शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

...तर केडीएमसी, एमआयडीसीचे पाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 05:23 IST

दररोज २६६ एमएलडी पाणीचोरी : लघुपाटबंधारे विभागाने दिली तंबी

सुरेश लोखंडे 

ठाणे : मंजूर पाणीपुरवठ्यापेक्षाएमआयडीसी सुमारे २०० दशलक्ष लीटर (एमएलडी) व कल्याण-डोेंबिवली महापालिका (केडीएमसी)सुमारे ६६ एमएलडी जादा पाणी उचलून चोरी करत असल्याचे पाहणीअंती उघड झाले. ही पाणीचोरी तत्काळ थांबवा, अन्यथा पाणीपुरवठाच बंद करण्याची कारवाई करण्याचे आदेश लघुपाटबंधारे विभागाने दिल्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहेत.

धरणसाठ्यामध्ये यंदा सुमारे २२ टक्के पाण्याची तूट आहे. ही भरून काढण्यासाठी २२ आॅक्टोबरपासून महापालिका, नगरपालिकांसह एमजेपी, टेमघर आदी पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांना २२ टक्के पाणीकपात लागू केली आहे. या कपातीसाठी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचे सर्वानुमते मान्यही झाले. त्यानुसार, आता सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवसांच्या कालावधीत ठिकठिकाणी होणारा पाणीपुरवठा एक दिवस पूर्ण बंद ठेवला जात आहे. परंतु, एमआयडीसी त्यांच्या ५८३ एमएलडी या दैनंदिन मंजूर पाणीपुरवठ्यापेक्षा ७५० ते ८०० एमएलडी पाणी रोज उचलत असल्याचे पाहणीत उघड झाले. याप्रमाणेच केडीएमसीदेखील त्यांच्या २३४ एमएमलडी मंजूर कोट्यापेक्षा सुमारे ३०० एमएलडी पाणी उचलत असल्याची बाब निदर्शनास आली.या प्रकारे चोरून जादा पाणी उचलत राहिल्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होईल. त्यांच्या या पाणीचोरीचा फटका जिल्ह्यातील सर्व नागरिकांना बसून जादा पाणीकपात सोसावी लागेल. यामुळे ठाण्यासह उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिकांसह अंबरनाथ व बदलापूर या दोन्ही नगरपालिकांच्या नागरिकांवर अन्याय होईल. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन एमआयडीसी व केडीएमसीला त्यांची मनमानी पाणीचोरी तत्काळ थांबवण्याचे आदेश पाटबंधारे विभागाने जारी केले. अन्यथा उल्हास नदी, बारवी धरण आदी ठिकाणांहून होणारा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई करण्याची तंबी खास बैठक घेऊन देण्यात आली आहे. यामुळे आता त्यांच्याकडून जादा पाण्याची चोरी होणार नसल्याची अपेक्षा पाटबंधारे प्रशासनाने व्यक्त केली आहे.दिवाळीचा जादा पाणीपुरवठा बंददिवाळी संपलेली असल्यामुळे आधी लागू केलेली २२ टक्के पाणीकपात आता पूर्ववत करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील कारखाने, कंपन्यांसह उल्हासनगर मनपा आदी ठिकाणी होणारा पाणीपुरवठा एमआयडीसी शुक्रवारी बंद ठेवणार असून अन्य दिवशी ५८३ एमएलडी मंजूर कोटा उचलणे भाग पडणार आहे.याप्रमाणेच कल्याण-डोंबिवलीचा २३४ एमएलडी पाणीपुरवठा मंगळवारी बंद ठेवण्यात येईल. तर, स्टेमद्वारे उचलण्यात येणारा २८५ एमएलडी पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार आहे. यामुळे भिवंडी, मीरा-भार्इंदर व घोडबंदरसह ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.याशिवाय अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांना पाणीपुरवठा करणाºया महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) सोमवारी तो बंद ठेवला जाईल. अन्य दिवशी त्यांना ९० एमएलडी पाणी उचलावे लागणार आहे. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMIDCएमआयडीसीWaterपाणी