शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

वेठबिगारीतून मुक्ती झालेल्या आदिवासी मजुरांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज- विवेक पंडित 

By नितीन पंडित | Updated: February 1, 2024 16:42 IST

ही जबाबदारी प्रशासनाची असून त्याची तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी देखील विवेक पंडित यांनी केली आहे.

भिवंडी: वेठबिगारीतून मजुरांची मुक्तता करून भागणार नसून प्रशासनाने त्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार तात्काळ पावले उचलण्याची गरज आहे असे मत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आदिवासी समाज विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी व्यक्त केले आहे.ते भिवंडीत वेठबिगार पुनर्वसन संदर्भात शासन स्तरावर काय कार्यवाही केली या बाबत आयोजित बैठकी नंतर पत्रकारांशी बोलत होते.

वीटभट्टी व्यवसायातून वेठबिगार मजुरांची सोडवणूक केल्यानंतर शासनाने त्यांच्या पुनर्वसनासाठी कोणत्या उपाययोजना केल्या याचा आढावा घेण्यासाठी भिवंडी तहसीलदार कार्यालयात शासकीय अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी आयोजित केली होती.या बैठकीस उपविभागीय अधिकारी अमित सानप,तहसीलदार अभिजित खोले,गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे,कामगार सहाय्यक आयुक्त विजय चौधरी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम,आदिवासी प्रकल्प अधिकारी,वनविभाग अधिकारी यांसह श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी बाळाराम भोईर,दत्तात्रय कोलेकर,अशोक सापटे,प्रमोद पवार व सुनील लोणे आदी उपस्थित होते.

वीटभट्टी व्यवसायात मोठ्या प्रमाणावर ठाणे व पालघर जिल्ह्यातील आदिवासी मजूर काम करीत असताना अनेक वीटभट्टी मालकांकडून या आदिवासी मजुरांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना वर्षांवर्षे कमी मोबदला देऊन वेठबिगारी म्हणून राबवून घेतात.त्या माध्यमातून आर्थिक व शारीरिक पिळवणूक या समाजाची होत असल्याने श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून अशा मुजोर वीटभट्टी मालकांविरोधात वेठबिगार मुक्ती कायद्याच्या आधारे गुन्हे दाखल केले गेले आहेत.या वेठबिगारीतून मुक्त होणाऱ्या आदिवासी मजुरांचे पुनर्वसन शासन निर्देशानुसार होत नसल्याने श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी नापसंती व्यक्त करीत .अशा मुक्त झालेल्या कामगारांना तात्काळ आर्थिक मदती सह त्यांना घरकुल व त्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची असून त्याची तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी देखील विवेक पंडित यांनी केली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी