शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

 ठाणे पोलिसांनी हस्तगत केले चोरी आणि गहाळ झालेले १०० मोबाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 01:01 IST

गेल्या काही दिवसांमध्ये ठाणे शहर परिसरातून चोरीस गेलेले तसेच गहाळ झालेल्या तब्बल शंभर मोबाईल फोनचा शोध घेण्यात ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाला यश आल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त दिनकर मोहिते यांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्देगुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता शोध पथकाची कामगिरीदोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गेल्या काही दिवसांमध्ये ठाणे शहर परिसरातून चोरीस गेलेले तसेच गहाळ झालेल्या तब्बल शंभर मोबाईल फोनचा शोध घेण्यात ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाला यश आल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त दिनकर मोहिते यांनी बुधवारी दिली. यामध्ये दोन चोरीचे तसेच दोन सोनसाखळी चोरीचेही गुन्हे उघड झाले असून याप्रकरणी अरुण कांबळे ( वय २६, रा. कल्याण) याच्यासह दोघांना अटक केल्याचेही त्यांनी सांगितले.ठाणे शहर परिसरातील वाढत्या मोबाईल चोरी तसेच जबरी चोरीच्या घटनांवर आळा बसण्यासाठी तसेच ते उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली एका मोबाईल जबरी चोरी विरोधी पथकाची निर्मिती करण्यात आली. या पथकातीलपोलीस उपनिरीक्षक महेश जाधव तसेच पोलीस अंमलदार राजेंद्र काठोळे, अनिल पाटील, शशिकांत भदाणे, नामदेव मुंडे, रोशन जाधव, सागर सुरळकर आणि हुसेन तडवी यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे मोठया कौशल्याने तपास करीत चोरीस गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यास सुरु वात केली होती.याचदरम्यान २० डिसेंबर २०२१ रोजी आधी अरुण कांबळे याला दिवा येथून तर ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून विशाल जाधव याला अटक केली. कांबळे याच्या चौकशीत रेल्वेतील एका मोबाईल चोरीचा शोध लागला. तर विशालकडून मोबाईल चोरीसह कोपरीतील दोन सोनसाखळी चोरीचे असे तीन गुन्हे उघड झाले आहेत. या पथकाने वेगवेगळया कंपनीचे १०० मोबाईल आणि चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. दोघांनाही संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग केले आहे. त्याचबरोबर आणखी काही मोबाईलचा अजूनही शोध घेतला जात आहे. यातील दहा मोबाईल हे चोरीतील तर ९० मोबाईल गहाळ झालेले मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.बहाणा करीत सामान्य नागरिकांना मोबाईलची विक्री-मोबाईलची चोरी केल्यानंतर आपली आई आजारी आहे. तसेच गावी जायचे आहे, त्यासाठी पैसे नसल्याचा बहाणा करीत चोरटयांनी सामान्य नागरिकांना हे मोबाईल विक्री केल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी पलायन केले. अशा चोरटयांचाही शोध घेण्यात आहे.* मोबाईल घेताना अशी घ्या काळजी-मोबाईल चोरी झाला असल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यांशी संपर्क करावा. तसेच प्रवासात अथवा रस्त्याने मोबाईल चोरी जाणार नाही अथवा गहाळ होणार नाही याची काळजी घ्यावी. अल्प किंमतीमध्ये कोणी मोबाईलची विक्री करीत असल्यास खातरजमा करुनच ते खरेदी करावे, अन्यथा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी