शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाणी प्यावे लागत असल्याने संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:51 IST

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, टँकरने पुरवठा सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी

- रोहिदास पाटील अनगाव : भिवंडी महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पोगाव, ब्राह्मणपाडा येथील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासीपाड्यात पावसाळा संपल्यापासून येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील नागरिकांना खड्ड्यातील दूषित पाणी प्यावे लागत असल्याने महिलांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.भिवंडी पालिकेच्या प्रभाग-१ मध्ये हा पाडा येतो. या पाड्यात १५ वर्षांपासून नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. येथे पाणीपुरवठा विभागाने बोअरवेल व विहीरही केलेली नाही. त्यामुळे येथील आदिवासी कुटुंबांना खड्ड्यातील दूषित पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. पाण्यासह इतर सुविधांचीही येथे वानवा आहे. ज्या महापालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला, त्याच पालिकेच्या आदिवासीपाड्यात पाण्यासह स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत.उन्हाळ्यात खड्ड्यातील तर पावसाळ्यात पावसाचे पडणारे नाल्यातील दूषित पाणी पिण्याची येथील ग्रामस्थांवर वेळ आल्याने स्वच्छतेचा पुरस्कार घेणारे पालिका आयुक्त मनोहर हिरे या पाणीटंचाईकडे लक्ष देतील का, असा प्रश्न येथील आदिवासींनी केला आहे.पाणीटंचाईसंबंधी येथील महिलांनी पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता ए.एल. गायकवाड, सहायक आयुक्त बाळाराम जाधव यांची भेट घेऊन तक्र ार केली होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती सुरेखा चौधरी यांनी दिली. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात, असेही येथील महिलांचे म्हणणे आहे. या पाड्यातील टंचाईकडे स्थानिक नगरसेवकही दुर्लक्ष करत असल्याने महिला संतापल्या आहेत. या पाड्यात पालिकेने टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.पाणीटंचाईमुळे खड्ड्यातील दूषित पाणी येथील नागरिकांना प्यावे लागत आहे. या पाड्यात पालिकेने बोअरवेल मारून टँकरने पाणीपुरवठा सुरू न केल्यास श्रमजीवी संघटना पालिकेवर मोर्चा काढणार आहे. - सागर देसक, अध्यक्ष, श्रमजीवी संघटना, भिवंडी शहर तालुकाया पाड्यात टंचाई आहे. ग्रामस्थांनी तक्र ारी केलेल्या आहेत. यासंबंधी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.- बळीराम जाधव,सहायक आयुक्त

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई