शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

दूषित पाणी प्यावे लागत असल्याने संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:51 IST

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, टँकरने पुरवठा सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी

- रोहिदास पाटील अनगाव : भिवंडी महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पोगाव, ब्राह्मणपाडा येथील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासीपाड्यात पावसाळा संपल्यापासून येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील नागरिकांना खड्ड्यातील दूषित पाणी प्यावे लागत असल्याने महिलांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.भिवंडी पालिकेच्या प्रभाग-१ मध्ये हा पाडा येतो. या पाड्यात १५ वर्षांपासून नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. येथे पाणीपुरवठा विभागाने बोअरवेल व विहीरही केलेली नाही. त्यामुळे येथील आदिवासी कुटुंबांना खड्ड्यातील दूषित पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. पाण्यासह इतर सुविधांचीही येथे वानवा आहे. ज्या महापालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला, त्याच पालिकेच्या आदिवासीपाड्यात पाण्यासह स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत.उन्हाळ्यात खड्ड्यातील तर पावसाळ्यात पावसाचे पडणारे नाल्यातील दूषित पाणी पिण्याची येथील ग्रामस्थांवर वेळ आल्याने स्वच्छतेचा पुरस्कार घेणारे पालिका आयुक्त मनोहर हिरे या पाणीटंचाईकडे लक्ष देतील का, असा प्रश्न येथील आदिवासींनी केला आहे.पाणीटंचाईसंबंधी येथील महिलांनी पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता ए.एल. गायकवाड, सहायक आयुक्त बाळाराम जाधव यांची भेट घेऊन तक्र ार केली होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती सुरेखा चौधरी यांनी दिली. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात, असेही येथील महिलांचे म्हणणे आहे. या पाड्यातील टंचाईकडे स्थानिक नगरसेवकही दुर्लक्ष करत असल्याने महिला संतापल्या आहेत. या पाड्यात पालिकेने टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.पाणीटंचाईमुळे खड्ड्यातील दूषित पाणी येथील नागरिकांना प्यावे लागत आहे. या पाड्यात पालिकेने बोअरवेल मारून टँकरने पाणीपुरवठा सुरू न केल्यास श्रमजीवी संघटना पालिकेवर मोर्चा काढणार आहे. - सागर देसक, अध्यक्ष, श्रमजीवी संघटना, भिवंडी शहर तालुकाया पाड्यात टंचाई आहे. ग्रामस्थांनी तक्र ारी केलेल्या आहेत. यासंबंधी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.- बळीराम जाधव,सहायक आयुक्त

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई