शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

यंदा पावसावर होणार विपरीत परिणाम; जनावरांचा चारा अन्य जिल्ह्यांत वाहतुकीस मनाई

By सुरेश लोखंडे | Updated: February 29, 2024 20:32 IST

जिल्ह्यातील या सर्व स्रोतापासून एक लाख १० हजार ५५५ मे. टन चारा उत्पादित होणार आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल-निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे  देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. यास विचारात घेता ठाणे जिल्ह्यात पुढील कालावधीत जनावरांसाठी चाऱ्यायाची टंचाई परिस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यास वेळीच पायबंद घालण्यासाठी २०२३-२४ या वर्षातील खरीप पिक पेरणी, रब्बी पिक पेरणी, जंगल वनक्षेत्र, चराऊ क्षेत्र, झाडपाल, बांधावरील गवत आदी जनावरांच्या चार्याची अन्य जिल्ह्यांत वाहतूक करण्यास  मनाई आदेश ठाणे जिल्ह्याधिकारी अशोक शिनगारे  यांनी जारी केला आहे. 

जिल्ह्यातील या सर्व स्रोतापासून एक लाख १० हजार ५५५ मे. टन चारा उत्पादित होणार आहे. जिल्ह्यातील पशुधनास माहे जून-२०२४ पर्यंत एक लाख १९ हजार मे. टन चारा आवश्यक आहे. जिल्ह्यातील पशुधनास पाऊस उशिरा आल्यास जिल्ह्यात संभाव्य चारा टंचाई भासू शकते. त्यामुळे जिल्ह्यामध्ये उत्पादन होणारा चारा तसेच मुरघास इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास बंदी आणणे व जिल्ह्या बाहेरील निविदा धारकांना लिलाव देण्यात येऊ नये, यामुळे जिल्ह्यात चारा टंचाई भासणार नाही. यासाठी अन्य जिल्ह्यांत चारा वाहतूक करण्यासाठी मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.   

जेणेकरून ठाणे जिल्ह्यात चारा टंचाई भासणार नाही आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी खात्री झाल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता,  नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून ठाणे जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास यांची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास मनाई असल्याबाबत ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अशोक शिनगारे यांनी आदेश दिले आहेत. हा आदेश निर्गमित झाल्यापासून पुढील आदेशापर्यंत अंमलात राहील, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस