शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

त्यांचे लक्ष केवळ स्वत:ची तिजोरी भरण्याकडेच; विजय वडेट्टीवारांचा आरोप, कळवा रुग्णालयाला भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 06:33 IST

ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्या नशिबी पश्चात्तापाची वेळ आल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :  राज्यात सत्तेची साठमारी सुरू असून यातून केवळ राज्याची तिजोरी लुटण्याचे काम सध्या सुरू आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर असलेले ४० आणि आता जे गेले आहेत ते ४० आमदार हे सर्व आपापल्या समर्थकांची तिजोरी भरण्याचे काम करत आहेत. ज्यांना मंत्रिपद मिळाले त्यांची तिजोरी भरली जात आहे. मात्र, ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्या नशिबी पश्चात्तापाची वेळ आल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

कळवा रुग्णालयात झालेल्या १८ मृत्यू प्रकरणाच्या घटनेनंतर गुरुवारी वडेट्टीवार यांनी कळवा रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपने घराणेशाहीविरुद्ध घेतलेल्या भूमिकेबाबत त्यांना छेडले असता, जेव्हा सगळे पर्याय संपतात त्यावेळेस भाजपला गांधी परिवार दिसतो. गांधी परिवाराकडे बोट दाखवले जाते, दहा वर्षांत उपलब्धी दाखवली असती, जनतेच्या भरवशावर मते मागितली असती तर राष्ट्रवादीसारख्या पुरोगामी पक्षाची गरजच भाजपला वाटली नसती, असा आरोप त्यांनी केला. 

तुम्ही स्वत:ला हिंदुत्ववादी, हिंदुत्वाचे मसिहा समजता, विदेशात जाऊन गोडवे गाता. मात्र, देशातील जनतेला तुम्ही काहीच दिले नसल्याचेही ते म्हणाले. दहा वर्षे सत्तेत असताना आता भाजपला परिवार म्हणण्याचा अधिकार कुठे उरतो, केवळ त्यांना गांधी या नावाची भीती असल्यानेच आता घराणेशाही किंबहुना परिवारवाद हा एकच पर्याय पुढे केला जात असल्याचेही ते म्हणाले.

२०२४ मध्ये ते जनतेच्या भरवशावर नाही तर ईव्हीएमच्या भरवशावर झेंडा फडकवणार असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. राज्यातील सरकारमध्ये सध्या सगळेच आलबेल सुरू आहे. एकाने घोडा लाथ मारतो म्हणून गाढवापुढे उभे राहावे, तर दुसऱ्याने गाढव लाथ मारतो म्हणून घोड्याला दोष देत बसावे, अशीच परिस्थिती राज्यातील सरकारची असल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारkalwaकळवाhospitalहॉस्पिटल