शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

दोन जेवणातील अंतर किती हवे; झोप किती तास हवी?, जाणून घ्या, डॉक्टरांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 10:49 IST

ठाणे : बैठे काम करणाऱ्यांनी २५ ते ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ एकाच ठिकाणी बसून राहू नये. जेवढे जास्त बसाल ...

ठाणे : बैठे काम करणाऱ्यांनी २५ ते ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ एकाच ठिकाणी बसून राहू नये. जेवढे जास्त बसाल तेवढे आजार वाढतात. तसेच वजन वाढीवरदेखील परिणाम होतो. त्यामुळे योग्य व्यायाम आणि त्याला संतुलित आहाराची जोड देण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. हल्ली संगणकासमोर तासन्तास बसून काम करावे लागते. वर्क फ्रॉम होममुळे तर कामांचे तास वाढले असल्याने अनेकांना मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी सारख्या आजारांना सामोरे जावे लागले. शारीरिक हालचाली नसल्याने आजारांना आयते आमंत्रण मिळते. तसेच वजनावर देखील नियंत्रण नसल्याने ते वाढत जाते. त्यामुळे बैठे काम असेल तर अधूनमधून उठून किमान उभे राहण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

१. पाऊण तासापेक्षा जास्त काळ एका ठिकाणी बसून नकोच

-२५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ एका जागी बसू नये, शारीरिक हालचाली नसल्याने वजन पण वाढते. तसेच एकाच जागी बसून राहिल्यास कोलेस्ट्रॉल वाढण्याची भीती देखील असते. - प्रिया गुरव, आहारतज्ज्ञ, सिव्हिल हॉस्पिटल

२. दोन जेवणातील अंतर किती हवे?

दोन जेवणातील अंतर हे सात ते आठ तासांचे असावे. मधल्या वेळेत जंक फूड खाणे टाळावे. दर दोन तासांनी खाणे ज्यांना शक्य नाही त्यांनी सायं.काळी ६.३० वा. फळे, मखाना, कुरमुरे, शेंगदाण्याची चिक्की असे पदार्थ खाण्यांवर भर द्यावा.

३. सकाळी उठल्या उठल्या चहापेक्षा ताजी फळे खा

सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्याची अनेकांना सवय असते; परंतु सकाळी उठल्यावर चहापेक्षा संपूर्ण अख्खे फळ खावे कारण पूर्ण फळ चावून खाल्ल्याने त्यातील पोषणतत्त्वे तर मिळतात शिवाय दातांचा व्यायामदेखील होतो; परंतु फळांचा रस टाळावा. - प्रिया गुरव, आहारतज्ज्ञ, सिव्हिल हॉस्पिटल

४. झोप किती तास हवी ?

स्मार्टफोनमुळे हल्ली उशिरा झोपण्याचे प्रमाण वाढले आहे; परंतु कमीत कमी आठ तास झोप शरीराला आवश्यक आहे. रात्री किमान १० ते ११ मध्ये झोपणे आवश्यक आहे.

५. किमान अर्धा तास व्यायाम-प्राणायाम हवाच

ज्या लोकांना व्यायामासाठी दिवसभर वेळ मिळत नाही त्यांनी वेळ मिळेल तेव्हा योगा करावा. योगामुळे शरीराला आतून फायदा होतोच. तसेच प्राणायामदेखील महत्त्वाचा आहे. शरीरातील ताणतणाव, कफचा आजार कमी करतो आणि एकाग्रता वाढीस मदत होते.

- विनोद पोळ, व्यायाम प्रशिक्षक

टॅग्स :Healthआरोग्यthaneठाणे