शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

केडीएमसीसह २७ गावांत होणार ११० कोटींचे १२ रस्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 00:14 IST

कल्याण शहर व २७ गावांतील १२ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी एमएमआरडीएने ११० कोटी रुपये खर्चाच्या निविदा मागवल्या आहेत.

कल्याण : कल्याण शहर व २७ गावांतील १२ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी एमएमआरडीएने ११० कोटी रुपये खर्चाच्या निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवली शहर व ग्रोथ सेंटरच्या परिसरात सुसज्ज व चकाचक रस्ते होणार आहेत.कल्याण-डोंबिवली पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने विकासकामांसाठी फारसा निधी मिळत नाही. २७ गावांतील रस्त्यांचा विकास एमएमआरडीएद्वारे करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी वर्षभरापूर्वी दिली होती. त्यानुसार, एमएमआरडीएने रस्ते विकासासाठी ११० कोटींची कामे मंजूर केली आहेत. यापूर्वी २७ गावांतील कल्याण ग्रोथ सेंटरसाठी एक हजार ८९ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. कल्याण ग्रोथ सेंटरसाठी १० गावे निवडली आहेत. मात्र, तेथील जमीनमालकांचा ग्रोथ सेंटरला जागा देण्यास विरोध आहे. त्यावर तोडगा निघू शकलेला नाही.ग्रोथ सेंटरसाठी रस्ते व अन्य पायाभूत सोयीसुविधा पुरवणे आवश्यक आहे. या हेतूने मंजूर केलेल्या १२ रस्त्यांपैकी शीळ रस्ता ते नारिवली, पाइपलाइन रस्ता ते कोळे, घेसर, आशेळे ते शक्तिपीठ, भालगाव ते वसार बसस्टॉप, मयूर हॉटेल ते तुकाराम चौक दावडी, पाइपलाइन रस्ता ते हेदुटणे, शिरढोण हे सहा रस्ते २७ गावांतील आहेत. त्यापैकी घेसर, कोळे, दावडी, हेदुटणेचा परिसर ग्रोथ सेंटरशी निगडित आहेत. याशिवाय मोहने रस्ता, इंदिरानगर आदिवासीपाडा ते नांदप, आधारवाडी रस्ता, पांडुरंगवाडी ते गावदेवी, छत्री बंगला ते मंगेशीधाम, सेंट झेविअर स्कूल ते चंद्रभागा टॉवर हे सहा रस्ते काँक्रिटचे होणार असून, त्यासाठी ई-निविदा मागवल्या आहेत.>१४ गावांनाही होणार फायदा२७ गावांतील ६२ कोटी रुपये खर्चाचे रस्ते मंजूर करण्यासाठी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत १४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. यातून नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या १४ गावांतील रस्ते विकसित केले जाणार आहेत. त्यात गोरपे ते काकोळे, कोळे ते उत्तरशीव, पाली ते शिरवली, करवले ते उत्तरशीव, करवले ते नेवाळी या रस्त्यांचा समावेश आहे. ही कामे मंजूर करण्यासाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. कल्याण-डोंबिवलीतील सगळ्यात महत्त्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्प एमएमआरडीएच्या माध्यमातून केला जात आहे. हा प्रकल्प ८०० कोटी रुपये खर्चाचा आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामास सुरुवात झालेली आहे. या प्रकल्पास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली होती. आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात १०३ कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्या निधीतून कल्याण पूर्व व पश्चिमेतील तीन रस्ते काँक्रिटचे करण्यात आले. हे काम महापालिकेने केले होते. त्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात आणखीन ३०० कोटींचा निधी प्राप्त झाल्यावर २४ रस्ते विकसित केले होते. या निधीतून ५० कोटी रुपये वाचले होते. ते परत न पाठवता त्यातूनही अंतर्गत रस्ते तयार करण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे.