शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

कर्जतमध्ये पोशीर नदीचा नाही ठाव; शासन म्हणते, धरण बांधणार राव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 13:26 IST

‘पोश्री’वरही प्रकल्प उभारण्यास शेतकऱ्यांचा विरोध

विजय मांडे लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : ठाणे जिल्ह्यातील महानगरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कर्जत तालुक्यातील पोशीर नदीवर मोठे धरण बांधण्याचे कोकण पाटबंधारे महामंडळाने जाहीर केले आहे. मात्र, पोशीर नावाची नदी येथे नसताना तिचा उल्लेख आला कसा, असा  प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे. पोशीर नदी अस्तित्वात नाही,  मात्र या भागात असलेल्या पोश्री नदीवर धरण बांधण्याचा प्रयत्न झाला तरी आम्हाला धरण नको, असा पवित्रा बोरगाव आणि चई येथील शेतकरी व ग्रामस्थांनी घेतला आहे.

कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडून कर्जत तालुक्यात धरण बांधण्याचा प्रस्ताव २०-२२ वर्षांपूर्वीचा आहे. आता मात्र महामंडळाने अधिसूचना जारी केली आहे. कर्जत तालुक्यात धरण बांधले जाणार असून, तीन गावे विस्थापित होणार आहेत. कर्जत तालुक्यात पोशीर नदी आहे कुठे?, असा प्रश्न लोकांना पडला आहे.  चिल्लार, पोश्री आणि पेज अशा तीन नद्या कर्जत तालुक्यात उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. त्यामुळे कोणत्या नदीवर धरण बांधणार?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्या भागात धरण बांधले जाणार आहे, तेथील शेतकऱ्यांची संमती आहे का? याबाबत कोणत्याही प्रकारची सुनावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे शासन स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सहमतीशिवाय पोशीर धरण बांधण्याचे धोरण कितपत योग्य आहे, असा प्रश्न बोरगावचे ग्रामस्थ सतीश पाटील यांनी केला आहे.

पोश्री नदीवर धरण बांधणार असेल तर ती भीमाशंकर अभयारण्यातील डाेंगरात उगम पावते. बेलाचीवाडी, नांदगाव अशी ही पोश्री नदी चई गावासमोरून धाबे वाडी येथून बोरगावच्या शिवारातून कळंबहून पोशीर गावाच्या बाजूने चिकनपाडा, मानिवली, खाड्याचा पाडा, अशी उल्हास नदीला जाऊन मिळते. उन्हाळ्यात ती कोरडी असते. बोरगाव, चई आणि चेवणे या गावांना विस्थापित करून धरण बांधले जाणार आहे. 

धरण कोणत्या नदीवर बांधणार, ते आधी सांगा?आधी धरण पोशीर नदीवर बांधले जाणार आहे? हे शासनाने जाहीर करावे. तसेच पोशीर नदी कुठून, कुठे वाहते? हे शासनाने जाहीर करावे. शासनाच्या कागदावर असलेल्या पोशीर नदीवर शासनाने जरूर धरण बांधावे, अशी चर्चा आहे.

टॅग्स :thaneठाणेKarjatकर्जतriverनदी