शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

ठाण्याला पालघर भोवणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 03:12 IST

शिवसेना-भाजपाचे संबंध ताणलेले : लोकसभा, विधानसभेला युतीतच प्रमुख लढत

ठाणे : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाने खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला ‘विश्वासघातकी’ ठरवल्यानंतर त्याचे पडसाद ठाण्यातील कोपरी पुलाच्या भूमिपूजनात जसे उमटले, तसेच ते ठाणे जिल्ह्यातील यापुढील प्रत्येक निवडणुकीवर पडण्याची शक्यता आहे. या निवडणुकीचा निकाल काहीही लागला, तरी आपले नाक कापण्याच्या शिवसेनेच्या या प्रयत्नाचे उट्टे प्रत्येक निवडणुकीत काढण्याचा प्रयत्न भाजपा करणार असल्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकांतही या दोन पक्षांतच कडवी लढत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे तेथे पोटनिवडणूक होते आहे. वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांनाच फोडून शिवसेनेने दिलेली उमेदवारी भाजपाच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांचा विचार करून जरी भाजपाने काँग्रेसमधून फोडलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली असली; तरी भाजपाचे मुंबई-ठाण्यातील विविध नेते, पदाधिकारी, आमदार, नगरसेवक, संघाच्या मुशीतील वनवासी कल्याण आश्रमासारख्या संस्थांनी तेथे तळ ठोकला आहे. शिवसेनेनेही आपल्या नेत्यांची फौज तेथे उतरवली आहे. ठाणे जिल्ह्यातील खासदार, आमदार, नगरसेवकांना एकेका परिसराची जबाबदारी देऊन तेथे मुक्काम ठोकण्याचे आदेश दिल्याने कल्याण-डोंबिवली, मुंबईनंतर हे दोन्ही पक्ष निकराने लढत असल्याचे चित्र उभे राहिले आहे.नालासोपाऱ्यात सभा घेऊन भाजपाने परंपरागत गुजराती मतांसोबत उत्तर भारतीय मतांसाठी प्रयत्न सुरू केल्याचे दाखवून दिले. वसई-विरार, नालासोपाºयातील बहुजन विकास आघाडीच्या मतांना सुरूंग लावण्यासाठी आणि त्यांच्याविरोधातील पंरपरागत ख्रिस्ती मते मिळवण्यासाठी त्यांच्यावर टीकेची झोड उठवताना त्यांचे विरोधक विवेक पंडित यांच्या श्रमजीवीची ताकद आपल्यासोबत ठेवली आहे. त्यातून वनगा यांच्या आदिवासी मतांत फूट पाडण्याचाही प्रयत्न भाजपाने सुरू केला आहे.शिवसेनेची सारी भिस्त पालघर, विक्रमगड, वाडा, जव्हारवर आहे. वसई-विरारमध्ये त्यांची पारंपरिक मते असली, तरी त्यात पूर्वीचे उपनेते विवेक पंडित यांचाही वाटा आहे. डहाणूमध्ये शिवसेनेला फारसे स्थान नाही. त्यामुळे ती कमतरता त्यांना अन्य परिसरातून भरून काढावी लागेल किंवा कम्युनिस्ट-मार्क्सवाद्यांना तेथे ताकद देत भाजपाच्या- खास करून संघाच्या परंपरागत मतांना सुरूंग लावावा लागेल. मात्र वसई-विरार, नालसोपारा, पालघर येथे होणाºया मतदानावर, त्यातही तेथील बहुजन विकास आघाडीच्या ताकदीवरच शिवसेनेची गणिते अवलंबून आहेत.सध्या पालघर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणारे वसई, नालासोपारा, बोईसर हे तीन मतदारसंघ बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात आहेत. पालघर शिवसेनेकडे; तर डहाणू आणि विक्रमगड हे भाजपाच्या ताब्यात आहेत. त्यातही नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने केलेली बेगमी त्यांना लोकसभा पोटनिवडणुकीत उपयोगी पडेल, असा त्यांच्या नेत्यांचा होरा आहे.लोकसभेच्या यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांत बहुजन विकास आघाडीची मते वाढत पावणेतीन लाखांवर गेली. तेथील भाजपाची मते साधारण सव्वादोन ते अडीच लाखांदरम्यान होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेप्रमाणेच भाजपा, शिवसेना एकत्र होते. तेव्हा चिंतामण वनगा यांना पाच लाख ३३ हजार मते मिळाली. त्यामुळे त्यातील निम्मी ताकद आमची असल्याचा शिवसेनेचा दावा आहे.ठाण्यात काय घडू शकते?ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण हे दोन लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहेत. तेथे भाजपाने सक्षम उमेदवारांचा शोध सुरू केला आहे.ठाणे जिल्ह्याच्या १८ आमदारांपैकी भाजपाकडे आठ, शिवसेनेकडे सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे चार आमदार आहेत. त्यातील शिवसेनेच्या सहाही जागांवर उमेदवार देत भाजपा ठाणे जिल्ह्यावरील शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान देऊ शकते.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018