ठाणे : लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच अनेक पोलीस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यापाठोपाठ आता तीन वर्षांचा कार्यकाल संपलेल्या कर्मचार्यांच्या बदल्या होणार असल्यामुळे ठाणे पोलीस दलात पुन्हा बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. शहर आणि ग्रामीण पोलीस विभागातील अधिकार्यांसह कर्मचार्यांच्या बदल्या येत्या आठवड्यात होणार आहेत. यामध्ये सुमारे दोन हजार जणांच्या बदल्यांचा समावेश आहे. दरवर्षी पोलीस दलात सर्वसाधारण बदल्या होतात. यामध्ये निरीक्षक, साहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, जमादार, हवालदार, नाईक आणि कॉन्स्टेबल यांचा समावेश असतो. या बदल्या सह-पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षेखाली असलेल्या समितीद्वारे केल्या जातात. यावेळी एकाच पोलीस ठाण्यात, वाहतूक शाखेत तसेच नियंत्रण कक्षात सलग सहा वर्षे, गुन्हे अन्वेषण विभागात तीन वर्षे पूर्ण झालेल्यांचा प्रामुख्याने बदल्या करण्यात येतात. ठाणे श्हार आयुक्तालयातील २०० ते २५० अधिकारी आणि ७०० ते ८०० कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातही सुमारे २०० पोलीस अधिकारी आणि ८०० कर्मचार्यांच्या बदल्या होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
ठाणे पोलीस दलात पुन्हा बदल्यांचे वारे
By admin | Updated: May 26, 2014 02:32 IST