शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांत यंदाही तीव्र पाणीटंचाई , प्रक्रिया नव्याने राबवावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:54 IST

केंद्र सरकारच्या अमृत योजने अंतर्गत २७ गावांसाठी मंजूर करण्यात आलेल्या १८० कोटींच्या पाणी पुरवठा योजनेसाठी मागविलेली निविदा राज्य सरकारने काही कारणास्तव रद्द

कल्याण : केंद्र सरकारच्या अमृत योजने अंतर्गत २७ गावांसाठी मंजूर करण्यात आलेल्या १८० कोटींच्या पाणी पुरवठा योजनेसाठी मागविलेली निविदा राज्य सरकारने काही कारणास्तव रद्द केल्याने फेरनिविदा काढावी लागणार आहे. त्या प्रक्रियेत जाणारा वेळ पाहता यंदाच्या वर्षीही या गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवण्याची चिन्हे आहेत.ही २७ गावे २०१५ साली कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत आली. या गावांसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना नाही. या गावांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) दररोज ३० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. परंतु लोकसंख्या वाढत गेल्याने या गावात सध्या पाणीटंचाई आहे. पाणी वितरणाची व्यवस्था सक्षम नसल्याने ही पाणीटंचाई उद््भवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गावांसाठी पाणीपुरवठा योजना तयार करुन ती केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत मंजुरीसाठी पाठविण्यात आली होती. केंद्र सरकारने या १८० कोटींच्या योजनेला मंजुरी दिली. त्यासाठी राज्य व केंद्र सरकार निधी देणार आहे. या योजनेसाठी महापालिकेने दोेन वेळा निविदा मागविल्या. पहिल्या निविदेला कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळाला नाही, तर दुसºयावेळी एकच निविदा मिळाली. त्यामुळे स्पर्धा होत नसल्याने दुसºया वेळची निविदा उघडण्यात आलेली नव्हती. तिसºया वेळेस निविदा मागविली, तेव्हा एक निविदा आली तरी ती स्वीकारण्याचे महापालिकेचे धोरण होते. त्यानुसार कृष्णानी नावाच्या कंपनीला कंत्राट मंजूर करण्यात आले. योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे राबवली जाणार असल्याने निविदेची कागदपत्रे प्राधिकरणाकडे पाठविली गेली. त्यांच्याकडून सुरू असलेल्या छाननीत या कंपनीचे रजिस्ट्रेशन अवैध असल्याचा मुद्दा समोर आल्याने कंत्राट रद्द करण्याचा निर्णय मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. सरकारने निविदा रद्द केली असली, तरी फेरनिविदा मागविली जाणार आहे.ही योजना १८० कोटींची असल्याने कंपन्या लवकर पुढे येत नाहीत. सध्या पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने योजनेचे काम घेतल्यास महापालिका पैसे देणार की नाही, या भीतीपोटीही कंत्राटदार लवकर मिळत नाहीत. या योजनासाठी दोन वेळा निविदा काढल्यावर तिसºया निविदेस प्रतिसाद मिळाला होता. आता तीही राज्य सरकारने रद्द केल्याने फेरनिविदा मागविली जाणार आहे. २७ गावांची अमृत योजना मंजूर झाल्यापासून ती निविदेच्या चक्रात अडकली असून तिला फेरनिविदेचा चुकविता आलेला नाही. महापालिकेचे अधिकारी निविदेच्या अटी शर्ती व त्यासाठी लागणाºया कागदपत्रांची पूर्तता तपासत नसल्याने त्याचा फटका योजनेला बसतो आहे. अनेकदा निविदा मागविण्यातच दिरंगाई होत आहे. सततच्या फेरनिविदा प्रक्रियेमुळे योजनेची प्रत्यक्ष निविदा स्वीकारुन कामाचा आदेश देण्यात बराच वेळ वाया जाणार आहे.

टॅग्स :Waterपाणी