शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

...तर कागज नही दिखाएंगे सत्याग्रहाचा युवकांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 01:02 IST

ठाण्यात रंगला युवा टॉक शो

ठाणे : भारतीय संविधानाने राणीच्या पोटातून जन्म घेणाऱ्या राजाची राजेशाही व संस्थानिकांची मनमानी संपवून देशातील जनतेला समान हक्क देऊन विषमतेतून मुक्तीची वाट दाखवली आहे. त्यामुळे संविधानातील लोकशाही, स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांच्या रक्षणासाठी, युवा रस्त्यावर उतरले आहेत. न्यायालयाने न्याय दिला तर ठीकच, नाहीतर महात्मा गांधींच्या शिकवणुकीनुसार, नागरिकता दुरु स्ती कायदा हा धर्माधारित भेदभाव करणारा आणि संविधानाच्या आत्म्याशी फारकत घेणारा असल्याने, त्या विरु द्ध ‘कागज नहीं दिखाएंगे’ हा सत्याग्रहही युवक करतील, असा इशारा युवा टॉक शो मध्ये युवकांनी दिला.

महात्मा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त संविधान, नागरिकता व युवकांचे हक्क या विषयावर समता विचार प्रसारक संस्था आणि म्यूज फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ होते. यावेळी चर्चेत युवक म्हणाले की, देशातील नागरिकांकडून पुरावे मागणे हे गोरगरीब, प्रकल्पग्रस्त, आदिवासी आदींसाठी जिकिरीचे ठरू शकते. केवळ राष्ट्रध्वजाचा किंवा राष्ट्रगीताचा मान म्हणजे भारतीयत्व नाही, तर आपापल्या जबाबदाºया नेकीने पार पडणे, भ्रष्टाचार, अन्याय न करणे हे खरे भारतीयत्व आहे. नागरिकता कायदा दुरुस्ती प्रस्ताव मंजूर करताना, त्यावर संसदेत व संसदेबाहेर साधकबाधक चर्चा होणे अत्यावश्यक होते.

विद्यमान सरकारने रोजगाराचा हक्क डावलला

युवकांचे चांगले शिक्षण घेण्याचा, शिक्षण पूर्ण झाल्यावर रोजगार मिळवण्याचा हक्क विद्यमान सरकारने डावलला असून त्याविरु द्ध युवक आंदोलन करत आहेत. देशातील वाढती महागाई, सार्वजनिक उद्योग सावरणे, विकासाचा दर सुस्थितीत राखणे हे सरकारला जमत नसल्यामुळे नागरिकता कायदा दुरु स्ती आणि त्यापाठोपाठ येऊ घातलेले नागरिक नोंदणी आणि जनसंख्या नोंदणी हेही अनावश्यक असल्याचे मत आसामच्या विशिष्ट परिस्थितीचा दाखल देऊन या युवकांनी मांडले. प्रथमेश्वर उंबरे, कपिल खंडागळे, जुही शहा, रिंकल भोईर, यश माडगावकर, सोनू गुप्ता, सर्वेश अकोलकर आणि नीरज आठवले या विद्यार्थी- युवकांनी टॉक शोमध्ये आपली मते मांडली.

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र