शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे स्टेशन बाजारपेठेतील भाजी विक्रेते आणि फेरीवाल्यांचा टिएमटीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 16:46 IST

जांभळी नाका ते स्टेशन परिसरातील बाजारपेठेत बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी ठाणे परिवहन प्रशासन आणि समिती पुढे सरसावली आहे. परंतु या भागात आजही फेरीवाले बसत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देरविवारी पुन्हा सांयकाळी टिएमटीचा चक्काजाम कारवाई करुनही फेरीवाल्यांचे या भागात बस्तान

ठाणे - स्टेशन ते जांभळी नाका या भागातील फेरीवाल्यांना हटविल्यानंतर पहाटेच्या सुमारास बसणाऱ्या या रस्त्यांवर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांचा अडथळा आता टिएमटीच्या बसेसला होऊ लागला आहे. त्यामुळे या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी ठाणे परिवहन प्रशासन आणि परिवहनच्या समिती सदस्यांनी शनिवारी पहाटे या भागात पाहणी दौरा घेऊन येथील भाजी विक्रेत्यांवर अतिक्रमण विभागाच्या मदतीने कारवाई केली होती. परंतु रविवारी मात्र दुपार नंतर या भागात भाजी विक्रेत्यांबरोबरच फेरीवाल्यांनी दोन्ही बाजूंनी रस्ता अडविल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे स्टेशन ते जांभळीनाक्यापर्यंत टिएमटी बसेसच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत होते. त्यामुळे येथील कारवाई बाबत पुन्हा एकदा शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.          ठाणे येथील जांभळी नाक्यापासून ते रेल्वे स्थानकापर्यंत जाणाया मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे रुंदीकरण केल्यानंतर येथील फेरीवाल्यांना हटविण्याची मोहीम देखील जोरात राबविली होती. परंतु तरी देखील येथे फेरीवाल्यांचे वास्तव्य दिसून येत होते. त्यामुळे आळी पाळीने विविध अधिकारी आणि एस्ट्रा फोर्स घेऊन येथे कारवाई सुरु आहे. परंतु असे असले तरी देखील आजही या मार्गावरील फेरीवाल्यांची संख्या मात्र कमी झालेली दिसत नाही. त्यामुळे या फेरीवाल्यांचा आता टिएमटीच्या बसेसला देखील अडथळा निर्माण होऊ लागला आहे. रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर या बाजारपेठ मार्गातून परिवहनच्या बसेस धावू लागल्या आहेत. परंतु सुरवातीला फेरीवाल्यांचे आणि आता पहाटे या बाजारपेठीत बसणाºया भाजी विक्रेत्यांचा फटका आता परिवहनच्या बसेसला बसत असल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे ४ ते सकाळी ९ वाजेपर्यंत या मार्गावर शहरातील छोटे विक्र ेते भाजी खरेदीसाठी येत असल्यामुळे याठिकाणी मोठी गर्दी होते. त्यामुळे या मार्गावरून स्थानकाच्या दिशेने जाणाºया बसेसला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. ऐन सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला देखील याचा फटका बसत आहे. तसेच भाजी खरेदी करणाºया ग्राहकांना बसचा धक्का लागून अपघात होण्याची शक्यता भितीही व्यक्त होते. काँग्रेसचे परिवहन सदस्य सचिन शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करत ठराविक वेळेत बस पुर्वीच्या मार्गाने वळविण्याची मागणी केली. मात्र, बसचा मार्ग वळविल्यास प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, या मागणीच्या पार्श्वभूमीवर परिवहनचे व्यवस्थापक संदीप माळवी, सभापती अनिल भोर, सदस्य सचिन शिंदे आणि राजेंद्र महाडीक यांनी शनिवारी पहाटे बाजारपेठ मार्गाची पाहाणी केली. त्यानंतर बसचा विनाअडथळा आणि अपघातमुक्त प्रवास व्हावा यासाठी पालिकेच्या अतिक्र मण पथकाची मदत घेण्याचा विचार प्रशासनाने सुरु केला आहे. बाजारपेठ मार्गावर पहाटे ते सकाळपर्यंत भाजी विक्र ेते बसत असल्यामुळे या काळात येथे अतिक्र मण पथकाचे एक वाहन ठेवायचे आणि भाजी विक्र ेत्यांचा बसच्या वाहतूकीला अडथळा होणार नाही, याकडे पथकाने लक्ष द्याायचे, अशी योजना प्रशासनाकडून आखली जात असल्याचे महापालिका सुत्रांनी सांगितले.                दरम्यान, पहाटेचा मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु असला तरी देखील या भागातील फेरीवाल्यांची संख्या मात्र आजही कमी झालेली नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रविवारी फेरीवाले बसल्याचे दिसून आले. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानांच्या बाहेर दुचाकींची पार्कींग झाली होती. त्यामुळे जांभळी नाका ते स्टेशन पर्यंतच्या अवघ्या ३ मिनिटांच्या अंतरांसाठी टिएमटीच्या बसेसला तब्बल १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागत होता. त्यामुळे पालिकेचे अतिक्रमण विभाग कारवाई करते की या फेरीवाल्यांना पाठीशी घालण्याचे काम करीत आहे. असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त