शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Apple Awe Dropping Event : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
3
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
6
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
7
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
8
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
9
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
10
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
11
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
12
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
13
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
14
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
15
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
16
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
17
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
18
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
19
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
20
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'

...हा तर यमलोकी जाण्याचा मार्ग! मुंबई-अहमदाबाद मार्गावर तब्बल २० हजार खड्डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:30 IST

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरच्या नेहमीच्या वाहतूक कोंडीला प्रवासी आणि नागरिक कंटाळले असून पालकमंत्र्यांनी अनेक बैठका घेऊनही ही समस्या दूर होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्क

पालघर :मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या निकृष्ट दर्जा आणि अपघातामुळे शेकडो प्रवाशांच्या मृत्यूविरोधात तीन वर्षांपासून अनेक आंदोलने, तक्रारी करूनही ठेकेदाराविरोधात कारवाईचे धारिष्ट्य पालकमंत्री आणि त्यांचे सरकार तीन वर्षांत दाखवू शकलेले नाही. आमदार राजेंद्र गावित यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समिती सभेत या महामार्गावर २० हजार खड्डे पडल्याचा आरोप केला.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरच्या नेहमीच्या वाहतूक कोंडीला प्रवासी आणि नागरिक कंटाळले असून पालकमंत्र्यांनी अनेक बैठका घेऊनही ही समस्या दूर होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्ग ४८ चे काम नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडियाने निर्मल बिल्ड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतले आहे. महामार्गावर दोनशे मिमी जाडीचा काँक्रीट थर अंथरण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने ५५४ कोटींचा खर्च मंजूर केला होता.

२०२३ पासून सुरू असलेल्या या कामामुळे वाहन चालक आणि नागरिकांना चांगल्या रस्त्याचा लाभ मिळणे, अपेक्षित असताना ठेकेदारांनी बनवलेल्या निकृष्ट आणि नियोजनशून्य कामांचा पुरता फज्जा उडाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. महामार्गावरील खड्ड्यांचे साम्राज्य आणि वाहतूक कोंडी याकडे प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

आश्वासन ठरले फोल

पालकमंत्र्यांच्या मागील बैठकीत नॅशनल हायवे ऑथोरिटीचे अधिकारी सुहास चिटणीस यांनी ३ जूनपर्यंत समस्यांचे निराकरण केले जाईल, असे आश्वासन दिले होते. ते फोल ठरले आहे.

मार्गावरील घोडबंदर ते तलासरीदरम्यान रस्त्यावर २० हजार खड्डे पडल्याने हा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनल्याचा आरोप खुद्द सत्ताधारी पक्षाचे आमदार राजेंद्र गावित यांच्यासह सर्व आमदारांनी बैठकीत केला.

कारखानदारांना फटका

तारापूर एमआयडीसी, पालघर बिडको, एमआयडीसी येथील कारखानदारांना कोट्यवधींचा फटका बसला असून शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत. मार्गावरील समस्येच्या निराकरणासाठी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत डझनभर बैठका घेतल्या असून त्यातून काहीही निष्पन्न होत नसल्याने अपघात व मृत्यूच्या घटना वारंवार घडत आहेत, याकडे सभेत लक्ष वेधण्यात आले.

टॅग्स :MumbaiमुंबईGujaratगुजरातhighwayमहामार्ग