शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

अंबरनाथमधील काकोळे गाव तहानलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:16 IST

पाण्यासाठी महिलांची उन्हात पायपीट : नीर प्रकल्पापासून हाकेच्या अंतरावर असूनही टंचाई

अंबरनाथ : मलंगगडाच्या पायथ्याशी रेल्वे प्रशासनाचा जीआयपी टँक आहे. या धरणातून रेल्वेस्थानकांना पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, रेल्वेस्थानकात पर्यायी पाण्याची व्यवस्था झाल्याने या धरणातील पाणी तसेच पडून राहिले होते. अखेर, या धरणाच्या पाण्यावर रेल नीरचा प्रकल्प उभारण्यात आला. रेल्वे प्रशासनाने तयार केलेल्या या प्रकल्पासाठी धरणाचे पाणी वापरले जाते. मात्र, या प्रकल्पाच्या शेजारीच असलेल्या काकोळे गावाला मात्र पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. या गावात नळपाणीयोजना ही केवळ नावाला राबवण्यात आली. नळ आहेत पण पाणी नाही, अशी अवस्था या गावाची झाली आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना पाण्यासाठी जीआयपी धरणाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. या गावातील महिला आणि आदिवासीबांधव हे एक किलोमीटर अंतर कापून धरणातील पाणी आणण्यासाठी जातात.

धरणाच्या काठावरील पाणी हे अशुद्ध असल्याने महिलांनी या धरणाच्या पाण्याच्या पात्राशेजारी लहान खड्डे तयार केले असून या खड्ड्यांत येणारे शुद्ध पाणी भरून त्यावरच आपली तहान भागवतात. देशातील रेल नीर प्रकल्प ज्या गावात आहे, त्या गावालाच पाणी मिळत नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेकडे तक्रार करूनही कोणताच उपाय योजला जात नसल्याचे समोर आले आहे.

धरणासाठी जागा देऊनही पाणी नाहीकाकोळे गाव हे अंबरनाथ एमआयडीसी आणि अंबरनाथ शहराला लागून असलेले गाव. या गावातील जीआयपी धरणाच्या पायथ्यापासूनच वालधुनी नदीचा उगम होतो. मात्र, ज्या गावातून वालधुनी वाहते, त्या गावाला पाणी नाही, हे वास्तव समोर आले आहे. ज्या गावांनी आपली जागा धरणासाठी दिली, त्यांनाच पाणी नाही. स्थानिक प्रशासनही या धरणातील पाणी या गावाला उपलब्ध करून देत नाहीत. या गावातील विहीरही कोरडी पडली आहे. ही विहीर स्वच्छही केलेली नाही. नळाला पाणी नाही आणि गावातील विहिरीलाही पाणी नाही, अशा स्थितीत नागरिकांनी करावे तरी काय, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

रेल्वे प्रशासनाच्या ताब्यातील जीआयपी टँकवरील पाण्यावर प्रक्रिया करून बाटलीबंद पाणी तयार केले जाते. देशातील सर्वात मोठा हा रेल नीर प्रकल्प आहे. मात्र, या प्रकल्पापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या काकोळे गावात मात्र तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आजही या महिलांना भरउन्हात डोक्यावर हंडा घेऊन धरणातील पाणी भरावे लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईulhasnagarउल्हासनगर