शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  

By धीरज परब | Updated: October 1, 2024 22:00 IST

Thane News: महाराष्ट्राने नेहमी धर्म आणि अध्यात्म स्वीकारले आहे . अध्यात्म व मानवतेला जोडण्याचे काम केले आहे. ही संतांची आणि वीरांची भूमी आहे . धार्मिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान पेक्षा राजकारण्यांचे अधिष्ठान हे खालीच आहे. सनातन धर्माची रक्षा करणे हि आमची जबाबदारी आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाईंदर येथील भागवत सत्संग व सनातन राष्ट्रीय सम्मेलन प्रसंगी केले . 

 मीरारोड - महाराष्ट्राने नेहमी धर्म आणि अध्यात्म स्वीकारले आहे . अध्यात्म व मानवतेला जोडण्याचे काम केले आहे . हि संतांची आणि वीरांची भूमी आहे . धार्मिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान पेक्षा राजकारण्यांचे अधिष्ठान हे खालीच आहे . सनातन धर्माची रक्षा करणे हि आमची जबाबदारी आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाईंदर येथील भागवत सत्संग व सनातन राष्ट्रीय सम्मेलन प्रसंगी केले . 

भाईंदरच्या बाळासाहेब ठाकरे मैदानात आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान भागवत सत्संग व सनातन राष्ट्रीय सम्मेलन आयोजित केले होते . सोमवारी मुख्यमंत्री यांनी उपस्थित जगद्गुरु शंकराचार्य स्वामीश्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज , द्वारकाशारदापीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी सदानन्द सरस्वती जी महाराज, अनिरुद्धाचार्य महाराज , गजानन ज्योतकर गुरूजी आदींचे आशीर्वाद घेतले . यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत , खासदार नरेश म्हस्के , आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन , माजी मंत्री कृपाशंकर सिंह , माजी आमदार गिलबर्ट मेंडोन्सा व  रवींद्र फाटक , उत्तर प्रदेश संपर्क प्रमुख विक्रमप्रताप सिंह , युवासेनेचे पूर्वेश सरनाईक , माजी नगरसेविका परीशा सरनाईक , शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर आदी उपस्थित होते . 

पालघर भागातील साधूंच्या हत्येची घटना घडली त्यावेळेचे सत्ताधीश गप्प बसले होते .पण आमच्या राज्यात साधूना हात लावायची कोणाची हिम्मत होणार नाही . गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्याने गोरक्षा होणार , गोशाळांना अनुदान मिळणार , गाईला चारा साठी प्रति दिवस ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले . बाळासाहेबांचे हिंदुत्व व तत्व ज्यांनी विकले त्यांचे अस्तित्व जनता मिटवेल. जो हिंदुत्वाचा  पुरस्कार करेल तो बाळासाहेंबाच्या विचारांचा खरा वारसदार असल्याचा टोला त्यांनी माज़ीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला . 

देशात आता पर्यंत अनेक प्रधानमंत्री ,  मुख्यमंत्री झाले पण गाईला  राज्यमातेचा दर्जा देण्याची हिम्मत दाखवणारे एकनाथ शिंदे आजच्या घडीला देशात एकच छप्पन इंच छाती असणारे आहेत . सनातन धर्माचे प्रतीक वृषभ म्हणजेच बैल आहे . राजस्तंभावर बैलाचे चिन्ह आहे . संसदेच्या उदघाटन वेळी पंतप्रधान यांनी  हातात सोन्याचा राजदंड घेऊन प्रवेश केला . त्या राजदंडावर देखील बैलाला स्थान आहे .  मग त्याला कापण्याची , तुकडे करून पॅकेट मध्ये भरण्याची , त्याच्या विक्रीतून आलेले पैसे तिजोरीत भरण्याची हिम्मत कसे काय देशाचा प्रधानमंत्री करू शकतो ? असा सवाल यावेळी जगद्गुरु शंकराचार्य स्वामीश्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी केला . 

आम्हाला गौमतदाता बनायचे आहे. गाई साठी जो उमेदवार व पक्ष उभा राहील त्यांच्यासाठी आपण मनमोकळेपणे मतदान करायचे आहे . केंद्र सरकारने पण गौमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा ; देशाच्या अन्य राज्यातील मुख्यमंत्र्यांनी पण तसे करावे . देशातील बहुसंख्यांकच्या भावनांचा सन्मान अल्पसंख्यांक यांना करावा लागेल . अन्यथा जगात त्यांचे ५६ देश आहेत . कोणी जर गौमातेच्या निर्णया बद्दल प्रश्नचिन्ह करेल तर त्याच्या नेतृत्वाचा अधिकार संपवून टाका असे आवाहन अविमुक्तेश्वरानंद यांनी केले . 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाHinduismहिंदुइझमthaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदर