शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

‘आजपर्यंत गुन्हेगाराचे वकीलपत्र घेतलेले नाही’, उज्ज्वल निकम यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 09:39 IST

Ujjwal Nikam : मी वकिली क्षेत्रात आल्यानंतर आपण गुन्हेगारीविरुद्ध लढायचे, असे ठरवले. मी आजपर्यंत गुन्हेगाराचे वकीलपत्र घेतलेले नाही. मी गुन्हेगारांविरोधातच लढत आलो आहे, असे स्पष्ट मत विशेष सरकारी वकील पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांनी रविवारी व्यक्त केले. 

 ठाणे - मी वकिली क्षेत्रात आल्यानंतर आपण गुन्हेगारीविरुद्ध लढायचे, असे ठरवले. मी आजपर्यंत गुन्हेगाराचे वकीलपत्र घेतलेले नाही. मी गुन्हेगारांविरोधातच लढत आलो आहे, असे स्पष्ट मत विशेष सरकारी वकील पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांनी रविवारी व्यक्त केले. 

मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेतर्फे आयोजित करिअर कट्ट्याच्या दुसऱ्या पुष्पात निकम यांनी विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, न्यायाधीशांसमोर बोलताना वकिलाच्या आवाजात चढ-उतार असायला हवा. सामान्य माणूस जेव्हा वकिलाकडे येतो, तेव्हा अशिलाला प्रामाणिक सल्ला देणे हे वकिलाचे कर्तव्य आहे. खोटी आश्वासने देऊन फसवू नये.  कसाबच्या खटल्याबद्दल सांगताना ते म्हणाले की, कसाबला फाशी देणे हे माझ्या दृष्टीने आव्हानात्मक नव्हते. हा दहशतवाद कोणी घडवला, यामागे कोणाची ताकद होती, हे जगाला समजले पाहिजे, म्हणून हा खटला इन कॅमेरा चालवायचा नाही, असे ठरवले. विद्याधर ठाणेकर यांनी प्रास्ताविक, तर विश्वस्त मकरंद जोशी यांनी निवेदन केले.

मृत्यूबाबत पाकिस्तानने शंका घेतली नाहीमी जेव्हा लोकसभा निवडणुकीला उभा होतो, तेव्हा काही नेत्यांनी माझ्यावर मुक्ताफळे उधळली. कसाबने पोलिस अधिकाऱ्यांना मारले नाही, त्यांना दुसऱ्याने, आपल्याच भारतीयांनी मारले, असे त्यांच्याकडून सांगितले जात होते. त्यावेळी मी त्यांचा समाचार घेतला. कसाबला फाशी देण्याबाबत किंवा शहीद झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या मृत्यूबाबत पाकिस्ताननेही शंका उपस्थित केली नाही, पण आमच्यातील काही महाभागांनी ती उपस्थित केली, असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकमthaneठाणे