शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमधील काकोळे गाव तहानलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:16 IST

पाण्यासाठी महिलांची उन्हात पायपीट : नीर प्रकल्पापासून हाकेच्या अंतरावर असूनही टंचाई

अंबरनाथ : मलंगगडाच्या पायथ्याशी रेल्वे प्रशासनाचा जीआयपी टँक आहे. या धरणातून रेल्वेस्थानकांना पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, रेल्वेस्थानकात पर्यायी पाण्याची व्यवस्था झाल्याने या धरणातील पाणी तसेच पडून राहिले होते. अखेर, या धरणाच्या पाण्यावर रेल नीरचा प्रकल्प उभारण्यात आला. रेल्वे प्रशासनाने तयार केलेल्या या प्रकल्पासाठी धरणाचे पाणी वापरले जाते. मात्र, या प्रकल्पाच्या शेजारीच असलेल्या काकोळे गावाला मात्र पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. या गावात नळपाणीयोजना ही केवळ नावाला राबवण्यात आली. नळ आहेत पण पाणी नाही, अशी अवस्था या गावाची झाली आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना पाण्यासाठी जीआयपी धरणाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. या गावातील महिला आणि आदिवासीबांधव हे एक किलोमीटर अंतर कापून धरणातील पाणी आणण्यासाठी जातात.

धरणाच्या काठावरील पाणी हे अशुद्ध असल्याने महिलांनी या धरणाच्या पाण्याच्या पात्राशेजारी लहान खड्डे तयार केले असून या खड्ड्यांत येणारे शुद्ध पाणी भरून त्यावरच आपली तहान भागवतात. देशातील रेल नीर प्रकल्प ज्या गावात आहे, त्या गावालाच पाणी मिळत नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेकडे तक्रार करूनही कोणताच उपाय योजला जात नसल्याचे समोर आले आहे.

धरणासाठी जागा देऊनही पाणी नाहीकाकोळे गाव हे अंबरनाथ एमआयडीसी आणि अंबरनाथ शहराला लागून असलेले गाव. या गावातील जीआयपी धरणाच्या पायथ्यापासूनच वालधुनी नदीचा उगम होतो. मात्र, ज्या गावातून वालधुनी वाहते, त्या गावाला पाणी नाही, हे वास्तव समोर आले आहे. ज्या गावांनी आपली जागा धरणासाठी दिली, त्यांनाच पाणी नाही. स्थानिक प्रशासनही या धरणातील पाणी या गावाला उपलब्ध करून देत नाहीत. या गावातील विहीरही कोरडी पडली आहे. ही विहीर स्वच्छही केलेली नाही. नळाला पाणी नाही आणि गावातील विहिरीलाही पाणी नाही, अशा स्थितीत नागरिकांनी करावे तरी काय, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

रेल्वे प्रशासनाच्या ताब्यातील जीआयपी टँकवरील पाण्यावर प्रक्रिया करून बाटलीबंद पाणी तयार केले जाते. देशातील सर्वात मोठा हा रेल नीर प्रकल्प आहे. मात्र, या प्रकल्पापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या काकोळे गावात मात्र तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आजही या महिलांना भरउन्हात डोक्यावर हंडा घेऊन धरणातील पाणी भरावे लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईulhasnagarउल्हासनगर