शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

साडे चार कोटींच्या कर्जमाफीसाठी ठाणे - पालघर जिल्ह्याच्या १२६९ शेतकऱ्यांची नव्याने निवड

By सुरेश लोखंडे | Updated: October 4, 2018 17:04 IST

आतापर्यंत ठाणे व पालघर जिल्ह्यातील ३६ हजार ७३२ शेतकऱ्यांना  १२७ कोटी ७६ लाख ३५ हजार रूपयांचे कर्ज माफ झाल्याचा दावा टीडीसीसी बँकेकडून केला जात आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील १९ हजार १८५ शेतकऱ्यांना  ६३ कोटी ६४ लाख ७२ हजार रूपयांचे कर्जमाफ झाले तर पालघर जिल्ह्यातील १७ हजार ५४७ शेतकऱ्यांना  ६४ कोटी ११ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना  टीडीसीसी बँकेव्दारे कर्जमाफी मिळाली आहे. याप्रमाणेच नव्याने या दोन्ही जिल्ह्यातील एक हजार २६९ शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी निवड झाली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना  सुमारे चार कोटी ४८ लाख ९१ हजार रूपयांचे कर्जमाफीठाणे जिल्ह्यातील ६८५ शेतकऱ्यांना पालघर जिल्ह्यातील ५८४ आदी एक हजार २६९ शेतकऱ्यांची निवड

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीसाठी ठाणे जिल्ह्यातील ६८५ तर पालघर जिल्ह्यातील ५८४ आदी एक हजार २६९ शेतकऱ्यांची राज्य शासनाने नव्याने निवड केली. तशी यादी नुकतीच २८ सप्टेंबर रोजी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (टीडीसीसी) सुपूर्दही केली. या यादीतील शेतकऱ्यांना  सुमारे चार कोटी ४८ लाख ९१ हजार रूपयांचे कर्जमाफीचे नियोजन केले आहे.आतापर्यंत ठाणे व पालघर जिल्ह्यातील ३६ हजार ७३२ शेतकऱ्यांना  १२७ कोटी ७६ लाख ३५ हजार रूपयांचे कर्ज माफ झाल्याचा दावा टीडीसीसी बँकेकडून केला जात आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील १९ हजार १८५ शेतकऱ्यांना  ६३ कोटी ६४ लाख ७२ हजार रूपयांचे कर्जमाफ झाले तर पालघर जिल्ह्यातील १७ हजार ५४७ शेतकऱ्यांना  ६४ कोटी ११ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना  टीडीसीसी बँकेव्दारे कर्जमाफी मिळाली आहे. याप्रमाणेच नव्याने या दोन्ही जिल्ह्यातील एक हजार २६९ शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी निवड झाली. त्यांचे सुमारे चार कोटी ४८ लाख ९१ हजारांचे कर्जमाफ होईल. यासाठी या यादीतील शेतकऱ्यांची तालुका पातळीवरील कमिटीकडून (टीएलसी) लवकरच तपासणी होऊन या एक हजार २६९ शेतकऱ्यांमधील पात्र शेतकऱ्यांना  तत्काळ कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले. योग्य ते तपासणी होऊन संबंधीत शेतकऱ्यांना  कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.आतापर्यंत कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांची आता दहावी ग्रीनलिस्ट यांदी जाहीर करण्यात आली. या यादीतील शेतकऱ्यांची तालुका स्तरावरील असिस्टन रजिस्टार, लेखा परीक्षक आणि टीडीसीसी बँकेचे वसुली अधिकारी यांच्या कमिटीव्दारे तपासणी होईल. त्यातून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केल्यानंतर त्यांना या कर्जमाफीचा लाभ दिला जाईल. या नव्याने प्रसिध्द झालेल्या दहाव्या ग्रीनलिस्ट यादीमध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक मुरबाड तालुक्यातील ३९२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांतील पात्र चा सुमारे एक कोटी सहा लाखांचे कर्ज माफ होईल. या खालोखाल शहापूर तालुक्यातील १५० शेतकऱ्यांची या कर्जमाफीसाठी नव्याने निवड झाली. यातील पात्र शेतकऱ्यांना सुमारे ५० लाख ९२ हजार रूपये कर्जमाफी देण्याचे नियोजन आहे.या ग्रीनलिस्ट यादीमध्ये भिवंडी तालुक्यातील देखील ८० शेतकऱ्यांची नावे आहेत. या निवड झालेल्या भिवंडीच्या शेतकऱ्यांना २७ लाख ६५ हजार रूपयांचे कर्ज माफीची नियोजन आहे. याखालोखाल अंबरनाथ तालुक्यामधील ४० शेतकऱ्यांची निवड झाली. यामध्ये कुळगांवच्या ३७ शेतकऱ्यांसह नेवाळीच्या तीन शेतकऱ्यांची या कर्जमाफीसाठी निवड झाली. त्यांना सुमारे १३ लाख ९२ हजारांचे कर्म माफ होईल. कल्याण तालुक्यातील गोवेळी येथील चार शेतकऱ्यांनासह कल्याणच्या पाच आणि मांडा टिटवाळा येथील ११ शेतकऱ्यांची या दहाव्या ग्रीन यादीत निवड झाली. या २० शेतकºयांना १४ लाख ६८ हजारांचे कर्जमाफी मिळणार आहे.

टॅग्स :thaneठाणेFarmerशेतकरी