शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
4
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
5
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
6
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
7
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
8
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
9
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
10
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
11
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
12
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
13
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
14
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
15
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
16
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
17
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
18
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
19
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

खाडीत पडलेली तरुणी सात तासांनी सापडली; भाईंदर खाडीच्या रेल्वे पुलावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 07:38 IST

स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने नवघर पोलिसांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण ती सापडली नाही. 

मीरा रोड : भाईंदरच्या रेल्वे पुलावरून  सायंकाळी खाडीत पडलेली तरुणी तब्बल सात तासांनंतर चौक जेट्टीजवळील खाडी किनारी नांगरलेल्या बोटीजवळ सापडली. दलदलीच्या ठिकाणी रात्री दोनच्या सुमारास महिलेचा आवाज ऐकून बोटीवरील मच्छीमारांची बोबडीच वळली; परंतु नंतर ती महिला असल्याची खात्री पटल्यावर तिला बोटीत घेऊन किनाऱ्यावर आणले. 

भाईंदर खाडीवरील रेल्वे पुलावर सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाकडून कमालीचे दुर्लक्ष केले जात असल्याने पुलावरून खाडीत उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या अथवा पुलावरून खाली पडण्याच्या घटना वाढत आहेत. काही दिवसांपूर्वीच खाडी पुलावरून खाडीत पडलेल्या एका अल्पवयीन मुलीला वाचवण्यात आले होते. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास पुलावरून रंजना विश्वकर्मा (रा. संतोष भुवन, नालासोपारा) ही तरुणी पुलावरून खाडीत पडली. त्यावेळी स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने नवघर पोलिसांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण ती सापडली नाही. 

निर्जन आणि दलदलीचा  असा आहे हा भाग 

दरम्यान वादळी वारे व मुसळधार पाऊस असल्याने उत्तन-चौक भागातील मच्छीमार बोटी किनाऱ्याला आल्या असून चौक जेट्टीजवळील खाडी किनारी नांगरण्यात आल्या आहेत. हा भाग अतिशय निर्जन व दलदलीचा असून येथे कोणी चालत जाऊ शकत नाही. चौक जेट्टीवर जायचे तर लहान बोटीने ये-जा करावी लागते. हॉली स्काय बोटीचे मालक ऑलिव्हर बांड्या  व अन्य मच्छीमार, खलाशी हे बोटीवर झोपले असताना  रविवारी रात्री दोनच्या सुमारास अचानक एका महिलेचा आवाज येऊ लागला. 

मच्छीमारांनी खातरजमा करून रंजनाला बोटीवर आणले. चहा व कपडे दिले. भरती आल्यावर लहान बोटीने तिला जेट्टीवर आणून उत्तन पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी रंजनाचा प्राथमिक जबाब घेऊन नवघर पोलिसांकडे सोपवले. तिचा भाऊ काही महिन्यांपूर्वी खाडी पुलावरून पडून मरण पावल्याने ती मैत्रिणीसह पुलावर आली होती. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर