शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

ठाणेकरांनी वैचारिकतेचा टेंभा का बरे मिरवावा?

By संदीप प्रधान | Updated: December 4, 2023 09:25 IST

ठाणे जिल्ह्यातील १११ ग्रंथालयांपैकी सहा ग्रंथालयांचे अनुदान शासनाकडून अलीकडेच बंद करण्यात आले.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर वगैरे शहरांमध्ये सांस्कृतिक व वैचारिक चळवळी चालतात, याचा टेंभा मिरवणे चुकीचे आहे. कारण, सुमारे ८० लाख ते एक कोटी लोकसंख्येच्या या जिल्ह्यात एकूण ९७ ग्रंथालये असून, सभासद संख्या जेमतेम ३४ हजार ९८२ आहे. कोरोना काळात ग्रंथालयांच्या सभासद संख्येत झालेली घसरण सावरली नाही. ठाण्यातील लोकांनी मॉल्स, मल्टिप्लेक्सला जाणे, मंदिर-मदिरालयात जाणे टाकळे नाही. परंतु, वाचनालयाकडे पाठ फिरवली ती फिरवलीच. वैचारिकतेशी जर ठाणेकरांचे नाते घटले असेल तर आपण उगाच टेंभा का मिरवायचा? 

ठाणे जिल्ह्यातील १११ ग्रंथालयांपैकी सहा ग्रंथालयांचे अनुदान शासनाकडून अलीकडेच बंद करण्यात आले. त्यापैकी चार ग्रंथालयांची मान्यता काढण्यात आली. दोन ग्रंथालयांना अकार्यक्षम ठरवण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रंथालयांची संख्या ९७ झाली आहे. अंबरनाथ नगरपालिकेचे व कल्याण-डोंबिवली महापालिकेचे वाचनालय अकार्यक्षम ठरले. ही मोठी नामुश्कीची बाब आहे. शासनाला अहवाल पाठवले नाही, आवश्यक उपक्रम राबवले नाही या कारणास्तव ही ग्रंथालये अकार्यक्षम ठरवली गेली. महापालिका व नगरपालिका रस्ते दुरुस्ती, घनकचरा व्यवस्थापन वगैरे कामांवर कोट्यवधी रुपये खर्च करतात. अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामातील अनियमितता उघड होते. मात्र, आपली ग्रंथालये अकार्यक्षम ठरणार नाही, याची काळजी या संस्था घेऊ शकत नाही, हे दुर्दैवी आहे. 

ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ग्रंथालयांमध्ये मिळून १२ लाख ६५ हजार २१२ ग्रंथ उपलब्ध आहेत. मात्र, ग्रंथालयांच्या सभासदांची संख्या केवळ ३४ हजार ९८२ आहे. जिल्ह्यातील लोकसंख्या पाहता ग्रंथालयांत जाऊन नियमित पुस्तके वाचणाऱ्यांची संख्या एवढी कमी असणे शोभनीय नाही. याचा अर्थ एकतर बहुतांश ग्रंथालयांमध्ये नव्या लेखकांची नवी पुस्तके उपलब्ध होत नाहीत. जुन्या लेखकांची तीच ती पुस्तके वाचून कंटाळल्याने लोकांनी ग्रंथालयांकडे पाठ फिरवली. ग्रंथालये काळानुरूप कात टाकत नसल्याने हे घडले किंवा जिल्ह्यातील लक्षावधी वाचक संगणकावर पुस्तके वाचणे पसंत करतात, असा आहे. रेल्वे किंवा मेट्रोतून प्रवास करणारे बहुतांश प्रवासी हे आपल्याला मोबाइलमध्ये वेबसिरीज, इन्स्टाग्रामवरील रील्स, यू ट्यूबचे व्हिडीओ पाहताना दिसतात. 

पुस्तक वाचत प्रवास करणारे प्रवासी दुर्मीळ झाले आहेत. एखाद्या चांगल्या गाजलेल्या पुस्तकावरील वेबसिरीज पाहणे लोक पसंत करतात. मात्र, ग्रंथालयात जाऊन ते पुस्तक वाचण्याकडील कल कमी झाला आहे. स्पर्धा परीक्षा देणारे तरुण व काही चोखंदळ लेखक, वाचक सोडले तर पुस्तक हातात घेऊन बैठक मारून तासनतास वाचन करण्याची सवय व सहनशीलता अनेकांनी गमावली आहे. व्हॉट्सॲपवर प्रदीर्घ पोस्ट पाहिल्यावर अनेकजण फार पुढे न वाचता त्याचे स्वागत किंवा निषेध करून पुढे जातात. माहितीच्या महापुराने वाचकांची घुसमट सुरू आहे.एखादे पुस्तक वाचल्यावर त्यामधील व्यक्तिरेखा प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने मनात रंगवतो. मात्र, आता वाचक या नात्याने हॅरी पॉटरची व्यक्तिरेखा आपापल्या पद्धतीने मनात रंगवण्यात रस नाही. पडद्यावरील हॅरी पॉटर हाच प्रत्यक्षातील हॅरी पॉटर म्हणून स्वीकारण्याचा पर्याय बहुतांशांनी स्वीकारला आहे.