शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
2
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
3
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
4
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
5
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
6
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
7
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
8
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
9
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
10
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
11
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
12
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
13
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
14
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
15
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
16
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
17
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
18
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
19
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
20
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

परीवहन सभापतींचा वॉर्ड असूनही बस नाही

By admin | Updated: September 24, 2015 00:02 IST

केडीएमसीचा स्मार्टसिटीमध्ये समावेश करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. प्रचंड दाटीवाटीची वस्ती, अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट, आपत्कालीन स्थितीत भयंकर अडचणी,

अनिकेत घमंडी, डोंबिवलीकेडीएमसीचा स्मार्टसिटीमध्ये समावेश करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. प्रचंड दाटीवाटीची वस्ती, अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट, आपत्कालीन स्थितीत भयंकर अडचणी, पुरेशा वाहतूक साधनांचा अभाव, मुलभूत सुविधांची वानवा, आरोग्याचा गंभीर प्रश्न अशा विविध प्रश्नांमुळे नागरिक हैराण आहेत. यापैकी बहुतांशी सुविधांचा अभाव येथील तुकारामनगर वॉर्डात दिसून येतो. पाणी, वीज, पायवाटा, गटारी आणि अंतर्गत रस्ते हे जरी नगरसेवकाने दिले असले तरीही ‘स्वास्थ’ अर्थात नागरिकांच्या आरोग्य याचा विचार मात्र झालेला दिसून येत नाही. करमणुकीसाठी एकही साधन नाही, की त्याचे भविष्यात नियोजन नाही. १० हजारांहून अधिकच्या वस्तीसाठी केवळ एकमेव वाचनालय आहे. मध्यमवर्गीय, तळागळातले नागरिक येथे वास्तव्यास आहेत, त्यांच्या पाल्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिकेचा प्रस्ताव आहे. परंतु, केवळ चांगली जागा मिळत नसल्याने तो कागदावरच आहे. केडीएमटीच्या सभापतींचा वॉर्ड अशी त्याची ख्याती आहे. परंतु, असे असतांनाही सभापती त्यांच्या या वॉर्डात बस आणू शकले नाहीत. आगामी काळात ते ती सुविधा देणार आहेत. परंतु, कधी याबाबत मात्र निश्चिती नाही. तसेच बस सुरु झाल्यावर ती कायमस्वरुपी राहणार याबाबतही शाश्वती नाही. या वॉर्डाच्या विकासासाठी आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे, काँग्रेसचे आमदार संजय दत्त आदींनी भरपूर निधी दिला. परंतु, तो सर्व पायवाटा, गटारे यांच्यासाठीच वापरला गेला. त्या विशेष निधीतून वेगळे असे वॉर्डासाठी काही करण्यात नगरसेवक कमी पडल्याचे स्पष्ट होते. कचराकुंडी मुक्त वॉर्ड असला तरीही परिसरात खासगी मालमत्तांमुळे विकास करता येत नाही, त्यामुळे बहुतांशी ठिकाणी मातीचे ढिगारे दिसून येतात. त्यामुळेही परिसराला बकाल अवस्था आली आहे. कुठेही सरळ रस्ते नाही, आडवळणाच्या पायवाटांना रस्त्याचे स्वरुप दिले असून एकावेळी अवघी एकच रिक्षा जाऊ शकते, दोन मोठी वाहने एकमेकांसमोर आल्यास पंचाईत होते. अंतर्गत, चिंचोळा वॉर्ड वाढलेला असतांनाही फेरीवाला समस्या असून फुटपाथ नावालाच आहेत. विरंगुळयाचे साधन नाही. एका शाळेसमोरील चौकाचे कधीकाळी थातुरमातूर सुशोभिकरण केले होते. हे सांगावे लागावे इतकी त्या चौकाची दुरवस्था झाली असून त्याला डागडुजीची गरज आहे. तेथे असलेले कारंजे तांत्रिक कारणाने बंद पडले आहेत. त्याच्या दुरुस्तीचे काम झाले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ५ वर्षांत केले काय? असा जनतेचा प्रश्न आहे.