शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

तिसऱ्या टप्प्याची निविदा काढा, आयुक्तांची एमएमआरडीएकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 00:49 IST

कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी केडीएमसीने रिंगरोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी केडीएमसीने रिंगरोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. त्यातील चार, पाच, सहा आणि सात या टप्प्यांतील कामे सुरू झाली आहेत. प्रकल्पाच्या तिसºया टप्प्यासाठी महापालिकेने ७० टक्के भूसंपादन पूर्ण केले आहे. त्यामुळे मोठागाव ठाकुर्ली ते दुर्गाडीदरम्यानच्या कामाची निविदा एमएमआरडीएने काढावी, अशी मागणी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी एमएमआरडीएकडे केली आहे.३० किलोमीटरचा रिंगरोड ७०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे. त्यासाठी १०२ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. या प्रकल्पाचे काम सात टप्प्यांत होणार आहे. त्यापैकी चार, पाच, सहा आणि सात या टप्प्यांची कामे सुरू झाली आहेत. प्रकल्पासाठी संपादित कराव्या लागणाºया एकूण भूसंपादनापैकी ५१ टक्के जमीन केडीएमसीने ताब्यात घेतली आहे. २७ गावे केडीएमसीत समाविष्ट झाल्याने या रस्त्याची व्याप्ती २१ वरून ३० किमीपर्यंत वाढली. रिंगरोड प्रकल्प हेदुटणे, माणगाव, सागाव, भोपर, घारीवली, आयरे, कोपर, जुनी डोंबिवली, ठाकुर्ली, गावदेवी, चोळे, कांचनगाव, कचोरे, कल्याण, वाडेघर, उंबर्डे, कोलिवली, गांधारे, बारावे, वडवली, आटाळी, आंबिवली, बल्याणी, उंभार्ली, मांडा, टिटवाळा असा आहे.प्रकल्पाच्या तिसरा टप्पा हा मोठागाव ठाकुर्ली ते दुर्गाडी असा आहे. या टप्प्यासाठी आवश्यक असणारी ७० टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यामुळे तिसºया टप्प्याची निविदा एमएमआरडीएने काढावी, असे आयुक्तांनी म्हटले आहे. दुसरा आणि पहिला टप्पा हा २७ गावांशी संबंधित आहे. २७ गावांत कल्याण ग्रोथ सेंटर प्रस्तावित आहे. परंतु, २७ गावांपैकी १० गावे ही ग्रोथ सेंटरशी संबंधित असल्याने या गावांसाठी नियोजन प्राधिकरणाची जबाबदारी एमएमआरडीएकडे आहे. त्याठिकाणचा निर्णय एमएमआरडीएला घ्यावा लागणार आहे, असे बोडके यांनी सांगितले.प्रशासकीय अडथळेप्रकल्पासाठी काही जमीन संपादित करण्यात काही अडथळे येत आहेत. प्रकल्पबाधित जमीन ज्याच्या नावावर आहे, त्याच्या कुटुंबातील वारसांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बाधित जागेवर दावेदार जास्त आहेत. तसेच जागा एकाची आणि त्यावर कब्जा दुसºयाचा आहे. त्यामुळे कब्जेदारही दावेदार होऊन पुढे येत आहेत. या समस्येमुळे प्रकल्पबाधितांचा मोबदला कोणाला द्यायचा, हे ठरत नाही. तसेच प्रकल्पबाधितांना टीडीआरस्वरूपात मोबदला दिला जाणार आहे.प्रकल्पबाधित न्यायालयातरिंगरोडच्या दुर्गाडी ते टिटवाळा या टप्प्यात आंबिवली, अटाळी परिसरांतील जवळपास ८४२ प्रकल्पबाधित आहेत. परंतु, त्यांना मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांची याचिका न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे याचिकेवर काय निर्णय होतो, याकडे महापालिका व प्रकल्पबाधितांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी