शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

...हा तर यमलोकी जाण्याचा मार्ग! मुंबई-अहमदाबाद मार्गावर तब्बल २० हजार खड्डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:30 IST

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरच्या नेहमीच्या वाहतूक कोंडीला प्रवासी आणि नागरिक कंटाळले असून पालकमंत्र्यांनी अनेक बैठका घेऊनही ही समस्या दूर होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्क

पालघर :मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या निकृष्ट दर्जा आणि अपघातामुळे शेकडो प्रवाशांच्या मृत्यूविरोधात तीन वर्षांपासून अनेक आंदोलने, तक्रारी करूनही ठेकेदाराविरोधात कारवाईचे धारिष्ट्य पालकमंत्री आणि त्यांचे सरकार तीन वर्षांत दाखवू शकलेले नाही. आमदार राजेंद्र गावित यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समिती सभेत या महामार्गावर २० हजार खड्डे पडल्याचा आरोप केला.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरच्या नेहमीच्या वाहतूक कोंडीला प्रवासी आणि नागरिक कंटाळले असून पालकमंत्र्यांनी अनेक बैठका घेऊनही ही समस्या दूर होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्ग ४८ चे काम नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडियाने निर्मल बिल्ड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतले आहे. महामार्गावर दोनशे मिमी जाडीचा काँक्रीट थर अंथरण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने ५५४ कोटींचा खर्च मंजूर केला होता.

२०२३ पासून सुरू असलेल्या या कामामुळे वाहन चालक आणि नागरिकांना चांगल्या रस्त्याचा लाभ मिळणे, अपेक्षित असताना ठेकेदारांनी बनवलेल्या निकृष्ट आणि नियोजनशून्य कामांचा पुरता फज्जा उडाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. महामार्गावरील खड्ड्यांचे साम्राज्य आणि वाहतूक कोंडी याकडे प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

आश्वासन ठरले फोल

पालकमंत्र्यांच्या मागील बैठकीत नॅशनल हायवे ऑथोरिटीचे अधिकारी सुहास चिटणीस यांनी ३ जूनपर्यंत समस्यांचे निराकरण केले जाईल, असे आश्वासन दिले होते. ते फोल ठरले आहे.

मार्गावरील घोडबंदर ते तलासरीदरम्यान रस्त्यावर २० हजार खड्डे पडल्याने हा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनल्याचा आरोप खुद्द सत्ताधारी पक्षाचे आमदार राजेंद्र गावित यांच्यासह सर्व आमदारांनी बैठकीत केला.

कारखानदारांना फटका

तारापूर एमआयडीसी, पालघर बिडको, एमआयडीसी येथील कारखानदारांना कोट्यवधींचा फटका बसला असून शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत. मार्गावरील समस्येच्या निराकरणासाठी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत डझनभर बैठका घेतल्या असून त्यातून काहीही निष्पन्न होत नसल्याने अपघात व मृत्यूच्या घटना वारंवार घडत आहेत, याकडे सभेत लक्ष वेधण्यात आले.

टॅग्स :MumbaiमुंबईGujaratगुजरातhighwayमहामार्ग