शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ठाणे अग्निशमन विभागाच्या जाचक अटींच्या विरोधात शहरातील ५०० हॉटेल, बार व्यावसायिकांनी पुकारला अचानक एक दिवसाचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 17:30 IST

अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला नसलेली हॉटेल बार सील करण्याची कारवाई महापालिकेने सुरु केली आहे. त्यानुसार आतापर्यंत ३६ हॉटेल, बार सील करण्यात ओ आहेत. परंतु अग्निशमन दलाच्या जाचक त्रासाला कंटाळून शहरातील ५०० हॉटेल, बारवाल्यांनी आज अचानक दुपारी चार वाजल्यापासून बंद पुकारला होता.

ठळक मुद्देआतापर्यंत ३६ हॉटेल, बार, लाऊन्स सीलबुधवारी आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर ठरणार पुढील दिशा

ठाणे - महापालिकेच्या अग्नीशमन दलाने नोटीस देवूनही त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाऱ्या  ८६ हॉटेल व बारपैकी १३ हॉटेल व बार सील करण्याची कारवाई अग्नीशमन विभागाने केली आहे. त्यानंतर आता ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जाचक अटी आणि त्रासाला कंटाळून मंगळवारी शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकांनी दुपारी चार वाजल्यापासून एक दिवसाचा बंद पुकारला होता. आयुक्तांशी बुधवारी चर्चा केल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय देखील या हॉटेल व्यावसायिकांनी घेतला आहे.               अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला नसलेल्या ठाणे शहरातील एकूण ४२६ हॉटेल्स, बार, लाऊंज यांना यापूर्वी अग्निशमन दलाच्यावतीने नोटीसी देण्यात आल्या होत्या. त्यापैकी जवळपास ८० आस्थापनांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्याने ती हॉटेल्स नियमित करण्यात आली आहेत. तसेच २६० प्रकरणे शहर विकास विभागाकडे नियमित करण्याच्या कार्यवाहीसाठी सादर करण्यात आली आहेत. परंतु नोटीस दिल्यानंतरही त्यावर काहीही कार्यवाही न केलेले एकूण ८६ हॉटेल्स, बार, लाऊंज तीन दिवसांत सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी दिले होते. त्यानंतर शनिवारी अग्निशमन विभागाने शहरातील तब्बल १३ हॉटेल सील केले होते. टप्याटप्याने उर्वरीत हॉटेलही सील केले जाणार आहेत. परंतु आता शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकांनी एकत्रित येऊन ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या विरोधात असहकार पुकारला आहे. त्यानुसार मंगळवारी दुपारी अचानक चार वाजल्यापासून या हॉटेल व्यावसायिकांनी बंद पुकारला. महाराष्टÑ अग्निशमन कायद्याअंतर्गत आम्ही सर्व प्रकारच्या अटींचे पालन केले आहे. तसेच बी फॉर्म देखील भरुन दिला आहे. असे असतांना देखील महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत रोजच्या रोज नवनवीन अटी काढल्या जात आहेत. त्यामुळे त्यांचा हा त्रास असह्य झाल्यानेच हा बंद पुकारण्यात आल्याची माहिती हॉटेल तथा बार असोसिएशनने दिली आहे. अग्निशमन विभागाच्या या जाचक अटींमुळे आम्हाला आमचा व्यवसाय बंद करण्याची वेळ आल्याचेही मत या व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे.या संदर्भात बुधवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या समवेत दुपारी १२.३० वाजता चर्चा होणार असून त्यानंतर पुढील दिशा ठरविली जाणार आहे.(रत्नाकर शेट्टी - हॉटेल, बार असोसिएशनचे जेष्ठ पदाधिकारी)आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाचक अटी टाकलेल्या नाहीत. दोन महिन्यापूर्वी ज्या अटी शर्ती मंजुर झाल्या त्याच आजही आहेत. त्यामुळे नव्याने कोणत्याही अटी शर्ती टाकण्यात आलेल्या नाहीत.(शशीकांत काळे - मुख्य अग्निशमन अधिकारी, ठामपा)कंपोडींग चार्जेस भरण्यावरुन सुरु आहे वादअग्निशमन दलामार्फत कोणत्याही प्रकारच्या नव्या अटी शर्ती टाकण्यात आलेल्या नाहीत. परंतु कंपोडींग चार्जेस आणि अ‍ॅडमेस्ट्रीटीव्ही चार्जेस भरण्याला या हॉटेल व्यावसायिकांचा विरोध असल्यानेच हे चार्जेस रद्द करण्यासाठी हा बंद पुकारल्याचे बोलले जात आहे.हॉटेल, बार सील करण्याची कारवाई सुरुचमहापालिकेच्या अग्नीशमन दलाने नोटीस देवूनही त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाºया ८६ हॉटेल व बारपैकी १३ हॉटेल व बार सील करण्याची कारवाई अग्नीशमन विभागाने शनिवारी केली होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा शहरातील १३ आणि मंगळवारी १० हॉटेल, बार अग्निशमन दलाकडून सील करण्यात आले आहेत. त्यानुसार तीन दिवसात ३६ हॉटेल, बार, लाऊंज सील करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाhotelहॉटेल