शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

ठाणे जिल्ह्यातील ग्रामस्थांना शुद्ध, शाश्वत पाणी उपलब्ध करून देण्याची गरज

By सुरेश लोखंडे | Updated: January 30, 2024 18:24 IST

जिल्हा परिषद अंतर्गत पाणी गुणवत्ता व सनियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सुरेश लोखंडे, ठाणे : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमा अंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेकडून आज जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असता त्यात होते. स ग्रामीण भागातील लोकांना शश्वात व स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी व्यक्त केली. 

जिल्हा परिषद अंतर्गत पाणी गुणवत्ता व सनियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप कुलकर्णी यांनी भूषवले. या कार्यशाळेसाठी व जिल्हा स्तरावरील खाते प्रमुख व तालुकास्तरावरील सर्व गटविकास अधिकारी, उपअभियंता, तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, आरोग्य कनिष्ठ अभियंता, गटसमन्वयक, समूह समन्वयक, पाणी गुणवत्ता निरीक्षक आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सध्या स्थितीत ठाणे जिल्ह्यातील पाणी गुणवत्ता व सर्वेक्षण व विविध प्रकारच्या पाणी नमुने तपासणी सद्यस्थिती या विभागाचे अधिकारी अनिल निचिते यांनी दिली. अध्यक्षीय भाषणात कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील सर्व गांवकऱ्यांना स्वच्छ व मुबलक पाणी जलद गतीने उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा जिल्ह्यात सक्रीय असल्याचे नमुद केले. कार्यशाळेच्या प्रमुख तांत्रिक मार्गदर्शक गायत्री चावरे यांनी विविध प्रकारच्या पाणी नमुने तपासणीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने पाणी गुणवत्ता सनियंत्रण, सर्वेक्षण, पाणी गुणवत्ता व्यवस्थापन आदींची सखोल माहिती देऊन पावसाचे पाणी कसे दुषित होते. पाणी प्रदूषणाचे प्रकार, ग्रामपंचायत भूमिका, जबाबदारी, लोकांचा सहवास, पाणी गुणवत्ता तपासून पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण, पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्याची कार्यपद्धती, क्लोरीन पावडर विषयी माहिती, ओ टी चाचणी कशी करण्यात यावी आदीचे सखाेल मार्गदर्शन या कार्यशाळेत देण्यात आले.

टॅग्स :Waterपाणी