शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

त्यांचे लक्ष केवळ स्वत:ची तिजोरी भरण्याकडेच; विजय वडेट्टीवारांचा आरोप, कळवा रुग्णालयाला भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 06:33 IST

ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्या नशिबी पश्चात्तापाची वेळ आल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :  राज्यात सत्तेची साठमारी सुरू असून यातून केवळ राज्याची तिजोरी लुटण्याचे काम सध्या सुरू आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर असलेले ४० आणि आता जे गेले आहेत ते ४० आमदार हे सर्व आपापल्या समर्थकांची तिजोरी भरण्याचे काम करत आहेत. ज्यांना मंत्रिपद मिळाले त्यांची तिजोरी भरली जात आहे. मात्र, ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्या नशिबी पश्चात्तापाची वेळ आल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

कळवा रुग्णालयात झालेल्या १८ मृत्यू प्रकरणाच्या घटनेनंतर गुरुवारी वडेट्टीवार यांनी कळवा रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपने घराणेशाहीविरुद्ध घेतलेल्या भूमिकेबाबत त्यांना छेडले असता, जेव्हा सगळे पर्याय संपतात त्यावेळेस भाजपला गांधी परिवार दिसतो. गांधी परिवाराकडे बोट दाखवले जाते, दहा वर्षांत उपलब्धी दाखवली असती, जनतेच्या भरवशावर मते मागितली असती तर राष्ट्रवादीसारख्या पुरोगामी पक्षाची गरजच भाजपला वाटली नसती, असा आरोप त्यांनी केला. 

तुम्ही स्वत:ला हिंदुत्ववादी, हिंदुत्वाचे मसिहा समजता, विदेशात जाऊन गोडवे गाता. मात्र, देशातील जनतेला तुम्ही काहीच दिले नसल्याचेही ते म्हणाले. दहा वर्षे सत्तेत असताना आता भाजपला परिवार म्हणण्याचा अधिकार कुठे उरतो, केवळ त्यांना गांधी या नावाची भीती असल्यानेच आता घराणेशाही किंबहुना परिवारवाद हा एकच पर्याय पुढे केला जात असल्याचेही ते म्हणाले.

२०२४ मध्ये ते जनतेच्या भरवशावर नाही तर ईव्हीएमच्या भरवशावर झेंडा फडकवणार असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. राज्यातील सरकारमध्ये सध्या सगळेच आलबेल सुरू आहे. एकाने घोडा लाथ मारतो म्हणून गाढवापुढे उभे राहावे, तर दुसऱ्याने गाढव लाथ मारतो म्हणून घोड्याला दोष देत बसावे, अशीच परिस्थिती राज्यातील सरकारची असल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारkalwaकळवाhospitalहॉस्पिटल