शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

परीवहन सभापतींचा वॉर्ड असूनही बस नाही

By admin | Updated: September 24, 2015 00:02 IST

केडीएमसीचा स्मार्टसिटीमध्ये समावेश करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. प्रचंड दाटीवाटीची वस्ती, अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट, आपत्कालीन स्थितीत भयंकर अडचणी,

अनिकेत घमंडी, डोंबिवलीकेडीएमसीचा स्मार्टसिटीमध्ये समावेश करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. प्रचंड दाटीवाटीची वस्ती, अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट, आपत्कालीन स्थितीत भयंकर अडचणी, पुरेशा वाहतूक साधनांचा अभाव, मुलभूत सुविधांची वानवा, आरोग्याचा गंभीर प्रश्न अशा विविध प्रश्नांमुळे नागरिक हैराण आहेत. यापैकी बहुतांशी सुविधांचा अभाव येथील तुकारामनगर वॉर्डात दिसून येतो. पाणी, वीज, पायवाटा, गटारी आणि अंतर्गत रस्ते हे जरी नगरसेवकाने दिले असले तरीही ‘स्वास्थ’ अर्थात नागरिकांच्या आरोग्य याचा विचार मात्र झालेला दिसून येत नाही. करमणुकीसाठी एकही साधन नाही, की त्याचे भविष्यात नियोजन नाही. १० हजारांहून अधिकच्या वस्तीसाठी केवळ एकमेव वाचनालय आहे. मध्यमवर्गीय, तळागळातले नागरिक येथे वास्तव्यास आहेत, त्यांच्या पाल्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिकेचा प्रस्ताव आहे. परंतु, केवळ चांगली जागा मिळत नसल्याने तो कागदावरच आहे. केडीएमटीच्या सभापतींचा वॉर्ड अशी त्याची ख्याती आहे. परंतु, असे असतांनाही सभापती त्यांच्या या वॉर्डात बस आणू शकले नाहीत. आगामी काळात ते ती सुविधा देणार आहेत. परंतु, कधी याबाबत मात्र निश्चिती नाही. तसेच बस सुरु झाल्यावर ती कायमस्वरुपी राहणार याबाबतही शाश्वती नाही. या वॉर्डाच्या विकासासाठी आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे, काँग्रेसचे आमदार संजय दत्त आदींनी भरपूर निधी दिला. परंतु, तो सर्व पायवाटा, गटारे यांच्यासाठीच वापरला गेला. त्या विशेष निधीतून वेगळे असे वॉर्डासाठी काही करण्यात नगरसेवक कमी पडल्याचे स्पष्ट होते. कचराकुंडी मुक्त वॉर्ड असला तरीही परिसरात खासगी मालमत्तांमुळे विकास करता येत नाही, त्यामुळे बहुतांशी ठिकाणी मातीचे ढिगारे दिसून येतात. त्यामुळेही परिसराला बकाल अवस्था आली आहे. कुठेही सरळ रस्ते नाही, आडवळणाच्या पायवाटांना रस्त्याचे स्वरुप दिले असून एकावेळी अवघी एकच रिक्षा जाऊ शकते, दोन मोठी वाहने एकमेकांसमोर आल्यास पंचाईत होते. अंतर्गत, चिंचोळा वॉर्ड वाढलेला असतांनाही फेरीवाला समस्या असून फुटपाथ नावालाच आहेत. विरंगुळयाचे साधन नाही. एका शाळेसमोरील चौकाचे कधीकाळी थातुरमातूर सुशोभिकरण केले होते. हे सांगावे लागावे इतकी त्या चौकाची दुरवस्था झाली असून त्याला डागडुजीची गरज आहे. तेथे असलेले कारंजे तांत्रिक कारणाने बंद पडले आहेत. त्याच्या दुरुस्तीचे काम झाले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ५ वर्षांत केले काय? असा जनतेचा प्रश्न आहे.