शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

राज ठाकरेंच्या मोर्चात ठाणे जिल्ह्यातील १० हजार प्रवासी होणार सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 19:06 IST

एल्फिस्टन दूर्घटनेत बळी गेलेल्या प्रवाशांच्या कुटूंबियांना न्याय मिळावा तसेच मध्य-पश्चिम रेल्वेने प्रवास करणा-या ८५ लाख रेल्वे प्रवाशांना सुखद-सुरक्षित-संरक्षित प्रवासाची हमी मिळावी यासाठी मनेसअध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारी पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट मुख्यालयावर मोर्चा काढणार आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यातील १० हजार जणांचा समावेश असेल.

 डोंबिवली - एल्फिस्टन दूर्घटनेत बळी गेलेल्या प्रवाशांच्या कुटूंबियांना न्याय मिळावा तसेच मध्य-पश्चिम रेल्वेने प्रवास करणा-या ८५ लाख रेल्वे प्रवाशांना सुखद-सुरक्षित-संरक्षित प्रवासाची हमी मिळावी यासाठी मनेसअध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारी पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट मुख्यालयावर मोर्चा काढणार आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यातील १० हजार जणांचा समावेश असेल. स्वत:च्या सुरक्षित प्रवासासाठी एकत्र या.  या टॅगलाइनचा आधार घेत प्रवाशांना आवाहन करण्यात येत आहे.यासंदर्भात बुधवारीही दिवसभर कृष्णकुंज येथे प्रवासी संघटनांचे निवडक पदाधिकारी, मनसेचे नेते, पक्षाच्या रेल कामगार सेनेचे नेते आदींची सखोल चर्चा झाली. कोणकोणत्या मागण्यांचा रेटा लावावा यासाठी आधी कृष्णकुंज नंतर राजगड येथिल पक्षाच्या कार्यालयात बैठका झाल्या. मध्य-पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना देण्यात येणारे विस्तृत निवेदन, त्यातील मागण्या आदींचा त्यात समावेश होता. मोर्चानंतर महाव्यवस्थापकांकडे चर्चेला जाणारे शिष्ठमंडळात कोणाकोणाचा समावेश करण्यात यावा यावरही चर्चा झाली. त्यावर बुधवारी रात्री अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरातून ७५ बसेसच्या माध्यमाने साडेतीन हजार नागरिक त्या ठिकाणी जावे असा प्रयत्न असेल. डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आदी ठिकाणांवरुन तीन हजार तर भिवंडी, शहापूर आदी भागांमधून दोन हजार नागरिक त्या मोर्च्यात सहभागी होतील असा विश्वास पक्षाचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी व्यक्त केला. याखेरिज प्रवासी संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे देखिल सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. कल्याण-डोंबिबली महापालिकेतील पक्षाचे सर्व नगरसेवक, कार्यकर्ते यामोर्चासाठी आवर्जून जाणार असल्याचे सांगण्यात आले. मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळ गुरुवारी सकाळी ११ वाजता सर्वांनी एकत्र जमण्यासाठी पक्षातर्फे आवाहन करण्यात आले असून सकाळी ११.३० वाजता मोर्चा निघणार असल्याचेही सांगण्यात आले. रेल्वे मोर्चात जास्तीत जास्त प्रवाशांनी सहभागी व्हावे यासाठी ठिकठिकाणी राज ठाकरेंच्या आवाहनांचे होर्डिंग्ज, बॅनर लावण्यात आले आहेत. सोशल मिडियावरील व्हॉट्सअ‍ॅप, यूट्यूब, इमेल्स यावर राज यांचे पत्र, संदेश, एव्हीज पाठवून जनजागृती करण्यात आली आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे