोपीत रहिवाशांना सुमारे ५० हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला.पालिकेच्या नियमानुसार १५ सदनिकांपर्यंत एक व त्यापेक्षा जास्त सदनिका असल्यास दोन नळजोडण्या दिल्या जातात. आमच्या इमारतीत १६ सदनिका असल्याने आणखी एका नळजोडणीसाठी पालिकेच्या खेपा मारूनसुद्धा नकार दिला जात आहे. स्थानिक आमदारानेसुद्धा आमच्या समस्येकडे दुर्लक्षच केल्याचे प्रमोद मिश्रा, बबन मोहिते आदी रहिवाशांनी सांगितले.२०१७ च्या पालिका निवडणुकीत २४ तास पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते; पण २४ तास तर सोडा, गरजेपुरते पाणीसुद्धा आजतागायत दिलेले नाही, असा आरोप रहिवाशांनी केला. अन्य इमारतींना दुसरी नळजोडणी मिळते, मग आमच्याच इमारतीवर अन्याय का, असा सवाल त्यांनी केला.>इमारतीच्या गच्चीवर रविवारी झालेल्या बैठकीत रहिवाशांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. मते मागायला येणाऱ्या एकही उमेदवार, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यास इमारतीत घ्यायचे नाही, असा निर्धार रहिवाशांनी केला. इमारतीबाहेर उमेदवार, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना प्रचारासाठी प्रवेशास मनाई असल्याचा फलक लावणार आहोत. रहिवाशांची बैठक बोलावून त्यात मतदानावर बहिष्कारासह अन्य मुद्यांचे ठराव करून घेणार आहोत.निवडणुकीनंतर उपोषण, धरणे, आंदोलने केली जातील, असा निर्धार मोहिते, मिश्रांसह परवेझ अन्सारी, अरुणा भट, दीपक छटबार, कांतिलाल जयस्वाल, दिनेश राजगुरू, धर्मू यादव, मोहन राजगुरू, कपूर आदी रहिवाशांनी केला आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणेmira roadमीरा रोड