शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

‘त्या’ नव्या बसेस वापराविना धूळखात

By admin | Updated: December 12, 2015 01:36 IST

केंद्रशासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमात दाखल झालेल्या ६० नव्या बसेस चालक आणि वाहकांच्या कमतरतेमुळे गेले चार महिने धूळखात पडल्या आहेत.

कल्याण : केंद्रशासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमात दाखल झालेल्या ६० नव्या बसेस चालक आणि वाहकांच्या कमतरतेमुळे गेले चार महिने धूळखात पडल्या आहेत. गुरूवारच्या परिवहनच्या बैठकीत सर्वपक्षिय सदस्यांनी उपक्रमाचे व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांना याबाबत चांगलेच फैलावर घेतले. तत्काळ रिक्तपदे भरून त्या चालविण्यात याव्यात असे निर्देश सभापती नितिन पाटील यांनी दिले.जेएनएनयूआरएमतंर्गत परिवहन उपक्रमात १८५ बसेस दाखल होणार आहेत. यातील १० व्होल्व्हो दाखल झाल्या असून अन्य बसेसपैकी ६० बसेस उपक्रमाच्या ताफ्यात आल्या आहेत. पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी त्या मेट्रो मॉल आणि वसंत व्हॅली येथे धूळ खात पडल्या आहेत. आॅगस्ट २०१५ मध्ये या बसेसचे लोकार्पण झाले. परंतु, आजतागायत त्या नागरीकांच्या सेवेत दाखल नाहीत. एखाद्या जुन्या बसेसमध्ये बिघाड झाल्यास पर्यायी म्हणून या नव्या बसेसचा तात्पुरता आधार घेतला जातो. मनसेचे परिवहन समितीचे सदस्य दीपक भोसले यांनी सप्टेंबर महिन्यात याकडे लक्ष वेधून आंदोलनचा इशारा दिला होता. > जुन्या गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा केडीएमटीला ‘दे धक्का’! केडीएमसीच्या रस्त्यावर धावणाऱ्या बसेस तांत्रिक दृष्ट्या निकामी असून ठिकठिकाणी बंद पडत असल्याने प्रतीदिन शेकडो प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे. अशीच घटना शुक्रवारी दुपारी३ वा. भगतसिंग रोडवर घडल्याने टिळक पथासह महापालिकेपर्यंत काही काळ वाहतूककोंडी झाली. अखेरीस नागरिकांनीच एकत्र येऊन ४६२ क्रमांकांच्या बसला ‘दे धक्का’ मारून ती रस्त्याच्या कडेला कशीबशी उभी केली.दुपारी ही घटना घडली तरीही वाहतूकीचे तीनतेरा झाले. जर सकाळी-संध्याकाळी गर्दीच्या वेळेत घडली असती तर मात्र प्रचंड पंचाईत झाली असती. आधीच मानपाडा रस्त्यावर काम सुरु असल्याने तेथे एकेरी मार्ग आहे. त्यामुळे वाहतुकीचा बहुतांशी ताण हा या मार्गावर आहे. त्यात अशा घटना घडल्यास वाहतूककोंडी सोडवतांना ट्रॅफिक विभागाच्या नाकीनऊ येतात. तुटलेला जॉइंट निखळून रस्त्यावर पडल्याचे वाहक-चालकांच्या लक्षात आल्यावर मात्र, त्यांच्या तोंडचे पाणीच पळाले. अनेक नागरिकांना आवाहन केल्यानंतर काही सतर्क नागरिकांनी धक्का मारून गाडी बाजूला घेतल्याने त्या कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. मात्र तोपर्यंत भगतसिंग रोड वाहनांनी पूर्ण पॅक झाला होता, काहींनी पीपी चेंबर्सकडून गाड्या माघारी घेण्याचा द्रविडी प्राणायाम केल्याने कोंडीत अधीकच भर पडली.परिवहनच्या बसेसला समस्या आहेत, नव्या बसेस धुळखात आहेत हे देखिल मान्य आहे. परंतु, त्यासाठी चालक भरतीची प्रतिक्षा असून ती पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. दिवसागणिक तांत्रिक बिघाडात वाढ होत असल्याचे आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. - नितीन पाटील, सभापती, केडीएमटी