शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

कर्जतमध्ये पोशीर नदीचा नाही ठाव; शासन म्हणते, धरण बांधणार राव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 13:26 IST

‘पोश्री’वरही प्रकल्प उभारण्यास शेतकऱ्यांचा विरोध

विजय मांडे लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : ठाणे जिल्ह्यातील महानगरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कर्जत तालुक्यातील पोशीर नदीवर मोठे धरण बांधण्याचे कोकण पाटबंधारे महामंडळाने जाहीर केले आहे. मात्र, पोशीर नावाची नदी येथे नसताना तिचा उल्लेख आला कसा, असा  प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे. पोशीर नदी अस्तित्वात नाही,  मात्र या भागात असलेल्या पोश्री नदीवर धरण बांधण्याचा प्रयत्न झाला तरी आम्हाला धरण नको, असा पवित्रा बोरगाव आणि चई येथील शेतकरी व ग्रामस्थांनी घेतला आहे.

कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडून कर्जत तालुक्यात धरण बांधण्याचा प्रस्ताव २०-२२ वर्षांपूर्वीचा आहे. आता मात्र महामंडळाने अधिसूचना जारी केली आहे. कर्जत तालुक्यात धरण बांधले जाणार असून, तीन गावे विस्थापित होणार आहेत. कर्जत तालुक्यात पोशीर नदी आहे कुठे?, असा प्रश्न लोकांना पडला आहे.  चिल्लार, पोश्री आणि पेज अशा तीन नद्या कर्जत तालुक्यात उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. त्यामुळे कोणत्या नदीवर धरण बांधणार?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्या भागात धरण बांधले जाणार आहे, तेथील शेतकऱ्यांची संमती आहे का? याबाबत कोणत्याही प्रकारची सुनावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे शासन स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सहमतीशिवाय पोशीर धरण बांधण्याचे धोरण कितपत योग्य आहे, असा प्रश्न बोरगावचे ग्रामस्थ सतीश पाटील यांनी केला आहे.

पोश्री नदीवर धरण बांधणार असेल तर ती भीमाशंकर अभयारण्यातील डाेंगरात उगम पावते. बेलाचीवाडी, नांदगाव अशी ही पोश्री नदी चई गावासमोरून धाबे वाडी येथून बोरगावच्या शिवारातून कळंबहून पोशीर गावाच्या बाजूने चिकनपाडा, मानिवली, खाड्याचा पाडा, अशी उल्हास नदीला जाऊन मिळते. उन्हाळ्यात ती कोरडी असते. बोरगाव, चई आणि चेवणे या गावांना विस्थापित करून धरण बांधले जाणार आहे. 

धरण कोणत्या नदीवर बांधणार, ते आधी सांगा?आधी धरण पोशीर नदीवर बांधले जाणार आहे? हे शासनाने जाहीर करावे. तसेच पोशीर नदी कुठून, कुठे वाहते? हे शासनाने जाहीर करावे. शासनाच्या कागदावर असलेल्या पोशीर नदीवर शासनाने जरूर धरण बांधावे, अशी चर्चा आहे.

टॅग्स :thaneठाणेKarjatकर्जतriverनदी