शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

ठाणेकरांची कचराकोंडी, अतिरिक्त १४० कोटींचा ठामपाला भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 01:11 IST

नवीन वर्षाचा मुहूर्त । दिव्यातील नगरसेवक ठाम; अतिरिक्त १४० कोटींचा ठामपाला भुर्दंड

ठाणे : दिव्यातील बेकायदा डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने घेतला आहे. शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिका तब्बल २१८ कोटी ५० लाखांचा खर्च करणार आहे. इतर महापालिकांच्या तुलनेत ठाणे महापालिका करीत असलेला खर्च हा तब्बल १४० कोटींनी अधिक असल्याचा दावा राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला. त्यामुळे प्रस्ताव पुन्हा पटलावर आणावा, त्यानंतर मंजुरी घ्यावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. सत्ताधारी शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांनी कचºयाचे काय करायचे ते करावे, मात्र ३१ डिसेंबरपर्यंत दिव्यातील डम्पिंग बंद झाले नाही, तर १ जानेवारीपासून ठाणेकरांची कचराकोंडी केली जाईल, असा इशारा माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी दिला.

शनिवारी महासभा सुरू झाल्यानंतर दिव्यातील नगरसेवक बाबाजी पाटील यांनी या खर्चाबरोबरच ज्या ठिकाणी आधीच जागा सपाट करण्यात आली आहे, त्यासाठी एवढा खर्च कशासाठी केला जात आहे, असा सवाल उपस्थित केला. त्यांनी या जागेचे फोटोच सभागृहासमोर सादर केले. तसेच या ठिकाणी पाच फुटांपेक्षा जास्त कचरा असल्यास मी माझ्या पदाचा राजीनामा देईन, असा इशाराही दिला. त्यांच्या मुद्याला धरून राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या प्रकल्पावर केला जाणारा खर्च कसा चुकीचा आहे, याचा गौप्यस्फोट केला. मुळात महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावलेल्या नोटिसांनंतर पालिकेला जाग आली आहे. त्यानुसार, हा प्रस्ताव पटलावर आणला गेला आहे. वास्तविक पाहता, पालिकेने दिलेले दर हे वाढीव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.परंतु, दुसरीकडे मुल्ला यांनी मांडलेले मुद्दे रास्त असले तरी आम्हाला दिव्यातील डम्पिंगपासून मुक्ती हवी, असा नारा देत माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी ३१ डिसेंबरपर्यंत कचºयाचा प्रश्न निकाली काढावा, अन्यथा १ जानेवारी अर्थात नव्या वर्षापासून ठाण्यातील एक इंचही कचरा दिव्यात येऊ देणार नाही, असा इशारा दिला. वेळप्रसंगी आमचे नगरसेवकपद गेले तरी चालेल, मात्र कचरा येऊ देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर सभागृह नेते अशोक वैती यांनी हा प्रस्ताव सदस्यांनी ज्या काही सूचना मांडल्या आहेत, त्यानुसार मंजूर करावा, असा ठराव मांडला. त्याला विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनी अनुमोदन दिले.2008पासून येथे कचरा टाकला जात असल्याची माहिती यावेळी उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली. तसेच वारंवार येथे डेब्रिजही टाकले जात होते. तसेच प्रत्येक कचºयावर जमिनीचा थरही दिला जात होता. त्यामुळेच हा खर्च अपेक्षित धरण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.उल्हासनगर महापालिकेने प्रतिमेट्रीक टनासाठी478रुपये देण्याचे निश्चित केले आहे, तर तिकडे इचलकरंजीने ज्या ठिकाणी सुताची जास्तीची निर्मिती होते, त्याठिकाणी बायोमायनिंग पद्धतीसाठीच ४५० रुपये प्रति मे.ट. खर्च केला आहे.परंतु, आपल्याकडे मात्र, प्रति मे. टनसाठी ९५० रुपयांचा खर्च केला जाणार आहे. दिव्यातील बंद झालेल्या डम्पिंगवर ४१ हजार मीटरपर्यंत कचरा पसरला असल्याचे गृहीत धरले व पाच मीटर खालपर्यंत कचºयाचा थर असल्याचे गृहीत धरले, तरी याचा एकूण खर्च हा ७५ ते ८० कोटींपेक्षा जास्त असू शकत नाही.असे असताना पालिका ही सुपारी कशाला वाजवत आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. त्यामुळे प्रशासनाने नियमानुसार हा प्रस्ताव पुन्हा सादर करावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली.

 

टॅग्स :thaneठाणे