शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

ठाणेकरांची सुट्टी बर्फाच्छादीत प्रदेशात

By admin | Updated: April 11, 2017 02:27 IST

उन्हाळी सुट्टीत ‘मामाच्या गावाला जाऊ या’ चा ट्रेण्ड गेल्या काही वर्षांत मागे पडला. दिवसेंदिवस उकाडा असह्य होत असल्याने सुट्टी अविस्मरणीय करण्यासाठी बहुतांश

ठाणे : उन्हाळी सुट्टीत ‘मामाच्या गावाला जाऊ या’ चा ट्रेण्ड गेल्या काही वर्षांत मागे पडला. दिवसेंदिवस उकाडा असह्य होत असल्याने सुट्टी अविस्मरणीय करण्यासाठी बहुतांश पर्यटक बर्फाच्छादीत प्रदेशाला पसंती देत आहे. यंदा ठाणेकरांनी हिमाचल प्रदेशसह सिक्कीम, दाजिर्लिंग या ठिकाणांना पसंती दिली आहे. त्याचवेळी ठाणेकरांचा कल परदेशी सहलींकडेही कायम आहे, असे विविध सहलीच्या आयोजकांनी ‘लोकमत’ला सांगितले. परीक्षा संपली, की वेध लागतात उन्हाळी सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाण्याचे. पूर्वी ही सुट्टी गावी घालवण्याकडे कल असे. मात्र आधी भारनियमन, नंंतर वाढती पाणीटंचाई आणि सध्या असह्य होत गेलेला उन्हाळा यामुळे हा ट्रेण्ड बदलतो आहे. पर्यटक गावी किंवा जवळपास फिरायला न जाता महाराष्ट्राबाहेर किंवा परदेशात जाण्यास पसंती देत आहेत. उन्हाळी सुट्टी साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होते. ते गृहीत धरून पर्यटकांचे प्लॅन जानेवारीपासूनच सुरू होतात. रेल्वे रिझर्व्हेशनची वाढलेली मर्यादा आणि विमानाची तिकीटे लवकर बुक केली तर मिळणारी सवलत यामुळे हे प्लॅन हल्ली साधारण तीन महिने आधी तयार होतात. काही जण तर सहा महिने आगाऊ बुकिंग करतात. एप्रिल - मे महिन्यात जाणवणारा उकाडा पाहता थंड हवेच्या ठिकाणी जाऊन निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी हल्ली पर्यटक आतूर असतात, असे टूर आॅपरेटर्सनी सांगितले. प्रत्येक जण बजेटनुसार स्थळांची निवड करीत असतो. ज्यांचे बजेट अधिक असते, ते परदेशातही फिरुन येतात; तर अनेक जण भारतातील थंड हवेच्या ठिकाणी फिरण्याला पसंती देतात. दोन वर्षांपूर्वी अधिकाधिक ठाणेकरांनी परदेशी सहलींना पसंती दिली होती. गेल्यावर्षी हा ट्रेण्ड कमी झाला होता. सहलीच्या आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉलर आणि युरोच्या वाढत्या दरामुळे गेल्यावर्षीची मे महिन्याची सुट्टी भारतातल्या थंड हवेच्या ठिकाणी घालविण्यावर पर्यटकांनी भर दिला आहे. त्यातही काश्मीरला जाण्याचा कल सर्वाधिक असल्याने सुट्टीत सहलींना जाणाऱ्यांपैकी ६५ ते ७० टक्के ठाणेकरांनी त्यावेळी काश्मीरचे बुकिंग केले होते. या काळात देशांत फिरण्यासाठी सिमला, मनाली, सिक्कीम, दार्जिलिंग, नैनीताल, शिलाँग, मेघालय, उटी, म्हैसूर; तर परदेशात युरोप, अमेरिका, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलँड यासारख्या ठिकाणांना पर्यटकांची पसंती असते. गेल्यावर्षी काश्मीरला पसंती देणारे ठाणेकर यंदा मात्र पुन्हा परदेशी सहलींकडे वळले आहेत. शिवाय देशांतर्गत फिरण्यासाठी त्यांचा कल हिमाचल प्रदेश, सिक्कीम, दाजिर्र्लिंगला आहे. या पर्यटनस्थळांचे बुकिंग मोठ्या प्रमाणात केले गेले आहे. ज्यांचे बजेट अधिक आहे त्यांनी परदेशात खास करून युरोपची निवड केली आहे आणि त्याखालोखाल सिंगापूर, मलेशिया, थायलंड यासारख्या स्थळांना पसंती दिली आहे. अलिकडे लेह- लडाख या पर्यटनस्थळांविषयीही पर्यटकांमध्ये वाढती क्रेझ आहे. तेथेही ठाणेकरांचा कल असल्याचे सहल आयोजकांनी सांगितले. (प्रतिनिधी)यंदा जितका देशांतर्गत फिरण्याकडे ठाणेकरांचा कल आहे, तितकीच पसंती त्यांनी परदेशात फिरण्यासही दिली आहे. - मयुरा बेलवले, वीणा वर्ल्डउन्हाळ््यात पर्यटक थंड हवेच्या ठिकाणांनाच प्राधान्य देतात. मध्य एप्रिल ते मे महिन्याच्या शेवटापर्यंतच्या कालावधीत फिरायला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच यंदा परदेशात फिरायला जाणाऱ्यांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढली आहे. फिरायला जाणाऱ्यांमध्ये कुटुंबांसह नव्या जोडप्यांचाही समावेश आहे. - सिद्धीका लोटलीकर, बिन्द्रा टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सकाश्मीरमधील सध्याचे वातावरण पाहता पर्यटक तेथे जाण्याची शक्यता खूप कमी आहे. साधारणत: काश्मीरला पसंती देणाऱ्या पर्यटकांनी यंदा आपला मोर्चा सिक्कीम-दाजिर्लिंगकडे वळविला आहे. देशांतर्गत फिरण्याची स्थळे ही दरवर्षी बदलत असली, तरी परदेशातील स्थळांची निवड मात्र फारशी बदलत नाही. युरोपला दरवर्षीच पर्यटकांची पसंती असते.- कौस्तुभ जोशी, हार्मनी