शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

कायद्याचा दंडुका न उगारताही ठाणेकरांनी चांगली साथ दिली

By जितेंद्र कालेकर | Updated: May 6, 2021 00:23 IST

फणसळकर यांना राज्य राज्याच्या पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून (पोलीस महासंचालक) मंगळवारी बढती मिळाली. त्यानंतर आपल्या ठाण्यातील कार्यकाळाबद्दल बोलतांना ते म्हणाले, कोणत्याही अधिकाºयाला किंवा कर्मचाºयाला वेळेत पदोन्नती झाली की, त्याचे वेगळेच समाधान असते. ते आपल्यालाही ठाण्यातून जातांना मिळाले.

ठळक मुद्दे विवेक फणसळकरबढती, बदलीनंतर व्यक्त केल्या भावना

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र हे वैविध्यपूर्ण आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या वेळी लॉकडाऊन केले. त्यानंतर केवळ आवाहन करताच ठाणेकरांनी चांगली साथ दिली. कुठेही कायद्याचा दंडूका उगारण्याची वेळ आली नाही. आपल्या कार्यकाळात कायदा सुव्यवस्था चांगल्या तºहेने हाताळता आली, याचे समाधान असल्याच्या भावना ठाण्याचे मावळते पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बातचीत करतांना व्यक्त केल्या.फणसळकर यांना राज्य राज्याच्या पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून (पोलीस महासंचालक) मंगळवारी बढती मिळाली. त्यानंतर आपल्या ठाण्यातील कार्यकाळाबद्दल बोलतांना ते म्हणाले, कोणत्याही अधिकाºयाला किंवा कर्मचाºयाला वेळेत पदोन्नती झाली की, त्याचे वेगळेच समाधान असते. ते आपल्यालाही ठाण्यातून जातांना मिळाले. त्यामुळे ठाणेकर, ठाण्यासह कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर येथील नागरिक आणि लोकप्रतिनिधीं, पोलीस अधिकारी कर्मचारी या सर्वांच्याच सहकार्यामुळे ही बढती मिळाल्याचे ते म्हणाले. कोरोना काळात ठाणे पोलिसांनी जी कौतुकास्पद कामगिरी केली. याची दखल राज्य शासनानेही घेतली. यात दोन हजारांपेक्षा अधिक अधिकारी कर्मचारी बाधित झाले. तर ३५ पोलीस शहीद झाले, याचे शल्य असल्याचेही ते म्हणाले.३१ जुलै २०१८ पासून ते आतापर्यंत पावणे तीन वर्षांच्या कालावधीत ठाणे शहर पोलिसांनी लोकसभा तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, गणेशोत्सव, रमजान आणि नवरात्र या सारखे सण उत्सव कोणतेही गालबोट न लागता पार पाडले. गुन्हेगारीवर नियंत्रण तसेच दोष सिद्धीमध्येही चांगली वाढ झाल्याबद्दलही त्यांनी व्यक्त केले.* कोरोनाकाळात तर नागरिकांच्या आणि पोलिसांच्या अडचणी स्वत:च्या समजून काम केले. त्यामुळे नागरिकांप्रमाणे अनेक पोलिसांचे त्यांच्या कुटूंबीयांचे प्राण वाचविता आले. कोरोनामुळे दुर्देवाने शहीद झालेल्या पाल्यांच्या मुलांनाही तात्काळ पोलीस सेवेत घेण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला.* हे काम अपुरेच राहिले....भिवंडीतील उपायुक्तांचे कार्यालय आणि निजामपुरा पोलीस ठाण्याचे काम गेली १२ वर्षे रखडले होते. याच बांधकामावरुन दंगल झाल्याने यात दोन पोलीस कर्मचारी शहीद झाले होते. २०१८ पासून सुरु झालेले हे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण होईल. आपल्याच कार्यकाळात हे पूर्ण करण्याचा मानस होता. पण ते पूर्ण करायचे राहून गेले. वर्तकनगर पोलीस वसाहतींचा पुनर्विकासही काही कारणास्तव रखडला.* कोरोना काळात सकारात्मक उर्जा, चेतना कायम ठेवून टीम वर्कने काम केले. यात ठाणेकरांनी चांगली साथ दिली. तब्बल ९० लाखांची लोकसंख्या असलेल्या पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात आपल्या कार्यकाळात कायदा सुव्यवस्था शांततेत पार पडली, याचेही समाधान असल्याचे ते फणसळकर म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसTransferबदली