शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
3
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
4
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
5
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
6
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
7
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
8
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
9
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
10
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
11
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
12
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
13
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
14
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
15
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
16
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
17
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
18
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
19
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
20
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र

साडे चार कोटींच्या कर्जमाफीसाठी ठाणे - पालघर जिल्ह्याच्या १२६९ शेतकऱ्यांची नव्याने निवड

By सुरेश लोखंडे | Updated: October 4, 2018 17:04 IST

आतापर्यंत ठाणे व पालघर जिल्ह्यातील ३६ हजार ७३२ शेतकऱ्यांना  १२७ कोटी ७६ लाख ३५ हजार रूपयांचे कर्ज माफ झाल्याचा दावा टीडीसीसी बँकेकडून केला जात आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील १९ हजार १८५ शेतकऱ्यांना  ६३ कोटी ६४ लाख ७२ हजार रूपयांचे कर्जमाफ झाले तर पालघर जिल्ह्यातील १७ हजार ५४७ शेतकऱ्यांना  ६४ कोटी ११ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना  टीडीसीसी बँकेव्दारे कर्जमाफी मिळाली आहे. याप्रमाणेच नव्याने या दोन्ही जिल्ह्यातील एक हजार २६९ शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी निवड झाली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना  सुमारे चार कोटी ४८ लाख ९१ हजार रूपयांचे कर्जमाफीठाणे जिल्ह्यातील ६८५ शेतकऱ्यांना पालघर जिल्ह्यातील ५८४ आदी एक हजार २६९ शेतकऱ्यांची निवड

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीसाठी ठाणे जिल्ह्यातील ६८५ तर पालघर जिल्ह्यातील ५८४ आदी एक हजार २६९ शेतकऱ्यांची राज्य शासनाने नव्याने निवड केली. तशी यादी नुकतीच २८ सप्टेंबर रोजी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (टीडीसीसी) सुपूर्दही केली. या यादीतील शेतकऱ्यांना  सुमारे चार कोटी ४८ लाख ९१ हजार रूपयांचे कर्जमाफीचे नियोजन केले आहे.आतापर्यंत ठाणे व पालघर जिल्ह्यातील ३६ हजार ७३२ शेतकऱ्यांना  १२७ कोटी ७६ लाख ३५ हजार रूपयांचे कर्ज माफ झाल्याचा दावा टीडीसीसी बँकेकडून केला जात आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील १९ हजार १८५ शेतकऱ्यांना  ६३ कोटी ६४ लाख ७२ हजार रूपयांचे कर्जमाफ झाले तर पालघर जिल्ह्यातील १७ हजार ५४७ शेतकऱ्यांना  ६४ कोटी ११ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना  टीडीसीसी बँकेव्दारे कर्जमाफी मिळाली आहे. याप्रमाणेच नव्याने या दोन्ही जिल्ह्यातील एक हजार २६९ शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी निवड झाली. त्यांचे सुमारे चार कोटी ४८ लाख ९१ हजारांचे कर्जमाफ होईल. यासाठी या यादीतील शेतकऱ्यांची तालुका पातळीवरील कमिटीकडून (टीएलसी) लवकरच तपासणी होऊन या एक हजार २६९ शेतकऱ्यांमधील पात्र शेतकऱ्यांना  तत्काळ कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले. योग्य ते तपासणी होऊन संबंधीत शेतकऱ्यांना  कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.आतापर्यंत कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांची आता दहावी ग्रीनलिस्ट यांदी जाहीर करण्यात आली. या यादीतील शेतकऱ्यांची तालुका स्तरावरील असिस्टन रजिस्टार, लेखा परीक्षक आणि टीडीसीसी बँकेचे वसुली अधिकारी यांच्या कमिटीव्दारे तपासणी होईल. त्यातून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केल्यानंतर त्यांना या कर्जमाफीचा लाभ दिला जाईल. या नव्याने प्रसिध्द झालेल्या दहाव्या ग्रीनलिस्ट यादीमध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक मुरबाड तालुक्यातील ३९२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांतील पात्र चा सुमारे एक कोटी सहा लाखांचे कर्ज माफ होईल. या खालोखाल शहापूर तालुक्यातील १५० शेतकऱ्यांची या कर्जमाफीसाठी नव्याने निवड झाली. यातील पात्र शेतकऱ्यांना सुमारे ५० लाख ९२ हजार रूपये कर्जमाफी देण्याचे नियोजन आहे.या ग्रीनलिस्ट यादीमध्ये भिवंडी तालुक्यातील देखील ८० शेतकऱ्यांची नावे आहेत. या निवड झालेल्या भिवंडीच्या शेतकऱ्यांना २७ लाख ६५ हजार रूपयांचे कर्ज माफीची नियोजन आहे. याखालोखाल अंबरनाथ तालुक्यामधील ४० शेतकऱ्यांची निवड झाली. यामध्ये कुळगांवच्या ३७ शेतकऱ्यांसह नेवाळीच्या तीन शेतकऱ्यांची या कर्जमाफीसाठी निवड झाली. त्यांना सुमारे १३ लाख ९२ हजारांचे कर्म माफ होईल. कल्याण तालुक्यातील गोवेळी येथील चार शेतकऱ्यांनासह कल्याणच्या पाच आणि मांडा टिटवाळा येथील ११ शेतकऱ्यांची या दहाव्या ग्रीन यादीत निवड झाली. या २० शेतकºयांना १४ लाख ६८ हजारांचे कर्जमाफी मिळणार आहे.

टॅग्स :thaneठाणेFarmerशेतकरी