शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हक्काचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी करिष्मासह बिपाशाचा ठाणेकर युवा मतदाराना संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 19:22 IST

अभिनेत्री करिष्मा कपूर, बिपाशा बसू यांचे गडकरीत आगमन होताच उपस्थित शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आढळून आले. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी मतदारनोंदणी करून घेण्याचा आग्रह त्यांनी या युवायुवतींना केला. प्रसिद्ध गीतकार प्रवीण दवणे यांनीदेखील ‘मतदारनोंदणी आरंभ हाच राष्ट्रभक्तीचा शुभारंभ’ असे घोषवाक्य दिले.

ठळक मुद्देठाणे जिल्ह्यात सध्या ५९ लाख २७ हजार सात मतदारजिल्ह्यातील दोन हजार १८६ सैनिकांनी मतदारनोंदणीमतदारांची कागदपत्रे स्कॅन करून जतन करून ठेवण्यात येतातराज्यात सर्वाधिक ३३० तृतीयपंथींची (थर्ड जेंडर) मतदार म्हणून ठाणे जिल्ह्यात नोंदणी

ठाणे :राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री करिष्मा कपूर व बिपाशा बसू यांनी ‘मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले पाहिजे. तो आपला हक्क आहे’ असे येथील उपस्थित महाविद्यालयीन युवायुवतींकडून वदवून घेऊन मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन गडकरी रंगायतनमधील कार्यक्रमाद्वारे केले.दोन दिवसांपासून ज्यांची उत्सुकता होती, त्या अभिनेत्री करिष्मा कपूर, बिपाशा बसू यांचे गडकरीत आगमन होताच उपस्थित शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आढळून आले. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी मतदारनोंदणी करून घेण्याचा आग्रह त्यांनी या युवायुवतींना केला. प्रसिद्ध गीतकार प्रवीण दवणे यांनीदेखील ‘मतदारनोंदणी आरंभ हाच राष्ट्रभक्तीचा शुभारंभ’ असे घोषवाक्य दिले. या कार्यक्र मास विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, जिल्हा सैनिक अधिकारी प्रांजळ जाधव आदींची उपस्थिती होती.राज्यात सर्वाधिक ३३० तृतीयपंथींची (थर्ड जेंडर) मतदार म्हणून ठाणे जिल्ह्यात नोंदणी झाली आहे. जिल्ह्यात वर्षभरात दोन लाख ११ हजार नवीन मतदारांची नोंदणी जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आल्याची माहिती गुरुवारी पार पडलेल्या आठव्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या या कार्यक्रमात ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली. यावेळी मतदानाचा हक्क बजावणार असल्याची शपथही त्यांनी उपस्थितांना दिली.ठाणे जिल्ह्यात ५९.२७ लाख मतदारठाणे जिल्ह्यात सध्या ५९ लाख २७ हजार सात मतदार आहेत. सेनादलातील मतदारांची नोंदणी आता आॅनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे. जिल्ह्यातील दोन हजार १८६ सैनिकांनी मतदारनोंदणी केली आहे. यावर्षी प्रथमच एफड ठएळ पद्धत वापरण्यात आली. या पद्धतीमध्ये मतदारनोंदणी करताना मतदारांची कागदपत्रे स्कॅन करून जतन करून ठेवण्यात येतात. अशी प्रणाली वापरणारा महाराष्ट्र देशात दुस-या क्रमांकावर आहे. या पद्धतीत ठाणे जिल्ह्यात ४३ हजार ६९६ मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी यावेळी दिली. विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनीही मतदानाचे महत्त्व विशद केले.याप्रसंगी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांचा दृकश्राव्य संदेशदेखील दाखवण्यात आला. याप्रसंगी सहस्रक मतदार, दिव्यांग मतदारांचा सत्कार करण्यात आला. जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय निवडणूकविषयक सामान्यज्ञान स्पर्धेतील विजेत्या मुलांचाही गौरव करण्यात आला. सैन्यदलातील नव्याने मतदार म्हणून नोंदणी झालेल्या मुकेश कांबळे, आर.सी. शर्मा, जयंत गोगटे, जगन्नाथ सिन्नरकर, शिवालीनाथ थोरात यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जीवनगाणी या प्रसाद महाडकर यांच्या वाद्यवृंदाने आणि गायिका सोनाली कर्णिक, मंदार आपटे यांच्या गीतांनी सभागृहात ठेका धरायला लावला. योगेश भिडे यांच्या मतदारांसाठी असलेल्या पथनाट्यानेही वाहवा मिळवली.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार