शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ठाणेकरांनी लुटला गुलाबी थंडीचा अनुभव, ठाण्यात १९.०४ अंश तापमानाची नोंद

By अजित मांडके | Updated: January 16, 2024 16:35 IST

यंदाच्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना संपून जानेवारी महिना उजाडला तरी, थंडीचा आनंदापासून ठाणेकर मुकले होते.

अजित मांडके (ठाणे)ठाणे : यंदाच्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना संपून जानेवारी महिना उजाडला तरी, थंडीचा आनंदापासून ठाणेकर मुकले होते. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सर्वात कमी २०.२ अंश तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर पुन्हा उकाडा वाढल्याने ठाणेकरांना उन्हाचे चटके सहन करावे लागले होते. अशातच अचानकपणे सोमवारी सायंकाळ पासून तापमानाचा पार घसरू लागल्याने वातवरणात गारवा निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी पहाटे ४ वाजता २१.१ तर, सकाळी ६ वाजता सर्वात कमी १९.४ अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे उशिरा का होईना पण यंदा ठाणेकरांना गुलाबी थंडी अनुभवता आली.ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर हिट अर्थात उन्हाचा तडका सहन केल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून चाहूल लागते ती थंडीची. मात्र, यंदाच्या वर्षी नोव्हेम्बर आणि डिसेंबर महिना उलटून देखील थंडीचा अनुभव घेता आला नाही. त्यात नव्या वर्षात पदार्पण केल्यानंतर जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातील गुरुवारी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ठाण्यात सरासरी तापमान ३० अंश सेलसिअस इतके होते. संध्याकाळनंतर हळूहळू तापमानाचा पारा खाली उतरत गेला. हा पारा उतरतच राहिल्याने ठाणेकर नागरिकांनी यंदाच्या हिवाळ्यातील थंडीचा अनुभव घेतला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी हा पारा २० अंशाच्या आसपास गेला.

सकाळी ६.३० वाजता २०.२ अंश तापमानाची नोंद झाली. त्यानंतर पुन्हा ताम्पानात वाढ होत गेल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. त्यात मागील दोन ते तीन दिवसापासून वातवरणात उकडा अधिक वाढल्याने नागरिकांना घामाच्या धारा आणि अंगाची लाहीलाही होत होती. अशातच सोमवरी सायंकाळ ५ वाजेपासून वातवरणात गारवा निर्माण होऊ लागला होता. रात्री ९ वाजेनंतर गारवा आणखी वाढल्याने थंडीची चाहूल लागली. तर, मंगळवारी पहाटे २१.१ इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. त्यानंतर ताम्पानात आणखी घसरण झाल्याने वातवरणात देखील कमालीचा गारवा वाढल्याचे दिसून आले. सकाळी ६ वाजता यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी म्हणजे १९.४ अंश तापमानाची नोंद झाली.दरम्यान, हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी ऊबदार कपडे घालून बाहेर पडल्याचे दिसून आले. सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना या थंडीचा आनंद घेता आला. तर, या पडलेल्या गुलाबी थंडीमुळे शहरात ठिकठिकाणी धुक्याची चादर पसरली होती. त्यामुळे सोमवारी मध्यरात्रीपासून पडलेल्या या थंडीने ठाणेकर नागरिक सुखावले आहेत.

टॅग्स :thaneठाणे