शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

ठाणे पोलिसांनी उतरवली २१४३ तळीरामांची झिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 00:29 IST

८० अधिकाऱ्यांचा सहभाग; ४७० चालकांवर भरणार न्यायालयात खटले, तीन दिवसांमध्ये केली धडक कारवाई

ठाणे : नववर्ष स्वागताच्या निमित्ताने ‘मद्य पार्टी’ करून वाहन चालविणाºया एक हजार ६७३ तळीरामांवर ठाणे शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. २९ ते ३१ डिसेंबर या तीन दिवसांत दोन हजार १४३ जणांविरुद्ध ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरमधील १८ युनिटच्या सुमारे ६०० पोलिसांनी ही कारवाई केली. गेल्या वर्षी मात्र केवळ एका दिवसांत दोन हजार ७१ तळीरामांवर कारवाई झाली होती.थर्टी फर्स्ट साजरी करण्याच्या धुंदीत अनेक तळीराम हे बेदरकारपणे वाहन चालवितात. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री ते पहाटेपर्यंत भन्नाट वेगाने जाणाºया वाहनांच्या अपघातांमध्ये अनेकांचा नाहक बळी जातो. तर, गंभीर जखमी होऊन अनेकांना कायमचे अपंगत्वही येते. सर्वाेच्च न्यायालयानेही किमान १० टक्के रस्ते अपघात कमी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी २९ ते ३१ डिसेंबर २०१९ तसेच १ जानेवारी २०२० च्या पहाटेपर्यंत राबविलेल्या विशेष मोहिमेत १८ युनिटमार्फत मोक्याच्या नाक्यांवर मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.५४ श्वासविश्लेषक यंत्रांचा वापर२९ आणि ३० डिसेंबर रोजी ४७० मद्यपी वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा कलम १८५ नुसार खटले भरण्यात आले. ठाणे, भिवंडी, उल्हासनगर आणि कल्याण या विभागात वाहतूक उपशाखेने ही मोहीम राबविली. यासाठी ५४ श्वासविश्लेषक (ब्रिथ अ‍ॅनालायझर) यंत्रांचाही वापर केल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.येथे होती नाकाबंदी : पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या अधिपत्याखाली चार उपविभागांतील सुमारे ८० अधिकाºयांमार्फत ही मोहीम राबविण्यात आली. ठाण्यातील नौपाडा, ठाणेनगर, कळवा, मुंब्रा, कासारवडवली, कापूरबावडी, राबोडी आणि वागळे इस्टेट या युनिटच्या तीनहातनाका, कॅडबरी जंक्शन, नितीन कंपनी, आनंद नगरनाका, कोपरी, माजिवडा जंक्शन, गोल्डन डाइजनाका आदी ठिकाणीही तपासणी झाली. तर, कल्याण उपविभागातील कल्याण, डोंबिवली आणि कोळसेवाडी या युनिटमधील महामार्ग, एसटी स्टॅण्ड, शिवाजी चौक, दूधनाका, दुर्गाडी चौक, पारनाका आदी भागांत अनेक वाहनाचालकांना पकडण्यात आले. तसेच भिवंडीतील वंजारपट्टीनाका, धामणकरनाका आणि शिवाजी चौक या भिवंडी, नारपोली आणि कोनगाव युनिटच्या कारवाईतही पोलिसांनी अनेकांची झिंग उतरविली. उल्हासनगरासह विठ्ठलवाडी, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसरांत नाकाबंदी करून मद्यपी वाहनचालकांना पकडले.मद्यपींची पोलिसांशी हुज्जतचारही विभागांतील ९० मुख्य नाक्यांवर ३१ डिसेंबरच्या सायंकाळी ४ ते १ जानेवारीच्या पहाटे ६ वाजेपर्यंत ही तपासणी करण्यात आली. मद्यपी वाहनचालकांनी किती प्रमाणात अल्कोहोल घेतले, याची चाचपणी श्वास विश्लेषक यंत्राद्वारे करण्यात आली. अनेक ठिकाणी पोलिसांशी मद्यधुंद वाहनचालकांनी हुज्जत घालून कारवाईत अडथळे आणण्याचेही प्रकार केले.दंडवसुलीऐवजी थेट खटला : पूर्वी अशा मद्यपी वाहनचालकांकडून दंड वसूल केला जायचा. कालांतराने संबंधित वाहनचालक हा न्यायालयात गेल्यानंतर त्याचा दोन हजारांचा दंड कमी होऊन उर्वरित रक्कम त्याला परत केली जात होती. परंतु, दंड भरल्यानंतर कोणीही न्यायालयात जात नव्हते. त्यामुळे आता दंड आकारण्याऐवजी संबंधित मद्यपींवर खटला दाखल करून त्यांचे वाहन जप्त केले. वाहन जप्त केल्यामुळे ते सोडविण्यासाठी या तळीरामांना न्यायालयात जावे लागते. तिथे परवाना निलंबन तसेच दंडात्मक कारवाईदेखील होते. या कारवाईच्या भीतीपोटी मद्यप्राशन करून वाहन चालविणाºयांवर मोठा आळा बसला आहे.- अमित काळे, उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहरअशी झाली कारवाई : ३१ डिसेंबर २०१९ रोजी वाहतूक शाखेने केलेल्या १८ युनिटपैकी सर्वाधिक २७८ तळीरामांवर मुंब्य्रात कारवाई झाली. त्यापाठोपाठ कासारवडवलीमध्ये २२०, डोंबिवली- १३४, नारपोली-१२०, कळवा- १०५ तर वागळे इस्टेटमध्ये १०३ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध खटले दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावर्षी ३१ डिसेंबर रोजी १६७३ तर २९ आणि ३० डिसेंबर या दोन दिवसांत ४७० अशी दोन हजार १४३ वाहने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.१८ युनिटने राबविली मोहीमगेल्या वर्षी संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये १८ युनिटने राबविलेल्या ३१ डिसेंबरच्या मोहीमध्ये दोन हजार ७१ जणांविरुद्ध कारवाई केली होती. यंदा हे प्रमाण ३९८ ने कमी झाले आहे. त्यामुळे मद्यप्राशन करून वाहन चालविण्याचे प्रमाण काही प्रमाणात का होईना, कमी झाल्याचे या कारवाईतून समोर आले आहे.