शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रताप;  उल्हासनगरातील वालधूनी नदीवरील पुलाचे उद्घाटन व नामांतरण 

By सदानंद नाईक | Updated: January 3, 2025 20:05 IST

पुलाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली.

सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-३ मधील उल्हासनगर रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या वालधुनी नदीवरील पुलाचे उदघाटन व नामांतरण शुक्रवारी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले. पुलाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली.

 उल्हासनगर कॅम्प-३ येथील रेल्वे स्टेशनला जोडणारा वालधुनी नदीवरील पूल नव्याने बांधण्यात आला. मात्र पूलाचे लोकार्पण झाले नसल्याने, वाहनास जाण्यास मनाई आहे. अखेर शुक्रवारी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त पुलाचे उद्घाटन केले. तसेच सदर पुलाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे. अशी मागणी केली. या नावाला स्थानिक नागरिकांनाचा पाठिंबा असल्याची माहिती शिवाजी रगडे यांनी दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे फलक पुलावर लावण्यात आले. दरम्यान महापालिका प्रशासनाने आता हेच नाव पुलाला देऊन मोठे फलक लावावे. असी मागणी स्थानिकांनी केली. 

वालधुनी पुलाचे उदघाटन व नामांतर वेळी शरद पवार गटाचे शहर प्रवक्ते शिवाजी रगडे, ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख भगवान मोहिते, विभाग प्रमुख दशरथ चौधरी, आदिनाथ पालवे यांच्यासह अशोक जाधव, मॉन्टी राजपुत, शशी भुषण सिंग, साहेबराव ससाणे, मॅडी स्टलिन, साऊद खान, ॲड महेश फुंदे, अझीझ शेख, सिराज खान आदिजण उपस्थित होते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर