शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

क्लायमेट सिटीत ठाणे देशात दुसऱ्या क्रमांकावर; सकारात्मक वातावरण बदलासाठी प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 03:00 IST

मागील काही वर्षांत हवेची गुणवत्ता राखण्यात पालिकेला यश आले आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या एनर्जी आणि ग्रीन बिल्डिंग, अर्बन प्लानिंग, ग्रीन कव्हर, बायोडायव्हर्सिटी, ट्रान्सपोर्ट आणि हवा गुणवत्ता तसेच पाण्याचे नियोजन आणि वेस्ट मॅनेजमेंटवर केलेले विविध प्रयोग या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून राबविलेल्या या योजनांमुळे ठाणे शहराने स्मार्ट सिटी क्लायमेटमध्ये अर्थात वातावरणातील सकारात्मक बदलासाठी सक्षम असलेल्या शहरांमध्ये देशातून दुसरा क्रमांक पटकावला आहे. यामध्ये पहिला क्रमांक इंदूर या शहराचा लागला असून तिसºया क्रमांकावर सुरत आहे. त्यामुळे ठाण्याच्या मानात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. गेल्या वर्षी ठाणे शहर यात सहाव्या क्रमाकांवर होते. यंदा चार क्रमाकांची आघाडी घेऊन दुसरे स्थान पटकाविले आहे.दिल्लीमधील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अर्बन अफेअर्सने घेतलेल्या स्पर्धेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. यामध्ये ठाणे शहराचा क्रमांकदुसरा आला आहे. या स्पर्धेत देशातील १०० शहरे सहभागी झाली होती. त्यानुसार, विविध माध्यमांतून ठाणे शहराने आपली छाप सोडल्याचे दिसून आले आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून मागील पाच वर्षांत शहराचा ग्रीन कव्हर वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. ठाण्याचा विचार केल्यास शहराचे विकसित क्षेत्र हे ४६ टक्के एवढे आहे, तर २५ टक्के हरित क्षेत्र आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजनही महापालिकेने राबविले असून स्मार्ट मीटरचा वापर सुरूकेला आहे. तसेच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिकेने रिमॉडेलिंगची योजना पुढे आणली आहे. ऊर्जा कार्यक्षमता आणि नवीनीकरणीय ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून सौरऊर्जेवर निर्माण करणारी यंत्रणा, सौरऊर्जेवर चालणारे सिग्नल, सौरब्लिंकर्स, बायोमिथेनायझेन प्रक्रिया, महापालिका शाळांवर सौरऊर्जेवर वीजनिर्मिती आणि शहरात लावण्यात येत असलेले एलईडी दिवे यामुळेदेखील पालिकेने मागील पाच वर्षांत मेहनत घेतली आहे. तसेच ग्रीन बिल्डिंग संकल्पना राबवून एक वेगळा प्रयत्न सुरू केला आहे. सार्वजनिक वाहतूकव्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न झाले आहेत.हवेची गुणवत्ता राखण्यात यशमागील काही वर्षांत हवेची गुणवत्ता राखण्यात पालिकेला यश आले आहे. सण-उत्सवांच्या काळात हवेची गुणवत्ता व्यवस्थित राहावी, यासाठी जनजागृती मोहीम, हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध चौकांत लावलेली यंत्रणा यामुळेदेखील हवेची गुणवत्ता सुधारली आहे. तसेच इतरही योजना राबवून पालिकेने शहरात अर्बन प्लानिंगच्या दिशेने योग्य ती पावले टाकली आहेत. वेस्ट मॅनेजमेंटमध्येही पालिकेच्या माध्यमातून विविध योजना हाती घेतल्या आहेत. या सर्वांची दखल घेतल्यामुळेच ठाणे शहर हे देशात दुसºया क्रमाकांवर आले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका