शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रशासनाने परिवहन सेवेचा केलेला ठराव योग्यच; शासनाला दिला अहवाल

By धीरज परब | Updated: December 12, 2022 19:05 IST

महापालिकेच्या परिवहन उपक्रमात सर्वसाधारण ५९ बस तर १० मध्यम आकाराच्या व ५ वातानुकूलित बस अश्या एकूण ७४ बस आहेत.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेची परिवहन सेवा जीसीसी तत्वावर चालवण्याचा प्रशासनाने घेतलेला निर्णय हा शासनाची मार्गदर्शक तत्वे व कायदयानुसार योग्यच असल्याचा अहवाल आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी शासनाच्या नगरविकास विभागाला सादर केला आहे. त्यामुळे शासन त्या नुसार काय निर्णय घेते ह्या कडे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या परिवहन उपक्रमात सर्वसाधारण ५९ बस तर १० मध्यम आकाराच्या व ५ वातानुकूलित बस अश्या एकूण ७४ बस आहेत. शिवाय नवीन इलेक्ट्रिक बस प्रवाश्यांच्या सेवेत दाखल होणार आहेत . त्या अनुषंगाने पालिका प्रशासनाने मार्च २०२२ मध्ये पालिकेच्या सध्याच्या ७४ बस व नव्याने येणाऱ्या इलेक्ट्रिक बस ह्या जीसीसी पद्धतीने चालवण्यास तसेच तिकीट संकलन आदी साठी धोरण ठरविण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव तत्कालीन महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या कडे महासभेच्या मंजुरीसाठी दिला होता.

मे २०२२च्या महासभेत नगरसेवकांनी ७४ बस साठी एनसीसी तत्वावर ठेकेदार नेमावा व इलेक्ट्रिक बस साठी जीसीसी तत्वावर ठेकेदार नेमावा असा ठराव मंजूर केला होता . एकाच पालिकेच्या परिवहन सेवेसाठी दोन वेगवेगळ्या पद्धतीने ठेकेदार नेमल्यास अडचणी व तक्रारी वाढण्याची शक्यता पाहता ऑगस्ट मध्ये नगरसेवकांची मुदत संपल्यावर प्रशासनाने सप्टेंबर महिन्यात प्रशासकीय ठराव करून सर्व बस जीसीसी पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला . त्या अनुषंगाने प्रशासनाने निविदा प्रक्रिया सुरु केली.

माजी स्वीकृत सदस्य भगवती शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. पालिका प्रशासन हे लोकप्रतिनिधी यांनी मंजूर केलेल्या ठरावाला बदलून बेकायदा निर्णय घेत असल्याचा दावा करत प्रशासनाने चालवलेली निविदा प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी  शर्मा यांनी याचिकेद्वारे केली. त्यावर न्यायालयाने , राज्य शासनाच्या नगरविकास विभागास निर्णय घेण्यास सांगतानाच नगरविकास विभागाचा निर्णय येई पर्यंत ठेकेदारास कार्यादेश देऊ नये असे आदेश दिले होते. 

महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी नगरविकास विभागाला या बाबतचा अहवाल नुकताच सादर केला आहे . इलेक्ट्रिक बस ह्या जीसीसी पद्धतीने चालवण्यास द्याव्यात अशी केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्वे आहेत . तर केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या सल्लागारने दिलेल्या अहवाला नुसार एनसीसी पद्धती ऐवजी जीसीसी पद्धतीची शिफारस केली आहे .दोन वेगवेगळ्या पद्धती ऐवजी सर्व बस एकाच जीसीसी पद्धतीने देण्याचा निर्णय हिताचा असल्याने शासनाची मार्गदर्शक तत्वे व कायदयानुसार योग्यच असल्याचे ठाम मत प्रशासनाने व्यक्त केले आहे. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर