शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
3
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
4
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
5
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
6
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
7
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
8
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
9
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
10
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
11
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
12
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
13
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
14
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
15
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
16
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
17
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
18
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
19
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
20
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याला पालघर भोवणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 03:12 IST

शिवसेना-भाजपाचे संबंध ताणलेले : लोकसभा, विधानसभेला युतीतच प्रमुख लढत

ठाणे : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाने खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला ‘विश्वासघातकी’ ठरवल्यानंतर त्याचे पडसाद ठाण्यातील कोपरी पुलाच्या भूमिपूजनात जसे उमटले, तसेच ते ठाणे जिल्ह्यातील यापुढील प्रत्येक निवडणुकीवर पडण्याची शक्यता आहे. या निवडणुकीचा निकाल काहीही लागला, तरी आपले नाक कापण्याच्या शिवसेनेच्या या प्रयत्नाचे उट्टे प्रत्येक निवडणुकीत काढण्याचा प्रयत्न भाजपा करणार असल्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकांतही या दोन पक्षांतच कडवी लढत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे तेथे पोटनिवडणूक होते आहे. वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांनाच फोडून शिवसेनेने दिलेली उमेदवारी भाजपाच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांचा विचार करून जरी भाजपाने काँग्रेसमधून फोडलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली असली; तरी भाजपाचे मुंबई-ठाण्यातील विविध नेते, पदाधिकारी, आमदार, नगरसेवक, संघाच्या मुशीतील वनवासी कल्याण आश्रमासारख्या संस्थांनी तेथे तळ ठोकला आहे. शिवसेनेनेही आपल्या नेत्यांची फौज तेथे उतरवली आहे. ठाणे जिल्ह्यातील खासदार, आमदार, नगरसेवकांना एकेका परिसराची जबाबदारी देऊन तेथे मुक्काम ठोकण्याचे आदेश दिल्याने कल्याण-डोंबिवली, मुंबईनंतर हे दोन्ही पक्ष निकराने लढत असल्याचे चित्र उभे राहिले आहे.नालासोपाऱ्यात सभा घेऊन भाजपाने परंपरागत गुजराती मतांसोबत उत्तर भारतीय मतांसाठी प्रयत्न सुरू केल्याचे दाखवून दिले. वसई-विरार, नालासोपाºयातील बहुजन विकास आघाडीच्या मतांना सुरूंग लावण्यासाठी आणि त्यांच्याविरोधातील पंरपरागत ख्रिस्ती मते मिळवण्यासाठी त्यांच्यावर टीकेची झोड उठवताना त्यांचे विरोधक विवेक पंडित यांच्या श्रमजीवीची ताकद आपल्यासोबत ठेवली आहे. त्यातून वनगा यांच्या आदिवासी मतांत फूट पाडण्याचाही प्रयत्न भाजपाने सुरू केला आहे.शिवसेनेची सारी भिस्त पालघर, विक्रमगड, वाडा, जव्हारवर आहे. वसई-विरारमध्ये त्यांची पारंपरिक मते असली, तरी त्यात पूर्वीचे उपनेते विवेक पंडित यांचाही वाटा आहे. डहाणूमध्ये शिवसेनेला फारसे स्थान नाही. त्यामुळे ती कमतरता त्यांना अन्य परिसरातून भरून काढावी लागेल किंवा कम्युनिस्ट-मार्क्सवाद्यांना तेथे ताकद देत भाजपाच्या- खास करून संघाच्या परंपरागत मतांना सुरूंग लावावा लागेल. मात्र वसई-विरार, नालसोपारा, पालघर येथे होणाºया मतदानावर, त्यातही तेथील बहुजन विकास आघाडीच्या ताकदीवरच शिवसेनेची गणिते अवलंबून आहेत.सध्या पालघर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणारे वसई, नालासोपारा, बोईसर हे तीन मतदारसंघ बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात आहेत. पालघर शिवसेनेकडे; तर डहाणू आणि विक्रमगड हे भाजपाच्या ताब्यात आहेत. त्यातही नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने केलेली बेगमी त्यांना लोकसभा पोटनिवडणुकीत उपयोगी पडेल, असा त्यांच्या नेत्यांचा होरा आहे.लोकसभेच्या यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांत बहुजन विकास आघाडीची मते वाढत पावणेतीन लाखांवर गेली. तेथील भाजपाची मते साधारण सव्वादोन ते अडीच लाखांदरम्यान होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेप्रमाणेच भाजपा, शिवसेना एकत्र होते. तेव्हा चिंतामण वनगा यांना पाच लाख ३३ हजार मते मिळाली. त्यामुळे त्यातील निम्मी ताकद आमची असल्याचा शिवसेनेचा दावा आहे.ठाण्यात काय घडू शकते?ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण हे दोन लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहेत. तेथे भाजपाने सक्षम उमेदवारांचा शोध सुरू केला आहे.ठाणे जिल्ह्याच्या १८ आमदारांपैकी भाजपाकडे आठ, शिवसेनेकडे सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे चार आमदार आहेत. त्यातील शिवसेनेच्या सहाही जागांवर उमेदवार देत भाजपा ठाणे जिल्ह्यावरील शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान देऊ शकते.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018