शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

... जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा कष्ट करण्याची जिद्द ठेवली पाहिजे -कपिल पाटील

By नितीन पंडित | Updated: September 10, 2022 20:22 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सतत शेतीला शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजना राबवित आले आहेत - कपिल पाटील

भिवंडी - सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून अनेक योजना राबवत असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा कष्ट करण्याची जिद्द अंगी बाळगली पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी केले.श निवारी ते भिवंडी पंचायत समिती सभागृहात शासनाच्या ठाणे कृषी विभाग व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत मेरी पॉलिसी मेरे हात या कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे,पंचायत समिती सभापती सुरेंद्र भोईर,जिल्हा कृषी अधीक्षक दीपक खुटे, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापक हंसराज गंगवाल व मोठ्या संख्येने लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सतत शेतीला शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजना राबवित आले आहेत.पूर्वी ५० टक्के नुकसान झाले तरच विमा संरक्षण मिळत होत परंतु मोदी सरकारने ती मर्यादा कमी करून ३३ टक्क्यांवर आणून त्यासाठी संसदेत कायदा केला. देशातला शेतकरी हा सक्षम झाला पाहिजे आणि शेतकऱ्याला सक्षम करायचं असेल तर या सगळ्या योजनांचा लाभ शेतकऱ्याला देऊन त्याचे शेती उत्पन्न दुप्पट कसे करता येईल यासाठी केंद्र शासना कडून  प्रयत्न केला जात आहेत.मात्र सरकारने केले म्हणजे आपली जबाबदारी संपली नसून शेतकऱ्याने अधिक कष्ट करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे ,पूर्वी आपल्या कडील शेतकरी भातशेती नंतर भाजीपाला पिकवून ती विक्री करत असल्याचे चित्र आपण पाहत होतो, पण आज आळसावलेल्या शेतकऱ्यांमुळे मुबंईसह ठाणे पालघर या राज्यातील २२ टक्के लोकसंख्या असलेल्या भागातील नागरिकांच्या गरजा पुणे कोल्हापूर नाशिक जळगाव अहमदनगर येथील शेतकरी पूर्ण करतात.त्यांना दोनशे ते अडीचशे किलोमीटर अंतरावरून आपल्या येथे आणून विक्री करणे परवडते मग आपल्याला का नाही परवडणार याचा विचार शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे.विमा संरक्षण मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळत असताना त्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविणे गरजेचे असून शेतकऱ्यांनी शेती पूरक व्यवसाय उभारावेत असे आवाहन कपिल पाटील यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमादरम्यान युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी पैसे भरले आहेत त्यांना त्यांच्या विमा पॉलिसीचे मेरी पॉलिसी मेरे हात या अभियाना अंतर्गत वितरण करण्यात आले.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलbhiwandiभिवंडी