शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

... जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा कष्ट करण्याची जिद्द ठेवली पाहिजे -कपिल पाटील

By नितीन पंडित | Updated: September 10, 2022 20:22 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सतत शेतीला शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजना राबवित आले आहेत - कपिल पाटील

भिवंडी - सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून अनेक योजना राबवत असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा कष्ट करण्याची जिद्द अंगी बाळगली पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी केले.श निवारी ते भिवंडी पंचायत समिती सभागृहात शासनाच्या ठाणे कृषी विभाग व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत मेरी पॉलिसी मेरे हात या कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे,पंचायत समिती सभापती सुरेंद्र भोईर,जिल्हा कृषी अधीक्षक दीपक खुटे, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापक हंसराज गंगवाल व मोठ्या संख्येने लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सतत शेतीला शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजना राबवित आले आहेत.पूर्वी ५० टक्के नुकसान झाले तरच विमा संरक्षण मिळत होत परंतु मोदी सरकारने ती मर्यादा कमी करून ३३ टक्क्यांवर आणून त्यासाठी संसदेत कायदा केला. देशातला शेतकरी हा सक्षम झाला पाहिजे आणि शेतकऱ्याला सक्षम करायचं असेल तर या सगळ्या योजनांचा लाभ शेतकऱ्याला देऊन त्याचे शेती उत्पन्न दुप्पट कसे करता येईल यासाठी केंद्र शासना कडून  प्रयत्न केला जात आहेत.मात्र सरकारने केले म्हणजे आपली जबाबदारी संपली नसून शेतकऱ्याने अधिक कष्ट करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे ,पूर्वी आपल्या कडील शेतकरी भातशेती नंतर भाजीपाला पिकवून ती विक्री करत असल्याचे चित्र आपण पाहत होतो, पण आज आळसावलेल्या शेतकऱ्यांमुळे मुबंईसह ठाणे पालघर या राज्यातील २२ टक्के लोकसंख्या असलेल्या भागातील नागरिकांच्या गरजा पुणे कोल्हापूर नाशिक जळगाव अहमदनगर येथील शेतकरी पूर्ण करतात.त्यांना दोनशे ते अडीचशे किलोमीटर अंतरावरून आपल्या येथे आणून विक्री करणे परवडते मग आपल्याला का नाही परवडणार याचा विचार शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे.विमा संरक्षण मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळत असताना त्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविणे गरजेचे असून शेतकऱ्यांनी शेती पूरक व्यवसाय उभारावेत असे आवाहन कपिल पाटील यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमादरम्यान युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी पैसे भरले आहेत त्यांना त्यांच्या विमा पॉलिसीचे मेरी पॉलिसी मेरे हात या अभियाना अंतर्गत वितरण करण्यात आले.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलbhiwandiभिवंडी