शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
2
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
3
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
4
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
5
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
6
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
7
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
8
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
9
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
10
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
11
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
12
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
13
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
14
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
15
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
16
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
17
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
18
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
19
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
20
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध

...हा तर यमलोकी जाण्याचा मार्ग! मुंबई-अहमदाबाद मार्गावर तब्बल २० हजार खड्डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:30 IST

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरच्या नेहमीच्या वाहतूक कोंडीला प्रवासी आणि नागरिक कंटाळले असून पालकमंत्र्यांनी अनेक बैठका घेऊनही ही समस्या दूर होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्क

पालघर :मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या निकृष्ट दर्जा आणि अपघातामुळे शेकडो प्रवाशांच्या मृत्यूविरोधात तीन वर्षांपासून अनेक आंदोलने, तक्रारी करूनही ठेकेदाराविरोधात कारवाईचे धारिष्ट्य पालकमंत्री आणि त्यांचे सरकार तीन वर्षांत दाखवू शकलेले नाही. आमदार राजेंद्र गावित यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समिती सभेत या महामार्गावर २० हजार खड्डे पडल्याचा आरोप केला.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरच्या नेहमीच्या वाहतूक कोंडीला प्रवासी आणि नागरिक कंटाळले असून पालकमंत्र्यांनी अनेक बैठका घेऊनही ही समस्या दूर होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्ग ४८ चे काम नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडियाने निर्मल बिल्ड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतले आहे. महामार्गावर दोनशे मिमी जाडीचा काँक्रीट थर अंथरण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने ५५४ कोटींचा खर्च मंजूर केला होता.

२०२३ पासून सुरू असलेल्या या कामामुळे वाहन चालक आणि नागरिकांना चांगल्या रस्त्याचा लाभ मिळणे, अपेक्षित असताना ठेकेदारांनी बनवलेल्या निकृष्ट आणि नियोजनशून्य कामांचा पुरता फज्जा उडाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. महामार्गावरील खड्ड्यांचे साम्राज्य आणि वाहतूक कोंडी याकडे प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

आश्वासन ठरले फोल

पालकमंत्र्यांच्या मागील बैठकीत नॅशनल हायवे ऑथोरिटीचे अधिकारी सुहास चिटणीस यांनी ३ जूनपर्यंत समस्यांचे निराकरण केले जाईल, असे आश्वासन दिले होते. ते फोल ठरले आहे.

मार्गावरील घोडबंदर ते तलासरीदरम्यान रस्त्यावर २० हजार खड्डे पडल्याने हा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनल्याचा आरोप खुद्द सत्ताधारी पक्षाचे आमदार राजेंद्र गावित यांच्यासह सर्व आमदारांनी बैठकीत केला.

कारखानदारांना फटका

तारापूर एमआयडीसी, पालघर बिडको, एमआयडीसी येथील कारखानदारांना कोट्यवधींचा फटका बसला असून शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत. मार्गावरील समस्येच्या निराकरणासाठी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत डझनभर बैठका घेतल्या असून त्यातून काहीही निष्पन्न होत नसल्याने अपघात व मृत्यूच्या घटना वारंवार घडत आहेत, याकडे सभेत लक्ष वेधण्यात आले.

टॅग्स :MumbaiमुंबईGujaratगुजरातhighwayमहामार्ग