शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 06:13 IST

नवभारत साक्षरता कार्यक्रमात १५ ते ६६ वयोगटातील निरक्षरांच्या १७ मार्च राेजी झालेल्या परीक्षेचा निकाल साेमवार, ६ मे रोजी घाेषित झाला.

सुरेश लाेखंडेलाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेले विजूभाऊ (नाव बदलले आहे) मोलमजुरी करतात. बँकेत गेल्यावर अंगठा देताना त्यांना लाज वाटायची. बहुधा अंगठा देत-देत आपण सरणावर जाणार, अशीच त्यांची धारणा होती. केंद्राच्या नवभारत साक्षरता कार्यक्रमात धडे गिरवून विजूभाऊ आता नाव लिहायला शिकले आणि नवसाक्षराची परीक्षाही उत्तीर्ण झाले. आपण साक्षरतेची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे समजल्यावर त्यांना हर्षवायू होणे बाकी होते.

नवभारत साक्षरता कार्यक्रमात १५ ते ६६ वयोगटातील निरक्षरांच्या १७ मार्च राेजी झालेल्या परीक्षेचा निकाल साेमवार, ६ मे रोजी घाेषित झाला. ठाणे जिल्ह्यातील १३ हजार ७७ निरक्षर पुरुष, महिला, मुले उत्तीर्ण हाेऊन आता साक्षर झाली. यामध्ये सर्वाधिक १० हजार २४८ महिलांचा समावेश आहे. हा कार्यक्रम २०२२-२७ या कालावधीत राबविला जात आहे. यामध्ये १५ व त्यापुढील सर्व निरक्षरांसाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा १७ मार्च रोजी राज्यात ३६ हजार परीक्षा केंद्रांवर झाली. त्यात चार लाख ५९ हजार ५३३ परीक्षार्थी हाेते. त्यांपैकी चार लाख २५ हजार ९०६ जण उत्तीर्ण झाले. 

ठाण्याचे जिल्हाधिकारी अशाेक शिणगारे, ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसाेदे यांच्याकडून उत्तीर्ण झालेल्यांचे अभिनंदन करण्यात आल्याची माहिती नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या शिक्षणाधिकारी भावना राजनाेर यांनी ‘लाेकमत’ला दिली. जिल्हाभरातून या परीक्षेला १६ हजार ६८३ परीक्षार्थी बसले हाेते. त्यांपैकी २,९५० महिला व ६५६ पुरुष अनुत्तीर्ण झाले. त्यांची परीक्षा पुन्हा सप्टेंबरमध्ये घेतली जाणार आहे.

आम्हाला वयाच्या या टप्प्यावर शिक्षणाची संधी मिळाली. आम्ही आमचे रोजचे कामधंदे सांभाळून शिक्षण घेत आहोत.- अरुण भवाने, वांगणी

अनेक कारणांमुळे नियमित शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या निरक्षरांना पुन्हा अक्षरओळख व गणितीय क्रियांसारख्या मूलभूत शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. शिवाय त्यांच्यात नवी उमेद व आत्मविश्वास निर्माण झाला.- राजकुमार पाटील, शिक्षक, वांगणी.

गावात शिक्षणाची सोय नसल्याने शिक्षण घेता आले नाही; परंतु आता या अभियानामुळे मी वाचन तसेच व्यवहारात उपयोगी गणिती आकडेमोड करू लागल्याचा आनंद वाटतो.- वनिता बंधू वाघ, चिंचपाडा, शहापूर.उतारवयात शाळेत जाण्याचा अनुभव आनंदी व उत्साहवर्धक होता. आता मी लिहू शकते, वाचू शकते.- विमल केशव पाटील, केल्हे, भिवंडी.पुन्हा एकदा आमच्यात शिक्षणाची गोडी रुजविली गेली. बिकट आर्थिक स्थितीमुळे आमचे शिक्षण थांबले होते. आता नव्याने अक्षरओळख व गणिताची आकडेमोड करताना आनंद मिळतो.    - राजेश भोपळे, वांगणी.

टॅग्स :Educationशिक्षण