शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बसमध्येच भरली शाळा, गिरवताहेत बाराखडी; वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी ‘समतोल’ उपक्रम

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: January 2, 2024 13:26 IST

‘स्कूल इन बस’ ही संकल्पना ‘समतोल’ने राबविली असून, चक्क बसमध्ये ही मुले शिकत आहेत.

ठाणे : रोजीरोटीसाठी वीटभट्टी कामगारांना सातत्याने स्थलांतरित व्हावे लागते. त्यामुळे वीटभट्टी कामगारांची कितीतरी मुले शाळाबाह्य आहेत. याच मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी समतोल फाउंडेशनने चक्क शाळाच त्यांच्या दारी नेली आहे. ‘स्कूल इन बस’ ही संकल्पना ‘समतोल’ने राबविली असून, चक्क बसमध्ये ही मुले शिकत आहेत.

मुरबाडमध्ये ८० वीटभट्ट्या आहेत. हे कामगार आपल्या मुलांना शाळेत पाठवतीलच, याची शाश्वती नाही. त्यामुळे ‘स्कूल इन बस’च्या माध्यमातून शाळाच या मुलांच्या दारात नेली, अशी माहिती संस्थेचे सर्वेसर्वा विजय जाधव यांनी दिली. सध्या २५० मुलांपर्यंत पोहोचण्यात संस्थेला यश आले आहे. 

ग्रामीण भागात शाळाबाह्य मुलांचा प्रश्न तसाच आहे. त्याकडे सरकार कधी पाहणार? आणि अशा मुलांसाठी संस्था तरी किती पुरी पडणार, असा प्रश्नही जाधव यांनी उपस्थित केला. या मुलांच्या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत लक्षवेधीमध्ये प्रश्न विचारला होता. मात्र, अद्याप त्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिलेले नाही, असे जाधव यांनी सांगितले.

तीन तासांची शाळापालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना तारेवरची कसरत करावी लागली. गेल्या वर्षभरात २५० मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली असून, यात ४५ मुलींचा समावेश आहे. या बसला शाळेसारखे स्वरूप दिले आहे. बेंच, बोर्ड, दप्तर सारेच यात आहेत. यासाठी दोन शिक्षकांची नियुक्ती केली आहेत. ही शाळा तीन तास चालते आणि दिवसातून पाच ठिकाणी जाते.

८०० मुले शाळाबाह्यशिक्षण मिळणे हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे. परंतु, असे असतानाही कितीतरी मुले ही शाळाबाह्य आहेत. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याचा दावा सरकारने केला असला, तरी शाळाबाह्य मुलांची संख्या मोठी असल्याचे स्वयंसेवी संघटनांचे म्हणणे आहे. या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. मुरबाड तालुक्यातील वेगवेगळ्या पाड्यांमध्ये वीटभट्टी कामगार स्थलांतरित झाले आहेत.  स्थलांतरामुळे जवळपास ८०० मुले ही शाळाबाह्य आहेत.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी