शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

‘त्या’ नव्या बसेस वापराविना धूळखात

By admin | Updated: December 12, 2015 01:36 IST

केंद्रशासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमात दाखल झालेल्या ६० नव्या बसेस चालक आणि वाहकांच्या कमतरतेमुळे गेले चार महिने धूळखात पडल्या आहेत.

कल्याण : केंद्रशासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमात दाखल झालेल्या ६० नव्या बसेस चालक आणि वाहकांच्या कमतरतेमुळे गेले चार महिने धूळखात पडल्या आहेत. गुरूवारच्या परिवहनच्या बैठकीत सर्वपक्षिय सदस्यांनी उपक्रमाचे व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांना याबाबत चांगलेच फैलावर घेतले. तत्काळ रिक्तपदे भरून त्या चालविण्यात याव्यात असे निर्देश सभापती नितिन पाटील यांनी दिले.जेएनएनयूआरएमतंर्गत परिवहन उपक्रमात १८५ बसेस दाखल होणार आहेत. यातील १० व्होल्व्हो दाखल झाल्या असून अन्य बसेसपैकी ६० बसेस उपक्रमाच्या ताफ्यात आल्या आहेत. पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी त्या मेट्रो मॉल आणि वसंत व्हॅली येथे धूळ खात पडल्या आहेत. आॅगस्ट २०१५ मध्ये या बसेसचे लोकार्पण झाले. परंतु, आजतागायत त्या नागरीकांच्या सेवेत दाखल नाहीत. एखाद्या जुन्या बसेसमध्ये बिघाड झाल्यास पर्यायी म्हणून या नव्या बसेसचा तात्पुरता आधार घेतला जातो. मनसेचे परिवहन समितीचे सदस्य दीपक भोसले यांनी सप्टेंबर महिन्यात याकडे लक्ष वेधून आंदोलनचा इशारा दिला होता. > जुन्या गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा केडीएमटीला ‘दे धक्का’! केडीएमसीच्या रस्त्यावर धावणाऱ्या बसेस तांत्रिक दृष्ट्या निकामी असून ठिकठिकाणी बंद पडत असल्याने प्रतीदिन शेकडो प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे. अशीच घटना शुक्रवारी दुपारी३ वा. भगतसिंग रोडवर घडल्याने टिळक पथासह महापालिकेपर्यंत काही काळ वाहतूककोंडी झाली. अखेरीस नागरिकांनीच एकत्र येऊन ४६२ क्रमांकांच्या बसला ‘दे धक्का’ मारून ती रस्त्याच्या कडेला कशीबशी उभी केली.दुपारी ही घटना घडली तरीही वाहतूकीचे तीनतेरा झाले. जर सकाळी-संध्याकाळी गर्दीच्या वेळेत घडली असती तर मात्र प्रचंड पंचाईत झाली असती. आधीच मानपाडा रस्त्यावर काम सुरु असल्याने तेथे एकेरी मार्ग आहे. त्यामुळे वाहतुकीचा बहुतांशी ताण हा या मार्गावर आहे. त्यात अशा घटना घडल्यास वाहतूककोंडी सोडवतांना ट्रॅफिक विभागाच्या नाकीनऊ येतात. तुटलेला जॉइंट निखळून रस्त्यावर पडल्याचे वाहक-चालकांच्या लक्षात आल्यावर मात्र, त्यांच्या तोंडचे पाणीच पळाले. अनेक नागरिकांना आवाहन केल्यानंतर काही सतर्क नागरिकांनी धक्का मारून गाडी बाजूला घेतल्याने त्या कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. मात्र तोपर्यंत भगतसिंग रोड वाहनांनी पूर्ण पॅक झाला होता, काहींनी पीपी चेंबर्सकडून गाड्या माघारी घेण्याचा द्रविडी प्राणायाम केल्याने कोंडीत अधीकच भर पडली.परिवहनच्या बसेसला समस्या आहेत, नव्या बसेस धुळखात आहेत हे देखिल मान्य आहे. परंतु, त्यासाठी चालक भरतीची प्रतिक्षा असून ती पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. दिवसागणिक तांत्रिक बिघाडात वाढ होत असल्याचे आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. - नितीन पाटील, सभापती, केडीएमटी