शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या गावपाड्यांना तीन वर्षाच्या तुलनेत अधिक ३० टँकरने पाणी पुरवठा

By सुरेश लोखंडे | Updated: April 9, 2024 18:59 IST

शहापूर तालुक्याला गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक ३० टँकरने यंदा पाणी पुरवठा हाेत आहे. त्यानुसार मुरबाड, भिवंडी, अंबरनाथच्या गावपाड्यात अत्यल्प टंचाई दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या माेठमाेठ्या तलावांचे मुबलक पाणी मुंबई, नवी मुंबई, ठाणे आदी महानगरांसह आशिया खंडातील सर्वात माेठ्या एमआयीडीसींमधील कारखान्यांना पुरवण्यात येत आहे. मात्र या ग्रामीण, दुर्गम भागातील गांवपाडे मात्र दरवर्षांप्रमाणे यंदाही तीव्र पाणी टचाईला ताेंड देत आहे. प्रामुख्याने शहापूर तालुक्याला गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक ३० टँकरने यंदा पाणी पुरवठा हाेत आहे. त्यानुसार मुरबाड, भिवंडी, अंबरनाथच्या गावपाड्यात अत्यल्प टंचाई दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

बृहन्मुंबईला, ठाणे या स्मार्ट सिटील शहापूरच्या ग्रामीण, दुर्गम गांवखेड्यांजवळील भातसा, तानसा, माेडकसागर, मध्यवैतरणा आदी माेठमाेठ्या जलाशयातून पाणी पुरवठा हाेत आहे. मात्र या तालुक्यातील गावकरी, आदिवासी मात्र तीव्र पाणी टंचाईच्या झळांनी हाेरपळला जात आहे. या शहापूरच्या १४८ गांवपाड्यांमध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई सुरू आहे. त्यामध्ये २६ महसूली गांवे, १२२ पाडे पाणी टंचाईच्या झळांनी त्रस्त आहेत. त्यांना तब्बल ३३ टँकरने पाणी पुरवठा हाेणे अपेक्षित आहे. मात्र अवघ्या ३० टँकरने अवघ्या १२६ गांवपाड्यांना पाणी पुरवठा केला जात आहे. २०२१ ते २०२३ या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा कमी अधीक दुप्पट टँकरने आजच्या दिवशी पाणी पुरवठा केला जात आहे. उर्वरित २२ गांवपाडे आजपर्यंतही टँकरच्या पाणी पुरवठयापासून वंचित दिसून येत असल्याचे वास्तव शहापूरमध्ये भयानक दिसून येत आहे.

शहापूरच्या आपटे, मधलीवाडी, खंडवीवाडी, मानेखिंड, आंबेखाेर,अस्नाेली, दहिवली, मसणेपाडा, कवऱ्याची वाडी, मुसईवाडी, तर खासदार दत्तकगांव म्हणून नावारूपाला आलेले विहिगांवजवळील निरगुडवाडी आदी दाेन गावे १७ पाड्यांना तीव्र पाणी टंचाई सुरू झाली आहेत. त्यांना तीन टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा म्हणून प्रस्तावही देण्यात आलेला आहे. मात्र या गावकऱ्यांचा प्रस्ताव निवडणुकीच्या कामाच्या नावाखाली दुर्लक्षित असून धुळखात पडून आहे. या गावपाड्यांसह तीव्र पाणी टंचाई २२ गांवपाड्यांना असून ते टँकरच्या प्रतिक्षेत आहेत.

टॅग्स :thaneठाणेwater scarcityपाणी टंचाई