शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

कोरोनाच्या धास्तीने रिक्षाचालकांचा व्यवसाय मंदावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 01:05 IST

शहरातील रिक्षाचालकांच्या व्यवसायावरही परिणाम झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.

 - जितेंद्र कालेकरठाणे : ठाणे : कोरोना या विषाणूची लागण होऊ नये, यासाठी बहुतांश ठाणेकरांमध्ये जागृती आली आहे. या विषाणूच्या प्रसारातून त्याची लागण होण्याच्या भीतीने गेल्या दोन दिवसांपासून ठाण्यातील बाजारपेठांसह वर्दळीच्या ठिकाणीही नागरिकांची गर्दी रोडावली आहे. त्यामुळे शहरातील रिक्षाचालकांच्या व्यवसायावरही परिणाम झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.शहरातील लोकमान्यनगर ते ठाणे रेल्वेस्थानक, माजिवडा, कापूरबावडी, कोलशेत ते ठाणे स्थानक, गावदेवी ते घोडबंदर रोड या मार्गावर प्रवासासाठी रिक्षाला प्रवाशांकडून मोठी मागणी असते. जांभळीनाका येथून शहरातील विविध भागांत जाण्यासाठीही अशीच गर्दी असते.सोमवार कामाचा पहिला दिवस असतानाही नेहमीप्रमाणे रस्त्यावर वर्दळ नव्हती. त्यामुळे शास्त्रीनगर, लोकमान्यनगर, शिवाईनगर, कळवा तसेच घोडबंदर येथील रिक्षाचालकांना दुपारपर्यंत ५०० रुपयांचाही आकडा गाठता आला नव्हता. कोरोनाच्या धास्तीने नागरिक बाहेर पडत नाही. शाळा, महाविद्यालय बंद आहेत. बाजारपेठांमध्येही गर्दी नसते. त्यामुळे एरव्ही रिक्षा शोधणारे ग्राहक असे चित्र असायचे. आता याउलट, प्रवाशांची वाट पाहणारे रिक्षाचालक अशी परिस्थिती झाल्याचे एका रिक्षाचालकानेच सांगितले.एरव्ही, रिक्षाचे भाडे, गॅस आणि इतर खर्च वगळून किमान एक हजाराची रक्कम हातात पडते. परंतु, आता प्रवाशांच्या संख्येअभावी गॅसचे पैसेही दिवसभरात हातात पडणे मुश्कील झाल्याचे अन्य एका रिक्षाचालकाने सांगितले. तर एरव्ही, १२०० रुपयांचा धंदा आता अवघा ७०० रुपयांवर आल्याचे अशोक जाधव या चालकाने ‘लोकमत’ला सांगितले.मास्क लावणे डोक्याला तापअनेक रिक्षाचालकांमध्ये कोरोनाची जागृती झाली आहे. त्यामुळे त्यांनी उत्स्फूर्तपणे तोंडावर मास्क लावण्यास सुरुवात केली आहे. तर, काहींना ते लावणे म्हणजे डोकेदुखी झाली आहे. आधीच वाढते तापमान, त्यात मास्क लावण्याने श्वास घेण्यात मोकळेपणा वाटत नाही. त्यामुळे अनेकांनी मास्क जवळ बाळगले आहे. पण, ते घालण्यात त्रासदायक असल्याचाही दावा केला आहे.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस