शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

मतदान वाढण्यासाठी सर्वच केंद्रे आदर्श करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2019 1:19 AM

मतदारांची नावे वगळल्याने नाराजी : विशेष मोहीम राबवण्याची आवश्यकता, बदलापूरमध्ये यंदाही याद्यांमध्ये दिसला घोळ

अंबरनाथ/बदलापूर : मतदार यादीतील दुबार नावे वगळल्याचा दावा निवडणूक आयोग करित असला, तरी निवडणुकीची टक्केवारी वाढताना दिसत नाही. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोग संकल्प पुढे करित आहेत. विधानसभा क्षेत्रात एखाद दुसरे आदर्श मतदान केंद्र सुरु केले जाते. सखींसाठी खास केंद्र उभारले जाते; मात्र मतदानाची आकडेवारी वाढविण्यासाठी सर्वच मतदान केंद्रे ही आदर्श मतदान केंद्र करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून अनेक नावे वगळल्याने मतदारांना आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागले. यासंदर्भात मतदार याद्यांची पूर्ण तपासणी करुन वगळण्यात आलेली नावे पुन्हा यादीत समाविष्ट करण्यासाठी मोहिम हाती घेणे गरजेचे आहे. दुबार नावे वगळताना बीएलओकडून प्रभागात योग्य चाचपणी केली जात नाही. त्यामुळे दुबार नावाचे कारण पुढे करुन अनेकांची नावे वगळली गेली आहेत. यासंदर्भात योग्य कार्यवाही करण्याची मागणी काँग्रेसचे गटनेते प्रदिप पाटील यांनी केली आहे. आदर्श मतदान केंद्र आणि सखी मतदान केंद्राची संकल्पना चांगली आहे. मात्र मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वच मतदान केंद्र हे आदर्श केली पाहिजे. एखाद दुसरे मतदान केंद्र आदर्श करुन त्याचा कोणताही फायदा होणार नाही. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर सर्व सुविधा देणे बंधनकारक केले पाहिजे.

बदलापुरात नेहमीप्रमाणे या निवडणुकीतही मतदारयाद्यांचा घोळ समोर आला आहे. निवडणूक आयोगाने अलीकडेच नवीन ओळखपत्र देऊनही नवतरु ण मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे अनेक जुन्या मतदारांची नावेही यादीतून वगळल्याने मतदारांत संतापाचे वातावरण आहे. या सर्व परिस्थितीला मतदार यादीमधील घोळाला जबाबदार असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषी असणाºयांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांनी केली आहे. मतदारांसाठी शासकीय चिठ्ठी वाटणे आवश्यक असताना अशा कोणत्याही चिठ्ठी वाटल्या न गेल्याने सकाळी बहुतेक मतदान केंद्रांबाहेर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत होते. नव्या मतदारांना कोणत्याही प्रकारचे ओळखपत्रे, चिठ्ठी वाटण्यात न आल्याचा आरोप करण्यात येत आहे. अगदी अलीकडे नवीन युवकांना मतदार ओळखपत्रे मिळाली असून, अशा नवीन मतदारांची नावेच मतदारयादीत नसल्यामुळे तरूण मतदार मतदान केंद्रावरून माघारी गेले. मतदार यादीमधून नावे वगळण्याबाबत कॅप्टन आशिष दामले यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. स्थलांतरित, मयत अथवा दुबार नावे असलेल्यांची नावे मतदार यादीमधून वगळण्यात येत असतात. मात्र स्थलांतरितांची नावे वगळताना बीएलओकडून कोणतीही शहानिशा केली जात नाही, जुजबी विचारणा करून कुठेही नोटिसा बजावण्यात येत असतात. अशा नोटिसा एखाद्या कचराकुंडीवर अथवा वीज वितरणाच्या ट्रान्स्फार्मरवर चिकटवला गेल्या आहेत. मग अशा नावांची व्यवस्थित चौकशी न करता थेट नावे वगळण्यात आली असल्याचे निदर्शनास आल्याचे कॅप्टन आशिष दामले यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक महिने मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरु होते. ज्या मतदारांची नावे आहेत, मात्र अशा मतदारांची छायाचित्रे त्या यादीत नाहीत अशा मतदारांची छायाचित्रे गोळा करण्याची मोहीम राज्यभर राबविण्यात आली आहे. मात्र छायाचित्रे गोळा केलेल्या सर्वांची छायाचित्रे जबाबदार अधिकाºयांकडे दिली गेली नसल्याने अनेकांची नावे यादीमधून वगळण्यात आल्याचा आरोपही दामले यांनी केला आहे.

आता बहुतेक कामे ही ऑनलाईन पद्धतीने योग्य पद्धतीने होत आहेत. मतदार याद्याही ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या आणि मतदारांची आधारकार्डद्वारे लिंक केल्यास दुबार, मयत, स्थलांतरित अशा सर्वांची शहानिशा होऊ शकते. त्यासाठी मानिसकता असणे, आवश्यक असल्याचे दामले यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात निवडणूक आयोगाला तक्रार आणि स्थानिक पातळीवर येणाºया अडणींवर काय तोडगा काढावा यासाठी सूचना करणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक