शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शक्तिप्रदर्शनाने ठाणेकरांची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 23:30 IST

अनेकांचे हाल : अडीच तास अडकले वाहनचालक; पोलीस छावणीचे स्वरूप

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी सोमवारी राष्टÑवादी आणि शिवसेनेच्या वतीने शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यामुळे आधीच वाढत्या उष्णतेने हैराण झालेल्या ठाणेकरांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. पाचपाखाडी, तलावपाळी, स्टेशन परिसर, मार्केट परिसर, कोर्टनाक्यासह इतर मार्गांवर प्रचंड वाहतूककोंडीचा सामना वाहनचालकांना सहन करावा लागला. कोर्टनाक्याजवळ तर पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

लोकसभा निवडणुकीची धामधूम आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. सोमवारी शिवसेना आणि राष्टÑवादीच्या वतीने उमेदवारी अर्ज भरण्यात आले. यावेळी दोन्ही पक्षांकडून जंगी मिरवणूक काढण्यात आली. परंतु, यामुळे अनेकांचे चांगलेच हाल झाले. वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांचा फौजफाटा ठिकठिकाणी तैनात होता. मात्र, तरीदेखील ठाणेकरांना वाहतूककोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला. राष्टÑवादीची मिरवणूक ही पाचपाखाडी येथील पक्ष कार्यालयापासून ११.३० च्या सुमारास सुरूझाली. ती अल्मेडामार्गे पुढे, जांभळीनाका, टेंभीनाकामार्गे सिव्हील रुग्णालय आणि पुढे शासकीय विश्रामगृहाजवळ आली. त्यामुळे येथील सर्वच मार्गांवर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. दुसरीकडे शिवसेनेची मिरवणूक ही मासुंदा तलावाजवळील कार्यालयापासून निघून, राममारुती रोड, गावदेवी, स्टेशन, मार्केट, तहसीलदार कार्यालय, पुढे कोर्टनाका अशी आली. परंतु, यामुळे कोर्टनाका ते थेट स्टेशनपर्यंत मार्केटमधून जाणारा मार्ग हा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे दुसऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.

राममारुती रोड, गावदेवी हासुद्धा गर्दीचा आणि गजबजलेला भाग असल्याने या ठिकाणीही वाहतूककोंडीची भर पडली होती. त्यामुळे शहरातील मुख्य मार्ग जवळजवळ दोन ते अडीच तास वाहतूककोंडीत अडकले होते. त्यामुळे अनेकांनी वाहनांतून उतरून चालण्याचा पर्याय निवडल्याचेही दिसून आले.

कोर्टनाका येथेच जिल्हाधिकारी कार्यालय असून तेथे अर्ज भरले जाणार असल्याने या भागाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. त्यामुळे येथील दोन्ही मार्ग वाहतूककोंडीने गच्च भरल्याचे दिसून आले. एकूणच दोन ते अडीच तासांनंतर वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.ठाण्यात सात जणांचे अर्ज दाखलठाणे लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख उमेदवारांचादेखील समावेश आहे. आतापर्यंत या मतदारसंघात ११ जणांची उमेदवारी दाखल झाली आहे. ९ एप्रिल हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

च्विद्यमान खासदार व शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार राजन विचारे यांच्यासह काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीचे आनंद परांजपे या प्रमुख उमेदवारांनी सकाळी मुहूर्ताच्या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल केले. यात विचारेंनी चार तर परांजपे यांनी तीन अर्ज भरले आहेत. याप्रमाणेच बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे प्रभाकर जाधव,सर्वोदय भारत पार्टीचे ब्रह्मदेव पांडे, भारत जनआधार पार्टीचे अजय गुप्ता, हिंदुस्थान निर्माण दलाचे ओंकारनाथ तिवारी आणि डॉ. अक्षय झोडगे या अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केले.

टॅग्स :thane-pcठाणे