शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

केडीएमसीसह २७ गावांत होणार ११० कोटींचे १२ रस्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 00:14 IST

कल्याण शहर व २७ गावांतील १२ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी एमएमआरडीएने ११० कोटी रुपये खर्चाच्या निविदा मागवल्या आहेत.

कल्याण : कल्याण शहर व २७ गावांतील १२ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी एमएमआरडीएने ११० कोटी रुपये खर्चाच्या निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवली शहर व ग्रोथ सेंटरच्या परिसरात सुसज्ज व चकाचक रस्ते होणार आहेत.कल्याण-डोंबिवली पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने विकासकामांसाठी फारसा निधी मिळत नाही. २७ गावांतील रस्त्यांचा विकास एमएमआरडीएद्वारे करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी वर्षभरापूर्वी दिली होती. त्यानुसार, एमएमआरडीएने रस्ते विकासासाठी ११० कोटींची कामे मंजूर केली आहेत. यापूर्वी २७ गावांतील कल्याण ग्रोथ सेंटरसाठी एक हजार ८९ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. कल्याण ग्रोथ सेंटरसाठी १० गावे निवडली आहेत. मात्र, तेथील जमीनमालकांचा ग्रोथ सेंटरला जागा देण्यास विरोध आहे. त्यावर तोडगा निघू शकलेला नाही.ग्रोथ सेंटरसाठी रस्ते व अन्य पायाभूत सोयीसुविधा पुरवणे आवश्यक आहे. या हेतूने मंजूर केलेल्या १२ रस्त्यांपैकी शीळ रस्ता ते नारिवली, पाइपलाइन रस्ता ते कोळे, घेसर, आशेळे ते शक्तिपीठ, भालगाव ते वसार बसस्टॉप, मयूर हॉटेल ते तुकाराम चौक दावडी, पाइपलाइन रस्ता ते हेदुटणे, शिरढोण हे सहा रस्ते २७ गावांतील आहेत. त्यापैकी घेसर, कोळे, दावडी, हेदुटणेचा परिसर ग्रोथ सेंटरशी निगडित आहेत. याशिवाय मोहने रस्ता, इंदिरानगर आदिवासीपाडा ते नांदप, आधारवाडी रस्ता, पांडुरंगवाडी ते गावदेवी, छत्री बंगला ते मंगेशीधाम, सेंट झेविअर स्कूल ते चंद्रभागा टॉवर हे सहा रस्ते काँक्रिटचे होणार असून, त्यासाठी ई-निविदा मागवल्या आहेत.>१४ गावांनाही होणार फायदा२७ गावांतील ६२ कोटी रुपये खर्चाचे रस्ते मंजूर करण्यासाठी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत १४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. यातून नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या १४ गावांतील रस्ते विकसित केले जाणार आहेत. त्यात गोरपे ते काकोळे, कोळे ते उत्तरशीव, पाली ते शिरवली, करवले ते उत्तरशीव, करवले ते नेवाळी या रस्त्यांचा समावेश आहे. ही कामे मंजूर करण्यासाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. कल्याण-डोंबिवलीतील सगळ्यात महत्त्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्प एमएमआरडीएच्या माध्यमातून केला जात आहे. हा प्रकल्प ८०० कोटी रुपये खर्चाचा आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामास सुरुवात झालेली आहे. या प्रकल्पास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली होती. आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात १०३ कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्या निधीतून कल्याण पूर्व व पश्चिमेतील तीन रस्ते काँक्रिटचे करण्यात आले. हे काम महापालिकेने केले होते. त्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात आणखीन ३०० कोटींचा निधी प्राप्त झाल्यावर २४ रस्ते विकसित केले होते. या निधीतून ५० कोटी रुपये वाचले होते. ते परत न पाठवता त्यातूनही अंतर्गत रस्ते तयार करण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे.