शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

डाव्या, उजव्या मेंदूत समन्वय नाही; ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 07:01 IST

लेखकांनी उजवा मेंदू अधिक वापरावा, कारण आपल्या मनात जे येते ते खरे असते. कारण आपल्या नेणिवांमध्ये ते येत असते.  

ठाणे : माणसामध्ये डावा आणि उजवा असे दोन मेंदू कार्यरत असतात. त्यातील डावा मेंदू हा अतिवैचारिक असतो. तो सतत आपल्याला हे करू नको, ते करू नको अशा सूचना करत असतो, तर उजवा मेंदू हा भावनिक असतो, नेणिवांचा असतो. तो आपल्याला भावनिक व्हायला भाग पाडतो. या दोन्हीमध्ये समन्वय साधणे हे लेखकाचे काम असते. लेखकांनी उजवा मेंदू अधिक वापरावा, कारण आपल्या मनात जे येते ते खरे असते. कारण आपल्या नेणिवांमध्ये ते येत असते.  

उजवा मेंदू नेणिवांचेच काम करत असतो. फक्त लेखक म्हणून आपल्याला ती चौकट बरोबर सांभाळावी लागते. समतोल ठेवत संवेदन वास्तवाशी जोडत लोकांना योग्य ते शिकवत राहणे गरजेचे असते. लेखकांनी नेमके हेच करायला हवे, असे आग्रही प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी येथे बोलताना केले.  ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या राज्यस्तरीय लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात आयोजित प्रकट मुलाखतीत शंभू पाटील यांनी खुमासदार शैलीत नेमाडे यांना बोलते केले.  

हेच तर अच्छे दिन...चौकटीत लिहिणे बरेचदा दुर्देैवाने मला जमत नाही. त्यामुळेच गेली पाच वर्षे मी पोलिस सुरक्षेखाली आहे. ही खरे तर वाईट परिस्थिती आहे. ‘अच्छे दिन’ यालाच म्हणतात असं मी मानतो, असे नेमाडे म्हणाले.

स्मार्टफोनवर बंदी आणा  युरोपात आता मोबाइलवर बंदी आणायचे चालले आहे. मेंदूत ५०-६० सेंटर्स असतात, पण मोबाइलमुळे त्यापैकी तुमच्या मेंदूचा एकच भाग काम करतो. हे संशोधनातूनही समोर आलेले आहे. त्यामुळे कायदेशीररीत्या मोबाइलवर बंदी घातली गेली पाहिजे, असे ठाम मत नेमाडे यांनी यावेळी मांडले. 

‘हिंदू’चा पुढचा भाग कधी? भारत-पाकिस्तान संबंध सुधारणार का, सलमान खानचे लग्न होणार का, हे प्रश्न जसे वर्षानुवर्षे सतावतात, तसेच नेमाडेंच्या ‘हिंदू’चा पुढचा भाग येणार का, हा प्रश्न सतावत राहतो, असे मुलाखतकार शंभू पाटील यांनी विचारताच नेमाडे मिश्कील हास्य करत म्हणाले, हिंदू लिहायला मी १९७६ साली सुरुवात केली आणि ती प्रत्यक्षात प्रकाशित झाली २०१० साली. म्हणजे जवळपास ४० वर्षांनी... त्यामुळे पुढचा भागही ४० वर्षांनी येईल असे नाही. वर्षभरात ‘हिंदू’चा पुढचा भाग नक्की येईल. त्याच वेळी ‘सट्टक’ हा नवीन कवितासंग्रह येत असल्याचेही ते म्हणाले. 

राष्ट्रीयता ही तर अतिशय भंपक कल्पनाआदिम काळात मानव जसा शिकारी होता तसाच तो आजही आहे. आजही दर सेकंदाला कुठे ना कुठे बलात्कार, खून, मारामाऱ्या होत असतात. आरोपी वर्षानुवर्षे सापडत नाहीत, हेच आपले अच्छे दिन आहेत, अशी उपरोधिक टिप्पणी नेमाडे यांनी केली. मी पाकिस्तानात गेलो, चीनमध्येही गेलो आहे. तिथेही आपल्यासारखेच लोक आहेत. लोक सगळीकडे चांगलेच असतात, पण वाईट असतात ती त्या त्या देशांमधली सरकारे. विविध देशांमधील सरकारेच आपल्यामध्ये भांडणे लावून देतात, झुंजी लावून देतात. त्याच्या मुळाशी धर्म आणि राष्ट्रीयता असते. राष्ट्रीयता ही तर अतिशय भंपक कल्पना आहे. अशा स्थितीत लेखकांनी धर्म आणि राष्ट्रीयता न मानता सजगपणे लेखन करून ते थोपवायला हवे, असे आग्रही प्रतिपादन भालचंद्र नेमाडे यांनी या मुलाखतीवेळी केले. 

इंग्रजी माध्यमांच्या शाळा नकोच

आपल्याकडे इतर देशांच्या तुलनेत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याचे प्रमाण भयंकर वाढले असल्याचे सांगत इंग्रजी माध्यमांच्या शाळांवरही कायद्याने बंदी घातली पाहिजे, असे मत नेमाडे यांनी व्यक्त केले. नेमाडे म्हणाले की, कोरिया, चीन, जपान, फ्रान्स, जर्मनी हे कुणीच इंग्रजी शिकवत नाहीत. तिथे दोन-चार लोक इंग्रजी शिकून घेतात. पण आपल्या देशात ४०-५० टक्के लोक इंग्रजी शिकतात. इंग्रजी माध्यमात शिकतात हे चुकीचे आहे. हे कायद्यानेच बंद करण्याची परिस्थिती आज आहे. शेवटी सरकार कशासाठी आहे, असा सवाल नेमाडे यांनी उपस्थित केला.  

टॅग्स :Lokmatलोकमत