शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  

By धीरज परब | Updated: October 1, 2024 22:00 IST

Thane News: महाराष्ट्राने नेहमी धर्म आणि अध्यात्म स्वीकारले आहे . अध्यात्म व मानवतेला जोडण्याचे काम केले आहे. ही संतांची आणि वीरांची भूमी आहे . धार्मिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान पेक्षा राजकारण्यांचे अधिष्ठान हे खालीच आहे. सनातन धर्माची रक्षा करणे हि आमची जबाबदारी आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाईंदर येथील भागवत सत्संग व सनातन राष्ट्रीय सम्मेलन प्रसंगी केले . 

 मीरारोड - महाराष्ट्राने नेहमी धर्म आणि अध्यात्म स्वीकारले आहे . अध्यात्म व मानवतेला जोडण्याचे काम केले आहे . हि संतांची आणि वीरांची भूमी आहे . धार्मिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान पेक्षा राजकारण्यांचे अधिष्ठान हे खालीच आहे . सनातन धर्माची रक्षा करणे हि आमची जबाबदारी आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाईंदर येथील भागवत सत्संग व सनातन राष्ट्रीय सम्मेलन प्रसंगी केले . 

भाईंदरच्या बाळासाहेब ठाकरे मैदानात आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान भागवत सत्संग व सनातन राष्ट्रीय सम्मेलन आयोजित केले होते . सोमवारी मुख्यमंत्री यांनी उपस्थित जगद्गुरु शंकराचार्य स्वामीश्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज , द्वारकाशारदापीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी सदानन्द सरस्वती जी महाराज, अनिरुद्धाचार्य महाराज , गजानन ज्योतकर गुरूजी आदींचे आशीर्वाद घेतले . यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत , खासदार नरेश म्हस्के , आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन , माजी मंत्री कृपाशंकर सिंह , माजी आमदार गिलबर्ट मेंडोन्सा व  रवींद्र फाटक , उत्तर प्रदेश संपर्क प्रमुख विक्रमप्रताप सिंह , युवासेनेचे पूर्वेश सरनाईक , माजी नगरसेविका परीशा सरनाईक , शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर आदी उपस्थित होते . 

पालघर भागातील साधूंच्या हत्येची घटना घडली त्यावेळेचे सत्ताधीश गप्प बसले होते .पण आमच्या राज्यात साधूना हात लावायची कोणाची हिम्मत होणार नाही . गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्याने गोरक्षा होणार , गोशाळांना अनुदान मिळणार , गाईला चारा साठी प्रति दिवस ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले . बाळासाहेबांचे हिंदुत्व व तत्व ज्यांनी विकले त्यांचे अस्तित्व जनता मिटवेल. जो हिंदुत्वाचा  पुरस्कार करेल तो बाळासाहेंबाच्या विचारांचा खरा वारसदार असल्याचा टोला त्यांनी माज़ीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला . 

देशात आता पर्यंत अनेक प्रधानमंत्री ,  मुख्यमंत्री झाले पण गाईला  राज्यमातेचा दर्जा देण्याची हिम्मत दाखवणारे एकनाथ शिंदे आजच्या घडीला देशात एकच छप्पन इंच छाती असणारे आहेत . सनातन धर्माचे प्रतीक वृषभ म्हणजेच बैल आहे . राजस्तंभावर बैलाचे चिन्ह आहे . संसदेच्या उदघाटन वेळी पंतप्रधान यांनी  हातात सोन्याचा राजदंड घेऊन प्रवेश केला . त्या राजदंडावर देखील बैलाला स्थान आहे .  मग त्याला कापण्याची , तुकडे करून पॅकेट मध्ये भरण्याची , त्याच्या विक्रीतून आलेले पैसे तिजोरीत भरण्याची हिम्मत कसे काय देशाचा प्रधानमंत्री करू शकतो ? असा सवाल यावेळी जगद्गुरु शंकराचार्य स्वामीश्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी केला . 

आम्हाला गौमतदाता बनायचे आहे. गाई साठी जो उमेदवार व पक्ष उभा राहील त्यांच्यासाठी आपण मनमोकळेपणे मतदान करायचे आहे . केंद्र सरकारने पण गौमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा ; देशाच्या अन्य राज्यातील मुख्यमंत्र्यांनी पण तसे करावे . देशातील बहुसंख्यांकच्या भावनांचा सन्मान अल्पसंख्यांक यांना करावा लागेल . अन्यथा जगात त्यांचे ५६ देश आहेत . कोणी जर गौमातेच्या निर्णया बद्दल प्रश्नचिन्ह करेल तर त्याच्या नेतृत्वाचा अधिकार संपवून टाका असे आवाहन अविमुक्तेश्वरानंद यांनी केले . 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाHinduismहिंदुइझमthaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदर