शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

ठाणे पोलिसांनी दिले नवरदेवाला जीवदान

By admin | Updated: June 26, 2016 01:05 IST

वेळ आली होती पण काळ आला नव्हता, याचा प्रत्यय कोपरी ब्रीजवर झालेल्या घटनेत आला. दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जखमी अवस्थेत रक्ताचा थारोळ्यात पडलेल्या भावी नवरदेवाला

ठाणे : वेळ आली होती पण काळ आला नव्हता, याचा प्रत्यय कोपरी ब्रीजवर झालेल्या घटनेत आला. दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जखमी अवस्थेत रक्ताचा थारोळ्यात पडलेल्या भावी नवरदेवाला ठाणे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्याला जीवदान मिळाले. नवरदेवाच्या भावी पत्नीसह नातेवाइकांनी त्याबद्दल वाहतूक पोलिसांचे आभार मानले. कांजूरगावातील रहिवासी असलेला भूषण पवार असे जीवदान मिळालेल्या नवरदेवाचे नाव आहे. भूषणचे लग्न दोन महिन्यांवर आल्याने त्यांच्या घरात लग्नाची तयारी सुरू झाली होती. तो ठाण्यात मित्रासोबत दुचाकीवरून लग्नाच्या खरेदीसाठी आला होता. त्याने दुचाकी कोपरीत येथे पार्क केली. परत निघाला तोवर पावसाने रस्ते ओलसर झाले होते. त्यातच तो कोपरी ब्रीजच्या वळणावर गोंधळला आणि ताबा सुटल्याने फुटपाथला धडकला. तो जखमी अवस्थेत पडल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद कांबळे यांनी पाहिले. त्यांनी पोलीस शिपाई बोडरे, जुवाटकर, हवालदार चव्हाण यांच्या मदतीने तातडीने शासकीय जीपमधून त्यास ठाणे सिव्हील रुग्णालयात नेले. बिनतारी संदेशाद्वारे संबंधित घटनेची माहिती रुग्णालय, वाहतूक विभाग आणि स्थानिक पोलिसांना दिली. यामुळे वाहतूककोंडीतून मार्ग काढत १० मिनिटांत रुग्णालयात त्याला दाखल करता आले. जास्त रक्तस्राव झाल्याने शस्त्रक्रियेसाठी त्याला दुसऱ्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. शस्त्रक्रियेत त्याच्या डोक्याला ३५ टाके पडले असून त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती कांबळे यांनी दिली. वाहतूक पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे भूषणला जीवदान मिळाले. या कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर आणि सहायक पोलीस आयुक्त डी.आर. गीते यांनी त्यांचे अभिनंदन केले.