शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘जिवा महाला’वर रंगमंचीय आविष्कार ठाण्यात

By admin | Updated: May 30, 2017 05:40 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी आयुष्यात ज्यांचा ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ असा अभिमानाने उल्लेख होतो, त्या जिवा

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी आयुष्यात ज्यांचा ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ असा अभिमानाने उल्लेख होतो, त्या जिवा महालाच्या आयुष्यावर प्रसिद्ध लेखक प्रा. प्रदीप ढवळ यांनी कादंबरी रचली आहे. त्याच कादंबरीवर आधारित मंदार टिल्लू नाटक लिहीत असून त्याचा पहिला प्रयोग गडकरी रंगायतनमध्ये होणार असल्याची माहिती टिल्लू यांनी दिली. रविवारी जिवा महाला यांचे चौदावे वंशज प्रकाश यांची पत्नी जयश्री ठाण्यात होत्या. त्या वेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची जगण्यासाठी होणारी ओढाताण व्यक्त केली होती. ‘आमचे राहते घर बारावे वंशज महादेव यांनी बांधले होते. मुलगा प्रतीकचे शिक्षण पूर्ण व्हावे, ही इच्छा आहे. मुलगी प्रतीक्षा ही दहावी पास झाली आहे. परंतु, आर्थिक परिस्थितीमुळे तिला पुढचे शिक्षण देणे आमच्यासाठी कठीण आहे. ती अभ्यासात प्रचंड हुशार आहे. शासनाकडून आजवर आम्ही दुर्लक्षित राहिलो आहोत, असे जयश्री यांनी सांगितले.प्रा. ढवळ म्हणाले, फेब्रुवारी महिन्यात सुरत येथे ‘शिवबा’ हे महानाट्य होते. या वेळी नाभिक समाजाची मंडळी मला भेटली. जिवा महाला हे आमचे दैवत आहे. आपण त्यांच्यावर कादंबरी लिहू शकलात, तर त्यांची ओळख संपूर्ण देशाला होईल. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिवा महाला यांच्यावर साहित्य वाचायला घेतले. परंतु, चारपाच ओळी सोडल्या, तर त्यांचा कुठेही उल्लेख नाही. त्यांच्याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी त्यांच्या वंशाचा शोध सुरू केला. या वेळी त्यांची चौदावी पिढी ही वाई-अकोली मार्गावरील कोंढवली गावात असल्याची माहिती मिळाली. हे गाव कमळगडाच्या पायथ्याशी आहे. गावकऱ्यांकडून या कुटुंबीयांची माहिती मिळाली. त्यांच्या घरी गेल्यावर समजले की, जिवा महाला यांचे तेरावे वंशज बाळासाहेब यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांचे चौदावे वंशज प्रकाश हे गेल्या पाच वर्षांपासून विकलांग आहेत. त्यांचा मुलगा प्रतीक हा आता सातवीत गेला आहे. प्रकाश आणि त्यांची पत्नी जयश्री यांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली की, प्रतीकच्या शिक्षणाची सोय झाली, तर बरे होईल. या वेळी त्यांच्या इच्छेचा मान राखत प्रतीकच्या आठवीपासूनच्या शिक्षणाची जबाबदारी आनंद विश्व गुरुकुलने घेतली आहे. त्याची निवासव्यवस्था शहरातच केली जाणार आहे, असे लेखक प्रा. प्रदीप ढवळ यांनी सांगितले. ते म्हणाले की, जिवा महाला यांच्यावर कादंबरी लिहून झाली असून या कादंबरीचे प्रकाशन कोंढवली गावात करण्याचा मानस आहे. २००-२५० पानांची ही कादंबरी आहे. या कादंबरीचे नाव अद्याप ठरलेले नाही, असे ते म्हणाले. मंदार टिल्लू छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी ज्यांनी मदत केली, त्यातील काही व्यक्तिमत्त्वे शिवबा या नाटकामध्ये आली. प्रत्येक व्यक्तिमत्त्वावर स्वतंत्र नाटक होऊ शकते, असे मनात आले आणि आता योगायोगाने जिवा महाला यांच्यावरील कादंबरीदेखील येत आहे. या कादंबरीतील अनेक प्रसंग नाट्यस्वरूपात दाखवले, तर ते रसिकांना जास्त कळतील, भिडतील, भावतील. जिवा महाला यांच्यावरील नाटक करताना त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरचा प्रचंड विश्वास हे दाखवण्याची जबाबदारी आहे. हे नाटक वेगळ्या फॉर्ममध्ये म्हणजेच रेकॉर्डेड असेल. नाटकाचे नाव अद्याप ठरले नसून या नाटकात नवीन स्थानिक कलाकार असतील. दिवाळीपर्यंत हे नाटक रंगमंचावर असेल. नाटकाचा पहिला प्रयोग हा गडकरी रंगायतन येथे होणार आहे. सध्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे, असे या नाटकाचे लेखक मंदार टिल्लू म्हणाले.