शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

एसटीच्या रातराणीला अद्यापही प्रतिसाद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राज्यात अनेक ठिकाणी अनलॉक झाल्यानंतर आता टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. त्यानुसार, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : राज्यात अनेक ठिकाणी अनलॉक झाल्यानंतर आता टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. त्यानुसार, आता एसटीची सेवादेखील हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. एसटीच्या ५० टक्के बस रस्त्यावर येण्यास सुरुवात झालेली आहे. यात ठाण्यातून रातराणीची सेवादेखील सुरू झाली आहे. परंतु, त्यादेखील ५० टक्केच रस्त्यावर धावू लागल्या आहेत. मात्र, त्यांना फारसा प्रतिसाद अद्यापही मिळालेला नाही. दुसरीकडे खाजगी बसेसना मात्र प्रवासी अधिक पसंती देताना दिसत आहेत. एसटीच्या तुलनेत खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसेसचे दर अधिक असतानाही त्यांना पसंती दिली जात आहे.

कोरोनाची लाट येण्यापूर्वी ठाणे जिल्ह्यातून एसटीच्या दिवसाला ५५० गाड्यांची या आगारातून राज्यभर वर्दळ सुरू असायची. दिवसाला या गाड्या अंदाजे एक लाख ५८ हजार किलोमीटरचा प्रवास करतात. तर, त्यावेळेस एसटीचे उत्पन्न ६० ते ६२ लाखांचे होते. परंतु, पहिल्या लॉकडाऊनला प्रवासी संख्या घटण्यास सुरुवात झाली. त्याचप्रमाणे दुस-या लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा एसटी विभागावर जणू कु-हाडच कोसळली आहे. पहिल्या लॉकडाऊनप्रमाणे या लॉकडाऊनमध्ये लांबच्या पल्ल्यांवर एसटी धावणे बंद झाले असून फक्त अत्यावश्यक मार्गांवरच एसटी धावत होत्या. या गाड्या प्रामुख्याने ठाणे, मुंबई, पनवेल, वाडा आदी मार्गांवर धावत होत्या. त्यामुळे साधारण दिवसाला ४१ हजार किलोमीटरचा प्रवास होत आहे. परंतु, आता अनलॉकनंतर एसटीचे पुन्हा सध्या ५० टक्के ऑपरेशन सुरू झाले आहे. एसटीच्या ताफ्यात ठाण्यात ४५० बस असल्या, तरी त्यातील १३० बस या महाराष्ट्र राज्यातील असून इतर राज्यांच्या ४ आणि ठाणे अंतर्गत ३१६ बस या विविध मार्गांवर धावत आहेत. इतर राज्यांमध्ये भिवंडी ते विजापूर, ठाणे ते बेळगाव, ठाणे ते गाणगापूर आणि ठाणे ते हैदराबाद यांचा समावेश आहे. अनलॉकनंतरही लांब पल्ल्यांच्या मार्गांना ब्रेक लावला होता. त्यात आता ३१६ पैकी १६० च्या आसपास बस रस्त्यावर धावत असून त्यांच्या ८५० च्या आसपास फे-या होत आहेत.

एसटीच्या किती फे-या सुरू आहेत

८५०

रातराणी

३५

चालक आणि वाहक - ३४००

सध्या ५० टक्के प्रतिसाद

एसटीच्या माध्यमातून सध्या जळगाव, औरंगाबाद, कोल्हापूर, साखरपा, चिपळूण, वडुज, दहिवडी, महाड, शिवथरे, अहमदनगर आदींसह इतर अशा १५ मार्गांवर रातराणी फे-या आहेत. परंतु, यातील जवळजवळ सर्वच मार्गांवर फारसा प्रतिसाद दिसत नाही. प्रवासी अद्यापही काही प्रमाणात प्रवास करताना भीत असल्याने या मार्गांवरील रातराणी बसला ५० टक्के प्रतिसाद मिळत आहे.

ट्रॅव्हल्सचे तिकीट जास्त, प्रतिसाद ५० टक्केच

एसटीप्रमाणे ट्रॅव्हल्सचीदेखील अशीच काहीशी अवस्था आहे. अनलॉकनंतर खाजगी ट्रॅव्हल्सच्या बस रस्त्यावर उतरत असल्या तरी रातराणीलादेखील ५० टक्केच प्रतिसाद सध्या मिळत असल्याची माहिती ट्रॅव्हल्सवाल्यांनी दिली. त्यातही एसटीचे एखाद्या मार्गाचे तिकीट ३०० रुपये असेल, तर त्याच मार्गासाठी खाजगी ट्रॅव्हल्सवाले ५५० रुपये आकारत आहेत. परंतु, बसमध्ये बसण्यासाठी येणा-या प्रवाशाला सॅनिटाइझ करूनच सोडले जात असल्याने तसेच बसही सॅनिटाइझ केली जात असल्याने खाजगी बसला प्रवाशांची पसंती मिळत आहे.

......

येत्या काही दिवसांत रातराणीला आणखी प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. सध्या ५० टक्के प्रतिसाद मिळत आहे. कोकणात रुग्ण वाढत असल्याने त्याठिकाणी जाणा-या रातराणी बसचे प्रमाण कमी केले आहे. परंतु, इतर ठिकाणी टप्प्याटप्प्याने सेवा सुरू केली जात आहे.

(विनोदकुमार भालेराव - विभागीय नियंत्रक, एसटी, ठाणे)