शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

कोरोना काळात ठाणेकरांची क्रूर थट्टा; प्रशासनाने सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा मनसेचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 14:00 IST

कर माफी देण्याऐवजी १० टक्के सवलतीची पालिकेची फसवी योजना 

ठाणे: कोरोनाकाळात  सर्वसामान्य ठाणेकरांचे आधीच आर्थिक गणित बिघडले आहे. त्यातच कर माफी देण्याएेवजी १० टक्के सवलतीची पालिकेने फसवी योजना आणून ठाणेकरांची क्रूर थट्टाच केली आहे. या योजनेनुसार सामान्य कराच्या दुसऱ्या सहामाहीवर तुटपुंजी सुट देत पालिका प्रशासनाने सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप मनसेने केला आहे. याप्रश्नी सहानूभूतीपुर्वक विचार करून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १३३ - अ अन्वये मालमत्ता कर माफ करावा, ही मागणी मनसेने पालिका प्रशासनाला केली आहे.

कोरोनाच्या अनुषंगाने लाॅकडाऊन सुरु होताच ठाणे शहरातील बहुतांश दुकाने, कारखाने मार्च महिन्यापासून बंद होती. त्यामुळे त्यांच्या खिशाला नाहक आर्थिक काञी बसलीच आहे. याआधी व्यापारी, कारखानदार व सर्वसामान्य ठाणेकर कराच्या रूपातून त्यांची जबाबदारी पार पाडताना दिसून आले आहे. माञ यंदाच्या कोरोना संकटकाळात महापालिका प्रशासनाने कर माफी देण्याऐवजी १५ सप्टेंबर पुर्वी सामान्य करावर १० टक्के सवलत देण्याची जुनीच फसवी योजना आणली आहे. एकूण मालमत्ता करापैकी ३८ टक्के सामान्य कर आहे. पालिकेने सामान्य करावर १० टक्के सूट ते सुध्दा दुसऱ्या सहामाहीवर म्हणजे ३८ टक्केपैकी १९ टक्के सामान्य करावर १० टक्के याचा अर्थ १०० रूपयांपैकी फक्त एक रूपये ९० पैसे अशी ठाणेकरांच्या डोळ्यात धुळफेक करणारी सूट दिली आहे. 

ठाणेकरांची कोरोना काळात अशी केलेली थट्टा शोभनीय नसून या फसव्या योजनेची सवंग जाहिरातबाजी ठाणे पालिका प्रशासनाने तत्काळ थांबवावी. तसेच यंदा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अन्वये १३३-अ अन्वये ठाणेकरांना नैसर्गिक आपत्तीनुसार करमाफी द्यावी, अशी मागणी मनसेचे ओवळा माजीवडा विधानसभेचे विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केली आहे. याप्रश्नी ठाणे पालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांना पाचंगे यांनी निवेदन दिले असून आयुक्तांनी करमाफी देऊन लोकहिताचा निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

करमाफीचा आयुक्तांना सर्वस्वी अधिकार

नैसर्गिक आपत्ती किंवा काही कारणांमुळे मालमत्ता कर माफ करण्याचा अधिकार आयुक्तांना आहे. कोरोना काळात आरोग्य सेवा देण्यास पालिका असमर्थ ठरल्यामुळे लोकांनी खाजगी रूग्णालयात उपचार घेतले. त्यामुळे मार्च ते जुलै या कालावधीतील कोणताही कर घेण्याचा नैतिक अधिकार महापालिकेला नाही. - संदीप पाचंगे, मनसे विभाग अध्यक्ष, ओवळा माजिवडा विधानसभा

५०० चौरस फूटांच्या करमाफीचे दिवास्वप्नच

सत्ताधारी शिवसेनेच्या वचननाम्यात ५०० चौरस फूट घरांना मालमत्ता निवडणुकीनंतर कर माफ होणार, असे स्वप्न दाखवण्यात आले होते. माञ हे स्वप्न पुर्ण होईल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे निदान संकंटकाळात तरी मालमत्ता कर माफ करून दाखवा, अशी मागणी पाचंगे यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेMNSमनसे