शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
3
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
4
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
5
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
6
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
7
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
8
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
9
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
10
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
11
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
12
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
13
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
14
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
15
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
16
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
17
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
18
वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान
19
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
20
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!

अंबरनाथमधील काकोळे गाव तहानलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:16 IST

पाण्यासाठी महिलांची उन्हात पायपीट : नीर प्रकल्पापासून हाकेच्या अंतरावर असूनही टंचाई

अंबरनाथ : मलंगगडाच्या पायथ्याशी रेल्वे प्रशासनाचा जीआयपी टँक आहे. या धरणातून रेल्वेस्थानकांना पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, रेल्वेस्थानकात पर्यायी पाण्याची व्यवस्था झाल्याने या धरणातील पाणी तसेच पडून राहिले होते. अखेर, या धरणाच्या पाण्यावर रेल नीरचा प्रकल्प उभारण्यात आला. रेल्वे प्रशासनाने तयार केलेल्या या प्रकल्पासाठी धरणाचे पाणी वापरले जाते. मात्र, या प्रकल्पाच्या शेजारीच असलेल्या काकोळे गावाला मात्र पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. या गावात नळपाणीयोजना ही केवळ नावाला राबवण्यात आली. नळ आहेत पण पाणी नाही, अशी अवस्था या गावाची झाली आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना पाण्यासाठी जीआयपी धरणाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. या गावातील महिला आणि आदिवासीबांधव हे एक किलोमीटर अंतर कापून धरणातील पाणी आणण्यासाठी जातात.

धरणाच्या काठावरील पाणी हे अशुद्ध असल्याने महिलांनी या धरणाच्या पाण्याच्या पात्राशेजारी लहान खड्डे तयार केले असून या खड्ड्यांत येणारे शुद्ध पाणी भरून त्यावरच आपली तहान भागवतात. देशातील रेल नीर प्रकल्प ज्या गावात आहे, त्या गावालाच पाणी मिळत नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेकडे तक्रार करूनही कोणताच उपाय योजला जात नसल्याचे समोर आले आहे.

धरणासाठी जागा देऊनही पाणी नाहीकाकोळे गाव हे अंबरनाथ एमआयडीसी आणि अंबरनाथ शहराला लागून असलेले गाव. या गावातील जीआयपी धरणाच्या पायथ्यापासूनच वालधुनी नदीचा उगम होतो. मात्र, ज्या गावातून वालधुनी वाहते, त्या गावाला पाणी नाही, हे वास्तव समोर आले आहे. ज्या गावांनी आपली जागा धरणासाठी दिली, त्यांनाच पाणी नाही. स्थानिक प्रशासनही या धरणातील पाणी या गावाला उपलब्ध करून देत नाहीत. या गावातील विहीरही कोरडी पडली आहे. ही विहीर स्वच्छही केलेली नाही. नळाला पाणी नाही आणि गावातील विहिरीलाही पाणी नाही, अशा स्थितीत नागरिकांनी करावे तरी काय, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

रेल्वे प्रशासनाच्या ताब्यातील जीआयपी टँकवरील पाण्यावर प्रक्रिया करून बाटलीबंद पाणी तयार केले जाते. देशातील सर्वात मोठा हा रेल नीर प्रकल्प आहे. मात्र, या प्रकल्पापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या काकोळे गावात मात्र तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आजही या महिलांना भरउन्हात डोक्यावर हंडा घेऊन धरणातील पाणी भरावे लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईulhasnagarउल्हासनगर