शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

...तर केडीएमसी, एमआयडीसीचे पाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 05:23 IST

दररोज २६६ एमएलडी पाणीचोरी : लघुपाटबंधारे विभागाने दिली तंबी

सुरेश लोखंडे 

ठाणे : मंजूर पाणीपुरवठ्यापेक्षाएमआयडीसी सुमारे २०० दशलक्ष लीटर (एमएलडी) व कल्याण-डोेंबिवली महापालिका (केडीएमसी)सुमारे ६६ एमएलडी जादा पाणी उचलून चोरी करत असल्याचे पाहणीअंती उघड झाले. ही पाणीचोरी तत्काळ थांबवा, अन्यथा पाणीपुरवठाच बंद करण्याची कारवाई करण्याचे आदेश लघुपाटबंधारे विभागाने दिल्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहेत.

धरणसाठ्यामध्ये यंदा सुमारे २२ टक्के पाण्याची तूट आहे. ही भरून काढण्यासाठी २२ आॅक्टोबरपासून महापालिका, नगरपालिकांसह एमजेपी, टेमघर आदी पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांना २२ टक्के पाणीकपात लागू केली आहे. या कपातीसाठी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचे सर्वानुमते मान्यही झाले. त्यानुसार, आता सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवसांच्या कालावधीत ठिकठिकाणी होणारा पाणीपुरवठा एक दिवस पूर्ण बंद ठेवला जात आहे. परंतु, एमआयडीसी त्यांच्या ५८३ एमएलडी या दैनंदिन मंजूर पाणीपुरवठ्यापेक्षा ७५० ते ८०० एमएलडी पाणी रोज उचलत असल्याचे पाहणीत उघड झाले. याप्रमाणेच केडीएमसीदेखील त्यांच्या २३४ एमएमलडी मंजूर कोट्यापेक्षा सुमारे ३०० एमएलडी पाणी उचलत असल्याची बाब निदर्शनास आली.या प्रकारे चोरून जादा पाणी उचलत राहिल्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होईल. त्यांच्या या पाणीचोरीचा फटका जिल्ह्यातील सर्व नागरिकांना बसून जादा पाणीकपात सोसावी लागेल. यामुळे ठाण्यासह उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिकांसह अंबरनाथ व बदलापूर या दोन्ही नगरपालिकांच्या नागरिकांवर अन्याय होईल. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन एमआयडीसी व केडीएमसीला त्यांची मनमानी पाणीचोरी तत्काळ थांबवण्याचे आदेश पाटबंधारे विभागाने जारी केले. अन्यथा उल्हास नदी, बारवी धरण आदी ठिकाणांहून होणारा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई करण्याची तंबी खास बैठक घेऊन देण्यात आली आहे. यामुळे आता त्यांच्याकडून जादा पाण्याची चोरी होणार नसल्याची अपेक्षा पाटबंधारे प्रशासनाने व्यक्त केली आहे.दिवाळीचा जादा पाणीपुरवठा बंददिवाळी संपलेली असल्यामुळे आधी लागू केलेली २२ टक्के पाणीकपात आता पूर्ववत करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील कारखाने, कंपन्यांसह उल्हासनगर मनपा आदी ठिकाणी होणारा पाणीपुरवठा एमआयडीसी शुक्रवारी बंद ठेवणार असून अन्य दिवशी ५८३ एमएलडी मंजूर कोटा उचलणे भाग पडणार आहे.याप्रमाणेच कल्याण-डोंबिवलीचा २३४ एमएलडी पाणीपुरवठा मंगळवारी बंद ठेवण्यात येईल. तर, स्टेमद्वारे उचलण्यात येणारा २८५ एमएलडी पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार आहे. यामुळे भिवंडी, मीरा-भार्इंदर व घोडबंदरसह ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.याशिवाय अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांना पाणीपुरवठा करणाºया महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) सोमवारी तो बंद ठेवला जाईल. अन्य दिवशी त्यांना ९० एमएलडी पाणी उचलावे लागणार आहे. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMIDCएमआयडीसीWaterपाणी