शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वेठबिगारीतून मुक्ती झालेल्या आदिवासी मजुरांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज- विवेक पंडित 

By नितीन पंडित | Updated: February 1, 2024 16:42 IST

ही जबाबदारी प्रशासनाची असून त्याची तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी देखील विवेक पंडित यांनी केली आहे.

भिवंडी: वेठबिगारीतून मजुरांची मुक्तता करून भागणार नसून प्रशासनाने त्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार तात्काळ पावले उचलण्याची गरज आहे असे मत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आदिवासी समाज विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी व्यक्त केले आहे.ते भिवंडीत वेठबिगार पुनर्वसन संदर्भात शासन स्तरावर काय कार्यवाही केली या बाबत आयोजित बैठकी नंतर पत्रकारांशी बोलत होते.

वीटभट्टी व्यवसायातून वेठबिगार मजुरांची सोडवणूक केल्यानंतर शासनाने त्यांच्या पुनर्वसनासाठी कोणत्या उपाययोजना केल्या याचा आढावा घेण्यासाठी भिवंडी तहसीलदार कार्यालयात शासकीय अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी आयोजित केली होती.या बैठकीस उपविभागीय अधिकारी अमित सानप,तहसीलदार अभिजित खोले,गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे,कामगार सहाय्यक आयुक्त विजय चौधरी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम,आदिवासी प्रकल्प अधिकारी,वनविभाग अधिकारी यांसह श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी बाळाराम भोईर,दत्तात्रय कोलेकर,अशोक सापटे,प्रमोद पवार व सुनील लोणे आदी उपस्थित होते.

वीटभट्टी व्यवसायात मोठ्या प्रमाणावर ठाणे व पालघर जिल्ह्यातील आदिवासी मजूर काम करीत असताना अनेक वीटभट्टी मालकांकडून या आदिवासी मजुरांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना वर्षांवर्षे कमी मोबदला देऊन वेठबिगारी म्हणून राबवून घेतात.त्या माध्यमातून आर्थिक व शारीरिक पिळवणूक या समाजाची होत असल्याने श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून अशा मुजोर वीटभट्टी मालकांविरोधात वेठबिगार मुक्ती कायद्याच्या आधारे गुन्हे दाखल केले गेले आहेत.या वेठबिगारीतून मुक्त होणाऱ्या आदिवासी मजुरांचे पुनर्वसन शासन निर्देशानुसार होत नसल्याने श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी नापसंती व्यक्त करीत .अशा मुक्त झालेल्या कामगारांना तात्काळ आर्थिक मदती सह त्यांना घरकुल व त्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची असून त्याची तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी देखील विवेक पंडित यांनी केली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी