शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

राजस्थानच्या अपहृत दोन संचालकांची ठाणे पोलिसांनी केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 22:23 IST

उदयपूर येथील एका वित्त संस्थेकडे मोठे कर्ज मागण्याच्या बहाण्याने दोन संचालकांचे अपहरण करून त्यांच्याकडून २५ लाखांची खंडणी उकळणाऱ्या सहा जणांना ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून २५ लाखांची रोकड, कार आणि तलवारही जप्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे मुंबईच्या पोलीस हवालदारासह सहा जणांना अटक२५ लाखांची रोकड, कार आणि तलवार हस्तगतचौघांना मिळाली पोलीस कोठडी

ठाणे : उदयपूर (राजस्थान) येथील एका खासगी वित्त संस्थेकडे मोठे कर्ज मागण्याच्या बहाण्याने दोन संचालकांचे अपहरण करून त्यांच्याकडून २५ लाखांची खंडणी उकळण्याचा डाव ठाणेखंडणीविरोधी पथकाने उधळून लावला. यातील लेनीन कुट्टीवट्टे याच्यासह सहा जणांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून ही २५ लाखांची रोकड आणि तलवारही हस्तगत केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली. विशेष म्हणजे आरोपींमध्ये तुकाराम मुदगन या मुंबईच्या पोलीस हवालदाराचाही समावेश आहे.उदयपूरच्या ‘श्री तिरुपती फायनानिक्स निधी लिमिटेड’ या कंपनीकडे लेनीन आणि त्याच्या साथीदारांनी आधी मालमत्तेच्या तारणावर मोठ्या कर्जाची मागणी केली. त्यानंतर कल्याण, भिवंडी परिसरातील मालमत्तेची मूळ कागदपत्रे आणि मालमत्ता दाखवण्याच्या बहाण्याने देवानंद वरंदानी आणि रोनक सैनी (रा. दोघेही उदयपूर, राजस्थान) या दोन्ही संचालकांना ठाण्याच्या अशोक सिनेमागृह भागात बोलवले. त्यांचे ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वा.च्या सुमारास अपहरण करून डोंबिवलीतील इस्टेट एजंटच्या कार्यालयात त्यांना नेले. तिथे तलवारीच्या धाकावर तसेच त्यांना मारहाण करून त्यांच्याकडे एक कोटीच्या खंडणीची मागणी केली. पैसे दिले नाही, तर ठार करण्याचीही त्यांनी धमकी दिली. भीतीने देवानंद यांनी अखेर २५ लाख रुपये देण्याचे मान्य केले. उदयपूर येथून त्यांचा साथीदार पैसे घेऊन येईपर्यंत देवानंदसह दोघांनाही कल्याण येथील एका लॉज आणि घरात ठेवले. त्यानंतर, ८ सप्टेंबर रोजी हे पैसे घेऊन आलेल्याला त्यांनी आपल्या गाडीत घेतले. त्याची गाडी मात्र खंडणीखोरांनी परत पाठवण्यास सांगितली. त्याचवेळी देवानंद यांच्या मित्राने ही माहिती ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना दिली. त्यानंतर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कोथमिरे, विकास घोडके, उपनिरीक्षक रमेश कदम, विकास बाबर, अविनाश महाजन, रोशन देवरे, हेमंत ढोले, जमादार जानू पवार, हवालदार संजय भिवणकर, अंकुश भोसले आणि नितीन ओवळेकर आदींच्या पथकाने सापळा लावून अपहरणकर्त्यांची गाडी कल्याण भागातून पाठलाग करून ८ सप्टेंबर रोजी पकडली. याच गाडीतून त्यांनी एका अपहृत संचालकांची सुटका केली. त्यावेळी लेनीन आणि शेलार यांना २५ लाखांच्या रोकड आणि कारसह शनिवारी सायंकाळी अटक केली. त्यांच्याकडील चौकशीतून अन्य एका संचालकाची हाजीमलंग रोड येथील घरातून सुटका केली. तिथून सागर साळवे, ओमप्रकाश जैस्वाल, अभिषेक झा आणि पोलीस हवालदार तुकाराम मुदगन अशा चौघांना ९ सप्टेंबर रोजी तलवारीसह अटक केली. यातील साळवेसह चौघांना १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

-----------------------

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी